माणूस पाकिस्तानातला. आला भारतात. कुणाच्या तरी इशार्यावरून त्यानं भारताविरुद्ध कारवाया केल्या. तशा कारवाया करणार्या अन्य पाकिस्तानी लोकांना इथे रसद पुरविली. मदतीचा हात दिला. सीमेवर लढणार्या भारतीय सैनिकांच्या जिवावर तो नेहमीच टपलेला राहिला. तरीही त्या माणसाच्या मृत्यूनंतर हळहळणारी, अश्रू ढाळणारी, गर्दी करून अंत्यसंस्काराचा सोहळा ‘याचि देही...’ बघण्यासाठी भावनावेगात धडपडणारी माणसं भारतात गवसतात, हेच मुळात आश्चर्य आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया या प्रकरणी आता उमटत आहेत. काहींनी काश्मिरी जनतेच्या राष्ट्रभक्तीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. काहींनी त्यांच्या धर्मांधतेला दोष दिला आहे. काहींनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर ठपका ठेवला आहे, तर काहींनी दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराचेही अशा पद्धतीने साजरे होणारे ‘सोहळे’ अनाठायी ठरविलेत. यातील प्रत्येक प्रतिक्रिया बोचरी असली, तरी दुर्दैवाने लोकांनी केलेला प्रत्येक आरोप खरा आहे.
कुणाच्या पाठीशी ठामपणे उभे राहायचे अन् कुणाच्या पाठीशी ताकद उभी करायची, हे जर समाजातल्या सज्जनशक्तीला कळत नसेल, तर त्या समाजाचे भले होणार कसे? एक कुख्यात अतिरेकी सैनिकांच्या गोळीबारात मारला जातो त्या पाकिस्तानी माणसाच्या अंत्ययात्रेला, पाय ठेवता येणार नाही इतकी गर्दी भारतातल्या काश्मिरात जमते, याचा अर्थ काय काढायचा? बरं, हा मारला गेलेला माणूस काही साधू-संत, प्रेषित नव्हता, की भरघोस सामाजिक कार्यासाठी त्याची ख्याती नव्हती. तसल्या कार्यासाठी त्याने स्वत:ला वाहून घेतल्याचीही वार्ता ऐकिवात नाही. मग त्या नराधमाच्या अंत्ययात्रेला जमलेल्या गर्दीमागील रहस्य आणि कारण काय असावे? इथे सारे जग दहशतवादी संघटनांनी चालविलेल्या नसत्या कारवायांमुळे त्रस्त झाले असताना, अमेरिकेपासून तर रशियापर्यंत आणि भारतापासून तर अफगाणिस्तानपर्यंत सार्यांनाच त्याविरुद्ध बळ एकवटून लढावे लागत असताना, लष्कर-ए- तोयबाचा कमांडर असलेला सीमेपलीकडचा एका तरुण, सीमेच्या अलीकडच्या भागात मृत्यूनंतरही हजारो लोकांची गर्दी जमविण्याइतका लोकप्रिय ठरत असेल, त्याचा खातमा हा या गर्दीसाठी छाती बडवण्याचा अन् मनातले दु:ख व्यक्त करण्याचा प्रसंग ठरत असेल, तर तीव्र चिंता या जनसामान्यांच्या भूमिकेची, एका अतिरेक्याप्रती त्यांच्या मनात असलेल्या प्रचंड आस्थेची आणि त्यांच्या वागणुकीचीही केली पाहिजे.
बीएसएफच्या दोन जवानांचा बळी घेणार्या उधमपुरातील एका योजनेला आकार देणारा आणि त्यापूर्वीही अनेक दहशतवाद्यांच्या काळ्या कटात, प्रत्यक्ष कृत्यात सहभागी असलेला लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबु कासीम भारतीय जवानांच्या एका कारवाईत मंगळवारी मध्यरात्री मारला गेला. मरण्यापूर्वीही त्याने या सैनिकांवर जमेल तेवढे हल्ले केले. अगदी ग्रेनाईडचा वापरसुद्धा केला. पण, भारतीय सैनिक हावी ठरले. त्यांनी या म्होरक्याला आणि त्याच्या टोळक्यालाही चांगलाच ठेचून काढला. त्याला यमसदनी धाडले. पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतातल्या बहावलपूर परिसरातला हा गडी पाकिस्तानातून प्रशिक्षण घेऊन गेल्या पाच वर्षांपासून भारतातल्या काश्मिरात आपल्या कारवाया करतोय्. या काळात पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या माध्यमातून इथे झालेल्या प्रत्येक कृत्यात त्याचा सहभाग राहिला आहे. अगदी परवाच्या- जवानांचा बळी घेणार्या त्या उधमपुरातील हल्ल्यातसुद्धा! मृत्यूनंतर त्याचा अंत्यसंस्कार करायला गेलेल्या प्रशासनाला काश्मिरातील कुलगाम येथे जमलेले लोक, त्यांची संख्या बघून आश्चर्याचा अक्षरश: धक्का बसावा, एवढी अलोट गर्दी बुधवारी या गावात झाली होती.
माणूस पाकिस्तानातला. आला भारतात. कुणाच्या तरी इशार्यावरून त्यानं भारताविरुद्ध कारवाया केल्या. तशा कारवाया करणार्या अन्य पाकिस्तानी लोकांना इथे रसद पुरविली. मदतीचा हात दिला. सीमेवर लढणार्या भारतीय सैनिकांच्या जिवावर तो नेहमीच टपलेला राहिला. तरीही त्या माणसाच्या मृत्यूनंतर हळहळणारी, अश्रू ढाळणारी, गर्दी करून अंत्यसंस्काराचा सोहळा ‘याचि देही...’ बघण्यासाठी भावनावेगात धडपडणारी माणसं भारतात गवसतात, हेच मुळात आश्चर्य आहे.
वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया या प्रकरणी आता उमटत आहेत. काहींनी काश्मिरी जनतेच्या राष्ट्रभक्तीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. काहींनी त्यांच्या धर्मांधतेला दोष दिला आहे. काहींनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर ठपका ठेवला आहे, तर काहींनी दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराचेही अशा पद्धतीने साजरे होणारे ‘सोहळे’ अनाठायी ठरविलेत. यातील प्रत्येक प्रतिक्रिया बोचरी असली, तरी दुर्दैवाने लोकांनी केलेला प्रत्येक आरोप खरा आहे. कारणे भलेही इतिहासात दडली असतील किंवा मग धर्मांधतेचीही किनार त्याला असेल कदाचित, पण दहशतवाद्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत, भारतीय तिरंग्याचा अपमान ही इथली वानगीदाखल उदाहरणे राहिलेली नाहीत आता. तो नित्याचा परिपाठ झाला आहे. अतिरेक्यांच्या दफनविधीत अश्रू ढाळणारी अन् भारतीय सैनिकांवर दगडफेक करणारी गर्दीही इथलीच. पंडितांना काश्मिरातून हुसकावून लावणारी अन् सीमेपलीकडील दहशतवाद्यांना मात्र आस्थेने थारा देणारी लोकंही इथलीच. नेमके कुठे, काय चुकले आहे हा प्रश्न आहेच. धोरणं चुकली, की तत्कालीन नेत्यांचे निर्णय, हा मुद्दाही आहेच. गेली कित्येक वर्षे हे असेच चालले आहे आणि वर्षे उलटली तरी चित्र बदलताना दिसत नाहीय्, हेही खरे आहे. पाकिस्तानी झेंड्याला सलाम ठोकणारी आणि भारतीय तिरंग्याचा कायम अपमान करणारी मंडळी या प्रांतात ठाण मांडून बसलीय्. तीच मंडळी अबु कासीमच्या अंत्यसंस्कारला गर्दी करत प्रशासनाला चक्रावून सोडते. याच कासीमच्या षडयंत्रात उधमपुरात मारल्या गेलेल्या बीएसएफच्या दोन जवानांच्या अंत्ययात्रेत या जनतेने इतक्या मोठ्या संख्येत गर्दी केल्याचे ऐकिवात नाही. मग स्थानिक व्यवस्थेबाबत मनात कुठलीही भीती न बाळगता एका विदेशी दहशतवाद्याच्या अंत्यसंस्काराला कसे जमतात एवढे लोक?
पाच वर्षांपूर्वी पाकिस्तानातून आलेला एक तरुण भारतातल्या काश्मिरात मायेची एवढी माणसं जमवतो, ही किमया त्याच्या लाघवी वागण्याची आहे, त्यानं ज्याचा नारा देत हाती बंदुकी धरल्या त्या जिहादच्या कल्पनेची आहे, ही जादू त्याच्या धर्माची आहे, की शेजारच्या देशाशी नाते सांगण्यासाठी काश्मिरी जनतेत सुरू असलेल्या अहमहमिकेचा तो परिणाम आहे... असे कित्येक प्रश्न या प्रकरणाने उपस्थित केले आहेत. यात भारताच्या धर्मनिरपेक्ष धोरणांच्या अतिरेकालाही जरासा दोष दिलाच पाहिजे. लादेनला ठेचून काढला, तेव्हा त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याच्या भानगडीत कुणी पडलं नाही. मग आम्हीच का म्हणून आमच्या देशाविरुद्ध पेटून उठलेल्या, आमच्या अस्मितेवर घाला घालणार्या, आमच्या विरोधात कारवाया करणार्या, आमच्या सैनिकांच्या जिवाला हात घालणार्या दहशतवाद्यांच्या, पायदळी तुडविण्याच्या लायकीच्या मुडद्यांसाठी अंत्यसंस्कारांचे ‘सोहळे’ आयोजित करत बसतो? जे अमेरिका लादेनच्या बाबतीत करते, ते आम्हाला पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या टोळक्यातल्या नराधमांच्या बाबतीत का करता येत नाही?
यंदा ते प्रकर्षाने जाणवले असले, तरी ‘इथल्या’ जनतेने ‘तिथल्यांशी’ नाते सांगण्याची ही काही पहिली वेळ नाही. इथल्या व्यवस्थेला विरोध आणि तिकडच्या दहशतवाद्यांप्रती कळवळा व्यक्त होण्याचाही हा काही पहिला प्रसंग नाही. त्यामुळे दहशतवादाशी लढण्याची अन् दहशतवाद्यांशी वागण्याची तर्हाच बदलण्याची गरज या निमित्ताने अधोरेखित झाली आहे. याकूब असो की अफझल गुरू, कसाब असो की अबु कासीम, त्यांना ठेचण्याची पद्धत अमेरिकेने लादेनच्या बाबतीत अनुसरली तशीच असली पाहिजे अन् त्यांच्या अंत्यसंस्काराची तर्हाही... राहिला प्रश्न अबु कासीमच्या अंत्यसंस्काराला जमलेल्या गर्दीचा अन् त्यांच्या तिथल्या बिनदिक्कतपणे वागण्याचा, तर त्यांनाही जाब विचारणारी यंत्रणा अस्तित्वात असली पाहिजे कुठेतरी. अन्यथा ‘यांच्या’ साथीने ‘त्यांच्या’शी
लढायचे कसे? असल्या लोकांना सोबत
घेऊन दहशतवादाविरुद्धचा लढा लढायचा कसा...?
बीएसएफच्या दोन जवानांचा बळी घेणार्या उधमपुरातील एका योजनेला आकार देणारा आणि त्यापूर्वीही अनेक दहशतवाद्यांच्या काळ्या कटात, प्रत्यक्ष कृत्यात सहभागी असलेला लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबु कासीम भारतीय जवानांच्या एका कारवाईत मंगळवारी मध्यरात्री मारला गेला. मरण्यापूर्वीही त्याने या सैनिकांवर जमेल तेवढे हल्ले केले. अगदी ग्रेनाईडचा वापरसुद्धा केला. पण, भारतीय सैनिक हावी ठरले. त्यांनी या म्होरक्याला आणि त्याच्या टोळक्यालाही चांगलाच ठेचून काढला. त्याला यमसदनी धाडले. पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतातल्या बहावलपूर परिसरातला हा गडी पाकिस्तानातून प्रशिक्षण घेऊन गेल्या पाच वर्षांपासून भारतातल्या काश्मिरात आपल्या कारवाया करतोय्. या काळात पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या माध्यमातून इथे झालेल्या प्रत्येक कृत्यात त्याचा सहभाग राहिला आहे. अगदी परवाच्या- जवानांचा बळी घेणार्या त्या उधमपुरातील हल्ल्यातसुद्धा! मृत्यूनंतर त्याचा अंत्यसंस्कार करायला गेलेल्या प्रशासनाला काश्मिरातील कुलगाम येथे जमलेले लोक, त्यांची संख्या बघून आश्चर्याचा अक्षरश: धक्का बसावा, एवढी अलोट गर्दी बुधवारी या गावात झाली होती.
माणूस पाकिस्तानातला. आला भारतात. कुणाच्या तरी इशार्यावरून त्यानं भारताविरुद्ध कारवाया केल्या. तशा कारवाया करणार्या अन्य पाकिस्तानी लोकांना इथे रसद पुरविली. मदतीचा हात दिला. सीमेवर लढणार्या भारतीय सैनिकांच्या जिवावर तो नेहमीच टपलेला राहिला. तरीही त्या माणसाच्या मृत्यूनंतर हळहळणारी, अश्रू ढाळणारी, गर्दी करून अंत्यसंस्काराचा सोहळा ‘याचि देही...’ बघण्यासाठी भावनावेगात धडपडणारी माणसं भारतात गवसतात, हेच मुळात आश्चर्य आहे.
वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया या प्रकरणी आता उमटत आहेत. काहींनी काश्मिरी जनतेच्या राष्ट्रभक्तीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. काहींनी त्यांच्या धर्मांधतेला दोष दिला आहे. काहींनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर ठपका ठेवला आहे, तर काहींनी दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराचेही अशा पद्धतीने साजरे होणारे ‘सोहळे’ अनाठायी ठरविलेत. यातील प्रत्येक प्रतिक्रिया बोचरी असली, तरी दुर्दैवाने लोकांनी केलेला प्रत्येक आरोप खरा आहे. कारणे भलेही इतिहासात दडली असतील किंवा मग धर्मांधतेचीही किनार त्याला असेल कदाचित, पण दहशतवाद्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत, भारतीय तिरंग्याचा अपमान ही इथली वानगीदाखल उदाहरणे राहिलेली नाहीत आता. तो नित्याचा परिपाठ झाला आहे. अतिरेक्यांच्या दफनविधीत अश्रू ढाळणारी अन् भारतीय सैनिकांवर दगडफेक करणारी गर्दीही इथलीच. पंडितांना काश्मिरातून हुसकावून लावणारी अन् सीमेपलीकडील दहशतवाद्यांना मात्र आस्थेने थारा देणारी लोकंही इथलीच. नेमके कुठे, काय चुकले आहे हा प्रश्न आहेच. धोरणं चुकली, की तत्कालीन नेत्यांचे निर्णय, हा मुद्दाही आहेच. गेली कित्येक वर्षे हे असेच चालले आहे आणि वर्षे उलटली तरी चित्र बदलताना दिसत नाहीय्, हेही खरे आहे. पाकिस्तानी झेंड्याला सलाम ठोकणारी आणि भारतीय तिरंग्याचा कायम अपमान करणारी मंडळी या प्रांतात ठाण मांडून बसलीय्. तीच मंडळी अबु कासीमच्या अंत्यसंस्कारला गर्दी करत प्रशासनाला चक्रावून सोडते. याच कासीमच्या षडयंत्रात उधमपुरात मारल्या गेलेल्या बीएसएफच्या दोन जवानांच्या अंत्ययात्रेत या जनतेने इतक्या मोठ्या संख्येत गर्दी केल्याचे ऐकिवात नाही. मग स्थानिक व्यवस्थेबाबत मनात कुठलीही भीती न बाळगता एका विदेशी दहशतवाद्याच्या अंत्यसंस्काराला कसे जमतात एवढे लोक?
पाच वर्षांपूर्वी पाकिस्तानातून आलेला एक तरुण भारतातल्या काश्मिरात मायेची एवढी माणसं जमवतो, ही किमया त्याच्या लाघवी वागण्याची आहे, त्यानं ज्याचा नारा देत हाती बंदुकी धरल्या त्या जिहादच्या कल्पनेची आहे, ही जादू त्याच्या धर्माची आहे, की शेजारच्या देशाशी नाते सांगण्यासाठी काश्मिरी जनतेत सुरू असलेल्या अहमहमिकेचा तो परिणाम आहे... असे कित्येक प्रश्न या प्रकरणाने उपस्थित केले आहेत. यात भारताच्या धर्मनिरपेक्ष धोरणांच्या अतिरेकालाही जरासा दोष दिलाच पाहिजे. लादेनला ठेचून काढला, तेव्हा त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याच्या भानगडीत कुणी पडलं नाही. मग आम्हीच का म्हणून आमच्या देशाविरुद्ध पेटून उठलेल्या, आमच्या अस्मितेवर घाला घालणार्या, आमच्या विरोधात कारवाया करणार्या, आमच्या सैनिकांच्या जिवाला हात घालणार्या दहशतवाद्यांच्या, पायदळी तुडविण्याच्या लायकीच्या मुडद्यांसाठी अंत्यसंस्कारांचे ‘सोहळे’ आयोजित करत बसतो? जे अमेरिका लादेनच्या बाबतीत करते, ते आम्हाला पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या टोळक्यातल्या नराधमांच्या बाबतीत का करता येत नाही?
यंदा ते प्रकर्षाने जाणवले असले, तरी ‘इथल्या’ जनतेने ‘तिथल्यांशी’ नाते सांगण्याची ही काही पहिली वेळ नाही. इथल्या व्यवस्थेला विरोध आणि तिकडच्या दहशतवाद्यांप्रती कळवळा व्यक्त होण्याचाही हा काही पहिला प्रसंग नाही. त्यामुळे दहशतवादाशी लढण्याची अन् दहशतवाद्यांशी वागण्याची तर्हाच बदलण्याची गरज या निमित्ताने अधोरेखित झाली आहे. याकूब असो की अफझल गुरू, कसाब असो की अबु कासीम, त्यांना ठेचण्याची पद्धत अमेरिकेने लादेनच्या बाबतीत अनुसरली तशीच असली पाहिजे अन् त्यांच्या अंत्यसंस्काराची तर्हाही... राहिला प्रश्न अबु कासीमच्या अंत्यसंस्काराला जमलेल्या गर्दीचा अन् त्यांच्या तिथल्या बिनदिक्कतपणे वागण्याचा, तर त्यांनाही जाब विचारणारी यंत्रणा अस्तित्वात असली पाहिजे कुठेतरी. अन्यथा ‘यांच्या’ साथीने ‘त्यांच्या’शी
लढायचे कसे? असल्या लोकांना सोबत
घेऊन दहशतवादाविरुद्धचा लढा लढायचा कसा...?