Friday, July 22, 2016

सहानुभूती नको, लढा हवा!

 पंधरा वर्षांच्या एका मुलीवर तीन नराधमांमुळे गुदरलेला अतिप्रसंग  घृणास्पद, लज्जास्पद अन्‌ निषेधार्ह आहे. त्याची करावी तेवढी िंनदा कमी आहे. कोवळ्या वयातल्या एका निरागस मुलीला आपल्या वासनेचे शिकार बनविणार्‍या नराधमांना तर चाबकाने फोडून मग भर चौकात फासावर लटकविले पाहिजे. त्यांनी दुसर्‍याला दिलेल्या यातनांचा अनुभव एकदा त्यांनाही आणून दिला पाहिजे. कुणाला सावज बनविणे तर सोडाच, पण रस्त्याने जाणार्‍या मुलीकडे नजर उचलून बघण्याचीही िंहमत पुन्हा कुण्या नराधमाला होणार नाही, इतकी कठोरातली कठोर शिक्षा या प्रकरणातील आरोपींना व्हावी. या लोकशाहीप्रधान देशातील न्यायदानाच्या प्रचलित संथ व्यवस्थेत कोपर्डीच्या घटनेतील नराधमांना फासावर लटकावण्यास प्रत्यक्षात किती वेळ लागतो, ते येणारा काळ सांगेलच. कायदेशीर कारवाईही पूर्ण होईलच आज ना उद्या, पण एक गरज मात्र या घटनेने प्रकर्षाने जगासमोर स्पष्ट केली आहे- आमच्या समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची! इथल्या पुरुषांमधला ‘माणूस’ जागा होईल तो सुदिन!  आनंद ही अनुभवण्याची गोष्ट आहे. तो असा ओरबाडून मिळवायचा नसतो, हे त्याला ज्या दिवशी कळेल, तो सुदिन! पाश्चात्त्यांच्या उपभोग आणि चंगळवादाचे भारी आकर्षण आहे आम्हाला. पण, मग दुसर्‍यांच्या भावनांचा आदर करण्याची, निर्णय घेण्याचे इतरांचे स्वातंत्र्य मोठ्या मनाने मान्य करण्याची त्यांची रीत केव्हा स्वीकारणार आम्ही? एकीकडे ‘यत्र नार्यस्तु पुज्यंते’चा जपही करायचा अन्‌ दुसरीकडे नारीला ‘ताडन के अधिकारी’ही ठरवायचे; एकीकडे ‘बेटी’ लक्ष्मी असल्याचे अभिमानाने सांगायचे अन्‌ दुसरीकडे जगण्याचा तिचा अधिकार नाकारत कन्याभ्रूणहत्याही करायची, ही दुटप्पी भूमिका आता सोडली पाहिजे लोकांनी. बलात्काराच्या वाढत्या घटना, या उपभोगवादाचा परिपाक आहेत. पैशाच्या सहज उपलब्धतेतून निर्माण झालेल्या चंगळवादाचीही किनार त्याला आहे. इतरांच्या भावभावना पायदळी तुडवत, स्वत:च्या सुखासाठी इतरांची अब्रू लुटणारी हैवानांची जमात त्यातूनच निर्माण झाली आहे.

उपभोगवादाच्या पलीकडे स्त्रियांची िंकमत नाकारणार्‍या तीन नराधमांनी दिल्लीतल्या निर्भया प्रकरणाशी तुलना करता यावी, इतक्या बेमुर्वतखोरपणे परवा कोपर्डीत एका पंधरा वर्षीय मुलीच्या इभ्रतीचे लचके तोडले. नंतर तेवढ्याच निर्दयतेने तिचा जीवही या नराधमांनी संपवला. या घटनेचे अपेक्षित पडसाद समाजात सर्वदूर उमटताहेत. एकीकडे कोपर्डीकरांच्या माध्यमातून राज्यकर्त्यांपासून तर पोलिस यंत्रणेपर्यंत सर्वांविरुद्धचा संताप यानिमित्ताने व्यक्त होतोय्‌, तर इतर ठिकाणीही  बंद, मोर्चे आदींच्या माध्यमातून निषेधाचा टिपेचा स्वर उमटतो आहे. दुसर्‍यांच्या घरातल्या पोरी म्हणजे अधिकाराने लूटण्याची ‘चीज’ वाटणारे ‘ते’ तिघे सध्या गजाआड आहेत. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सुनावणी द्रुतगती न्यायालयात करण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. कधी नव्हे ते राजकारणाच्या आखाड्यात विरोधकही दंड थोपटून सरकारविरुद्ध उभे ठाकले आहेत. या मुद्याचे राजकारण करत, जमलंच तर त्यावरून सरकारला अडचणीत आणण्याचा डाव साधण्याची मनीषा आहे त्यांची. कुठल्याशा एका छायाचित्रात मंत्री राम शिंदे यांच्या शेजारी असलेली व्यक्ती या आरोपींपैकी एक असल्याचे सांगत, धनंजय मुंडे यांनी घाईघाईत केलेली िंशदेंच्या राजीनाम्याची मागणी आणि नंतर वस्तुस्थिती तशी नसल्याची खात्री पटल्यावर जाहीर झालेला त्यांचा माफीनामा, राजकारणाच्या अत्यंत खालच्या पातळीचीच साक्ष आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणात जनक्षोभ उसळू लागल्यानंतर ज्या पद्धतीने लपूनछपून सारा कारभार आटोपला गेला होता, ज्या पद्धतीने रात्रीच्या अंधारात तिच्यावरील अंत्यसंस्कार उरकला गेला होता, त्याचा विसर अजून कुणालाच पडलेला नाही  इथे. मुळात, असले मुद्दे राजकारण साधण्याचे नाहीत. निर्भया प्रकरणात दिल्लीतल्या रस्त्यावरून व्यक्त झालेला जनक्षोभ ‘त्या’ नराधमांविरुद्ध होता. त्यांना पकडण्यात कसूर करणार्‍या पोलिस यंत्रणेविरुद्ध होता. या निमित्ताने जमलंच तर सरकारविरुद्ध राजकीय षडयंत्राचा एखादा बार उडवून देण्याची कल्पना त्या वेळी कुणाच्या मनात आलीदेखील नव्हती! दुर्दैवाने नेमके त्याच्या उलट आता घडताना दिसत आहे. या प्रकरणाचे निमित्त साधून, शहानिशा केल्याशिवायच मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्यावर बेछूट आरोप करत सुटण्याची विरोधी पक्षनेत्याला झालेली घाई अन्यथा अशोभनीयच! पृथ्वीराज चव्हाणांपासून तर अजित पवारांपर्यंत सर्वांनाच जे उमाळे आता राहून राहून दाटून येताहेत, त्या मुलीबद्दलच्या कणवेचे जे जाहीर प्रदर्शन या मंडळींनी मांडले आहे, त्याला ‘नौटंकी’च्या पुढे कुठे काही महत्त्व आहे? बरं, सामान्य म्हणून ओळखल्या जाणार्‍या जनतेच्या रागाला तरी कुठे धार असते एरवी? शेवटी काय, घटना घडून गेल्यावर मेणबत्त्या जाळून श्रद्धांजली वाहायला सरसावणारी जमात आमची! मनातला रोष व्यक्त व्हायला तिलाही अशा घटनांचे निमित्त लागत असते दर वेळी. घटना घडल्या की, मग अनावर होणार्‍या गर्दीतून कधी दगडफेक करत, कधी शिवीगाळ करत, तर कधी मंत्र्यांना घेराव घालत उमटतो तो रोष. थोडे दिवस मागे पडले की, पुन्हा सारे शांऽऽत! पुन्हा सगळे चिडिचुप!! नाहीतर निर्भया प्रकरणानंतर तसल्या घटना घडल्या नाहीत देशभरात कुठेच? त्यातील किती प्रकरणांत व्यक्त झाला जनक्षोभ? किती प्रकरणांत व्यक्त झाली लोकांच्या मनातली चीड? जनता अन्‌ राजकारण्यांच्या मनातला संताप व्यक्त होण्याचे मुद्दे आणि घटना अशा ‘सिलेक्टिव्ह’ असतील, आपापल्या सोयीने प्रत्येकाचा राग व्यक्त होणार असेल, तर संपलंच सगळं. अन्‌ माध्यमं? त्यांचा महिमा काय वर्णावा? ते तर दिवाळे निघालेल्या अकलेचे प्रदर्शन मांडायलाच निघाले आहेत! काश्मिरात बुरहान वाणी मारला गेला की, त्यांना मानवता आठवते अन्‌ कोपर्डीच्या घटनेत राजकारण! या मुलीवर सामूहिक बलात्कार करणारी ती पोरं अल्पवयीन असल्याचे बघून आता त्यांच्यासाठी यांच्या मनात कणव निर्माण झाली नाही म्हणजे मिळवली!! नगर जिल्ह्यातील कोपर्डीत घडलेली घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. पंधरा वर्षांच्या एका मुलीवर तीन नराधमांमुळे गुदरलेला अतिप्रसंग  घृणास्पद, लज्जास्पद अन्‌ निषेधार्ह आहे. त्याची करावी तेवढी िंनदा कमी आहे. कोवळ्या वयातल्या एका निरागस मुलीला आपल्या वासनेचे शिकार बनविणार्‍या नराधमांना तर चाबकाने फोडून मग भर चौकात फासावर लटकविले पाहिजे. त्यांनी दुसर्‍याला दिलेल्या यातनांचा अनुभव एकदा त्यांनाही आणून दिला पाहिजे. कुणाला सावज बनविणे तर सोडाच, पण रस्त्याने जाणार्‍या मुलीकडे नजर उचलून बघण्याचीही िंहमत पुन्हा कुण्या नराधमाला होणार नाही, इतकी कठोरातली कठोर शिक्षा या प्रकरणातील आरोपींना व्हावी. या लोकशाहीप्रधान देशातील न्यायदानाच्या प्रचलित संथ व्यवस्थेत कोपर्डीच्या घटनेतील नराधमांना फासावर लटकावण्यास प्रत्यक्षात किती वेळ लागतो, ते येणारा काळ सांगेलच. कायदेशीर कारवाईही पूर्ण होईलच आज ना उद्या, पण एक गरज मात्र या घटनेने प्रकर्षाने जगासमोर स्पष्ट केली आहे- आमच्या समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची! इथल्या पुरुषांमधला ‘माणूस’ जागा होईल तो सुदिन!  आनंद ही अनुभवण्याची गोष्ट आहे. तो असा ओरबाडून मिळवायचा नसतो, हे त्याला ज्या दिवशी कळेल, तो सुदिन! पाश्चात्त्यांच्या उपभोग आणि चंगळवादाचे भारी आकर्षण आहे आम्हाला. पण, मग दुसर्‍यांच्या भावनांचा आदर करण्याची, निर्णय घेण्याचे इतरांचे स्वातंत्र्य मोठ्या मनाने मान्य करण्याची त्यांची रीत केव्हा स्वीकारणार आम्ही? एकीकडे ‘यत्र नार्यस्तु पुज्यंते’चा जपही करायचा अन्‌ दुसरीकडे नारीला ‘ताडन के अधिकारी’ही ठरवायचे; एकीकडे ‘बेटी’ लक्ष्मी असल्याचे अभिमानाने सांगायचे अन्‌ दुसरीकडे जगण्याचा तिचा अधिकार नाकारत कन्याभ्रूणहत्याही करायची, ही दुटप्पी भूमिका आता सोडली पाहिजे लोकांनी. बलात्काराच्या वाढत्या घटना, या उपभोगवादाचा परिपाक आहेत. पैशाच्या सहज उपलब्धतेतून निर्माण झालेल्या चंगळवादाचीही किनार त्याला आहे. इतरांच्या भावभावना पायदळी तुडवत, स्वत:च्या सुखासाठी इतरांची अब्रू लुटणारी हैवानांची जमात त्यातूनच निर्माण झाली आहे. दुर्दैवाने त्यांची संख्या दिवसागणिक वाढते आहे. माणूस आणि त्याच माणसांपासून तयार होणारा समाज घडविणार्‍या संस्कारांच्या अभावाचाही हा परिणाम आहेच. उद्ध्वस्त झालेली कुटुंबव्यवस्था, नावालाही न उरलेली नातीगोती, अभावानेच मिळणारी आजी-आजोबांच्या मायेची ऊब, याचाही हा परिणाम आहेच. ‘सातच्या आत घरात’च्या नियमात दिवसागणिक येऊ लागलेली शिथिलता, मुलींच्या तुलनेत मुलांना रान मोकळे करून देण्याची अजब मानसिकता, याचाही तो परिपाक आहे, हे वास्तव कसे नाकारता येईल? त्या पीडित मुलीच्या कुटुंबीयांची आजची परिस्थिती शाब्दिक सांत्वनेच्या पलीकडची आहे. या घटनेतून झालेली त्यांची क्षती कधीही भरून न निघणारी आहे. भविष्यात कोणतीच निर्भया कुणाच्याच वासनेचा बळी ठरू नये. मेणबत्त्या जाळून व्यक्त होणार्‍या सद्भावना अन्‌ सहानुभूतिपेक्षाही असल्या नराधमांच्या प्रवृत्तीविरुद्ध लढावयाच्या लढ्याच्या निर्धाराची आज त्याहून अधिक  गरज आहे...

1 comment: