Friday, December 18, 2015

कोडग्यांच्या दुनियेत...

आता हेच बघा ना! कुणाला तरी वाटलं की चित्रपटगृहात राष्ट्रगीताची धून सुरू असताना त्यांना उठून उभं राहण्याचा आग्रह कुणी धरू नये! ते तसे वागले. गीताची धून सुरू असताना बसून राहिले जागेवर. यावेळी उभ्या असलेल्यांपैकी काही मोजक्या लोकांना ते पटलं नाही. त्यांनी चित्रपटगृहाच्या मालकाकडे तीव्र मतं नोंदवली. राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ ‘त्यांना’ उभं राहावंच लागेल असा आग्रह धरला. शेवटी तसे घडले. त्या हेकेखोरांना लोकाग्रहापुढे नमतं घ्यावं लागलं. इतरांसमवेत उठून उभं राहावं लागलं. त्यांनी त्यांचं मत आपल्या सुरुवातीच्या वर्तणुकीतून व्यक्त केलं होतं. त्यांना गुमान उभं राहायला सांगणारी मंडळी मोजकीच निघाली, पण त्यांची भूमिका कशी योग्य होती हे सांगण्यासाठी सरसावलेल्या मंडळीची तर गणती करणेही दुरापास्त व्हावे, इतकी त्यांची संख्या जास्त आहे. नाना पाटेकर म्हणतात, त्याप्रमाणे हे कोडगेपण असेल, तर मग कोडग्यांची ही वाढलेली संख्या काय दर्शवते? राष्ट्रगीताच्या वेळी उभं राहावं की न राहावं, एखाद्याला वाटत नसेल उभं राहावंसं तर त्याला तसं करू द्यावं की कानाखाली सणसणीत चपराक हाणावी त्याच्या, हे काय विचारणं झालं? पाटेकरांच्या नानालाही बहुधा हे कोडगेपण अपेक्षित नाही. म्हणूनच परवा एका कार्यक्रमात यावरील निरर्थक चर्चेची गरज निकाली काढली त्यानं. आता चेंडू जनतेच्या कोर्टात आहे. असल्या कवडीमोल चर्चेत सहभागी होत कुणाच्यातरी विधानावर टाळ्या पिटायच्या की राष्ट्रगीताचा अवमान करणार्‍यांना जागीच ठेचून काढायचं, हे आपणच ठरवायचं आहे. कारण यापुढे ‘असे’ करणारी मंडळीच कोडग्यांच्या या गर्दीत विरळा ठरणार आहे...
खरंच नाना म्हणतो, तशी माणसं इतकी कोडगी झाली आहेत आपल्या या समाजातली? एखाद्या चित्रपटगृहात राष्ट्रगीत सुरू असेल तर उभं राहावं की न राहावं यावरूनही चर्वितचर्वण चाललंय् यांचं. त्यावेळी उभं राहिलंच पाहिजे यासाठी आग्रह धरणारी मंडळी मूर्ख अन् त्यासाठी नकार देणारे मात्र शहाणे ठरताहेत इथे कुणाच्यातरी लेखी. त्या उपर्‍यांची ती कवडीमोल मतं मौल्यवान ठरवायला निघाले आहेत काही लोक. कायद्याचा कीस पाडून हा आग्रह कसा अनाठायी, अन्यायकारक आहे, हे सांगायला सरसावले आहेत काही दीड शहाणे. अर्थात असल्या दीड शहाण्यांची कमतरता मुळीच नाही या देशात. सीमेवर भारतीय जवानांच्या गोळीबारात पाकिस्तानच्या सैनिकांचे मुडदे पडले की चेहरे रडवेले करणारे अन् दहशतवाद्यांवरील कठोर कारवायांमध्येही मानवाधिकारांच्या हननाचे निमित्त शोधणारे लोक पुरोगामित्वाची बिरुदं लावून मोठ्या दिमाखानं मिरवतात इथे. खरं तर राष्ट्रगीताची धून सुरू असताना उभं राहण्याची सूचना कुण्या तिसर्‍यानं करण्याची गरजच काय आहे? ती धून कानावर पडताच रक्त सळसळायला हवे धमण्यातले. ‘जनगणमन’चे स्वर कानावर पडताच स्वाभिमानाने उठून ताठ उभे राहायला हवे माणसाने. हे ज्यांना जमत नसेल; किंवा ते करताना ज्यांना लाज वाटत असेल, त्यांच्या देशभक्तीवर शंका व्यक्त झाली तर दोष कुणाचा? पण दुर्दैव असे की अशी शंका घेणार्‍यांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जात आहे आणि कोडगेपणाचा कळस गाठलेली, बावन्न सेकंदांच्या राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभं राहण्याच्या आग्रहावर आक्षेप नोंदविणारी मंडळी कॉलर ताठ करून त्याच्या मानवी हक्काचे गोडवे गात आहे. त्याहून दुर्दैव हे की, त्यांनी नोंदविलेला हा आक्षेप म्हणजे अतिशय मोलाचे मत असल्यागत माध्यम जगतातली हुशार मंडळी त्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेते. त्यावर चर्चा घडवून आणते. त्या चर्चेत सहभागी होणारी स्वयंघोषित तज्ज्ञ मंडळी कायद्यातील तरतुदींचे दाखले देत, ही ‘जबरदस्ती’ कशी अनावश्यक आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करते. त्या विधानावर टाळ्या पिटल्या जातात...
सारेच अनाकलनीय आहे. ज्या स्वरांमध्ये, आकाशाच्या दिशेने झेपावणार्‍या मुठी आवळण्यास भाग पाडण्याची ताकद आहे, ज्या शब्दांमध्ये स्वातंत्र्याची समरज्योत पेटविण्याची शक्ती आहे, त्या वंदे मातरम् वर आक्षेप नोंदविणार्‍यांनी असाच धिंगाणा घातला होता मध्यंतरी. आता चित्रपटगृहात राष्ट्रगीताची धून वाजत असताना उठून उभे राहाण्याचा कंटाळा आलाय् काही लोकांना. त्यांच्या या ‘नाजूक परिस्थितीची’ गंभीर दखल घ्यायला या देशातली काही मंडळी आहेच कायम सरसावलेली!
हा काय आक्षेप नोंदविण्याचा मुद्दा आहे? तो आक्षेप काय चर्चेचा विषय होऊ शकतो? पेकाटात लाथ मारली पाहिजे असला आक्षेप नोंदविणार्‍यांच्या अन् त्या आक्षेपांची दखल घेणार्‍यांच्याही. मतदानाच्या दिवशी लाभलेल्या सुटीचा उपयोग मतदानाऐवजी पिकनिकसाठी करणारे लोक जेव्हा सरकारच्या कारभारावर अन् देशात बोकाळलेल्या भ्रष्टाचारावर बोलतात, तेव्हा जसा संताप अनावर होतो आणि त्या लोकांची कीव करावीशी वाटते ना, अगदी तसाच प्रकार सीमेवर लढणार्‍या सैनिकांच्या पुतळ्यांवर लत्ताप्रहार करणार्‍यांनी राष्ट्रगीताचा सन्मान नाकारल्यावर घडतो...
पण गेल्या काही वर्षांत असल्या निरर्थक बाबींवर चर्चा करण्यातच वेळ चालला आहे आमचा. एरवी स्वत:च्या टाचा उंचावून, समोरच्याच्या खांद्यावर हात ठेवून उंच होत, गरज पडली तर आपल्या हाताने त्याची मान बाजूला करून गारुड्याचा खेळ बघण्यासाठी ‘गर्दी’ बनणारे लोक आपण, पण खेळ संपल्यावर गारुडी पैसे मागायला फिरू लागताच नकळत विरळ होत जाणार्‍या गर्दीचाही भाग असतो आपणच. तमाशा बघायला सर्वात पुढे आणि जबाबदारी येऊ घातली म्हटलं की लागलीच मागे सरणारे ‘लोक’ असतात माणसं. एखादा अपघात घडला की स्वत:ची गाडी मिळेल त्या जागेतून बाजूला काढून, कोणी मेलं तर नसेल ना हे बघण्यासाठी गाडीतूनच डोकावतात ती. गाडी थोडी पुढे गेली की, हा ताजा अपघात केव्हाच मागे पडतो. मग जुन्या कुठल्याशा अपघातांच्या आठवणीत रमतात ही माणसं. टीव्हीवरच्या सिरीयल्समधील खोट्या नात्यांच्या खोट्याखोट्या ताटातुटीवरून हळवी होणारी, डोळ्यांतून अश्रू ढाळणारी अन् खर्‍याखुर्‍या नात्यांची वीण सैल झाली तरी बिनधास्तपणे जगणारी, त्याची जराही तमा न बाळगणारी माणसंही हीच असतात.
समाजात कोडगेपणासाठी ‘व्यवहारी’ असल्याची प्रमाणपत्रे बहाल होऊ लागली आहेत आताशा. आणि व्यवहारी माणसं फार हुश्शार असतात जगाच्या लेखी. अशा हुशार माणसांना, हळव्या, कामसू लोकांच्या तुलनेत अधिक महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे अलीकडे. त्यातही ही हुशारी माणसं समाजातील प्रथांबद्दल, इथल्या व्यवस्थांबद्दल नकारात्मक बोलू लागली की त्यांनाही अपेक्षित नसेल एवढी अमाप प्रसिद्धी प्राप्त होते त्याला. मग खानांचा आमिर असो की शाहरुख, त्यांनी केलेली नकारात्मक विधानंच दखलपात्र ठरतात समाजाच्या दृष्टीने. त्यावर नको तेवढी चर्चा होते समाजातील बड्या, पांढरपेशा मंडळींची. ही मतं त्यांची त्यांची वैयक्तिक असली तरी त्याला सामाजिक आशय प्राप्त होतो. आता हेच बघा ना! कुणाला तरी वाटलं की चित्रपटगृहात राष्ट्रगीताची धून सुरू असताना त्यांना उठून उभं राहण्याचा आग्रह कुणी धरू नये! ते तसे वागले. गीताची धून सुरू असताना बसून राहिले जागेवर. यावेळी उभ्या असलेल्यांपैकी काही मोजक्या लोकांना ते पटलं नाही. त्यांनी चित्रपटगृहाच्या मालकाकडे तीव्र मतं नोंदवली. राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ ‘त्यांना’ उभं राहावंच लागेल असा आग्रह धरला. शेवटी तसे घडले. त्या हेकेखोरांना लोकाग्रहापुढे नमतं घ्यावं लागलं. इतरांसमवेत उठून उभं राहावं लागलं. त्यांनी त्यांचं मत आपल्या सुरुवातीच्या वर्तणुकीतून व्यक्त केलं होतं. त्यांना गुमान उभं राहायला सांगणारी मंडळी मोजकीच निघाली, पण त्यांची भूमिका कशी योग्य होती हे सांगण्यासाठी सरसावलेल्या मंडळीची तर गणती करणेही दुरापास्त व्हावे, इतकी त्यांची संख्या जास्त आहे. नाना पाटेकर म्हणतात, त्याप्रमाणे हे कोडगेपण असेल, तर मग कोडग्यांची ही वाढलेली संख्या काय दर्शवते? राष्ट्रगीताच्या वेळी उभं राहावं की न राहावं, एखाद्याला वाटत नसेल उभं राहावंसं तर त्याला तसं करू द्यावं की कानाखाली सणसणीत चपराक हाणावी त्याच्या, हे काय विचारणं झालं? पाटेकरांच्या नानालाही बहुधा हे कोडगेपण अपेक्षित नाही. म्हणूनच परवा एका कार्यक्रमात यावरील निरर्थक चर्चेची गरज निकाली काढली त्यानं. आता चेंडू जनतेच्या कोर्टात आहे. असल्या कवडीमोल चर्चेत सहभागी होत कुणाच्यातरी विधानावर टाळ्या पिटायच्या की राष्ट्रगीताचा अवमान करणार्‍यांना जागीच ठेचून काढायचं, हे आपणच ठरवायचं आहे. कारण यापुढे ‘असे’ करणारी मंडळीच कोडग्यांच्या या गर्दीत विरळा ठरणार आहे...

No comments:

Post a Comment