या आठ दिवसांत घडणारं ग्रामीण जीवनदर्शन, तिथल्या चर्चेतून होणारा सामाजिक समस्यांचा ऊहापोह, मनाला चटके लावून जाणारं त्याचं गांभीर्य. राजेंद्र दीक्षित, आनंद कर्वे, विवेक सावंत, बंग दाम्पत्य... अशी समाजासाठी धडपडणारी माणसं बघितली की आपणही असंच काहीतरी जगावेगळं केलं पाहिजे, अशी मनात दाटून येणारी ऊर्मी नंतरच्या कितीतरी काळासाठीची ऊर्जा देऊन जाते. ओढ लागून राहाते ती पुढच्या शिबिराची. त्या आठ दिवसांच्या काळातले भावविश्व मनात साठवण्याची... अगदी मुंबई-पुण्याकडच्या युवकांच्या मनात आडवळणावरच्या गडचिरोलीतील या शिबिराबाबत अशी ओढ निर्माण व्हावी, हे खरं तर या उपक्रमाचं यश. दखल घेण्याजोगं. पहिल्या शिबिरात साठ विद्यार्थी सहभागी झाले होते. हळूहळू ही संख्या वाढत गेली. ती आता थेट दीडशेवर पोहोचली आहे. शिबिरातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांशी संपर्क ठेवण्याची एक स्वतंत्र व्यवस्था अस्तित्वात आली आहे. त्यातून जवळपास ८५० विद्यार्थ्यांचे जाळे तयार झाले आहे. वर्षागणिक ही संख्या वाढत जाणार आहे. दैनंदिन जीवनात काहीतरी आगळंवेगळं करण्यासाठी धडपडणार्यांचे प्रमाण वाढत जाणार आहे... पुढे काय, या प्रश्नाबाबत गोंधळलेल्या अवस्थेत आलेले हे विद्यार्थी शिबिरातून बाहेर पडताना मात्र एका ठाम निर्णयाप्रत पोहोचलेले असतात. शिबिराच्या यशाचे हे गमक आयोजकांना एव्हाना चांगलेच साधले आहे. तिथल्या दिनक्रमात काळानुरूप, गरजनेनुसार आणि अनुभवावरून काही बदल दरवर्षी होत असले, तरी स्वत:ची ओळख, गटातील इतरांची ओळख, सामाजिक प्रश्नांची चर्चा, त्यावरील उत्तरं शोधण्याचा प्रयत्न, शोधलेल्या उत्तरांना अनुसरून ज्यांनी समर्पित आयुष्यातून स्वत:चे विश्व निर्माण केले, असे रोल मॉडल्स त्यांच्यासमोर उभे करणे, हा क्रम मात्र ठरलेला असतो. भविष्यात आपल्या जीवनात आपण काय करायचे, या प्रश्नाचे उत्तर बहुतांशी त्यातनंच मिळालेले असते.
गप्पांच्या कुठल्याशा मैफलीत सुचलेली ती अफलातून कल्पना एक दिवस प्रत्यक्षात साकारली. नंतरच्या काळात त्याचे स्वरूप विस्तारत गेले. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून तरुणाई एका सामाजिक उपक्रमाशी जोडली जाऊ लागली. दशकापूर्वी अंकुरलेल्या बीजांचा अद्याप वटवृक्ष वगैरे झाला नसला, तरी प्रवास आणि प्रयत्न मात्र त्याच दिशेने चालले आहेत. ‘निर्माण’चा या काळातला प्रवास रोमांचक आहे. सांगण्याजोगा, अनुभवण्यासारखा अन् अनुसरण्याजोगा देखील...
गडचिरोलीतल्या ‘सर्च’मध्ये डॉ. अभय बंग, राणी बंग आणि एमकेसीएलचे विवेक सावंत यांची कुठल्याशा विषयावर चर्चा चालली होती. त्यावेळी अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला असलेला अमृत बंगही त्या चर्चेत सहभागी झाला होता. घरावर तुळशीपत्र ठेवून सामाजिक कार्यासाठी स्वत:ला वाहून घेणार्या पिढ्या हळूहळू नामशेष होत असल्याबाबतची चिंता व्यक्त झाली. आज जो तो पैशाच्या मागे लागलेला. भरमसाठ पैसा कमावून ऐश्वर्यसंपन्न जीवन जगण्यापलीकडली स्वप्नंही न बघणार्यांच्या गर्दीत हरवलेल्या तरुणाईला जीवनाचा अर्थ सांगायला हवा. चाकोरीबाहेरचे जीवन जगण्यासाठी त्यांना प्रेरित करायला हवे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जगायचे कशासाठी, या प्रश्नाचे उत्तर स्वत: शोधण्यास प्रत्येकाला भाग पाडायला हवं. झपाटलेपणाने स्वत:ला समाजासाठी झोकून देणार्या सहृदांचा शोध घ्यायला हवा. चर्चेतून कल्पना सुचली अन् मग ती प्रत्यक्षात साकारली ‘निर्माण’च्या स्वरूपात.
आपल्याकडे अस्तित्वात असलेली शिक्षणव्यवस्था दिवसेंदिवस प्रगत होते आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पद्धतींचा वापरही त्यासाठी आताशा होऊ लागला आहे. तरीही त्यातील साचेबद्धता अद्याप होती तशीच आहे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानानं संपन्न झाले, इतकी मोठमोठी पुस्तकं वाचून झाली, तरी शिक्षण संपल्यावर पुढे काय करायचं, असा प्रश्न कुणी विचारला तर नोकरी, लग्न, मुलं, संसार... या चौकटीबाहेरची उत्तरं सहसा सापडत नाहीत. शिक्षण किंवा एकूणच जगण्याचा हेतूच गवसला नाही, तर मग जगणं नीरस होत जातं. ‘निर्माण’ची सारी धडपड तरुणाईला त्या परंपरागत चौकटीतून बाहेर काढण्यासाठीची आहे.
कुठलाच अनुभव गाठीशी नसताना २००६ मध्ये पहिला प्रयोग सुरू झाला. प्रतिसाद किती मिळेल, तो कसा असेल याची धाकधूक मनात होतीच. पण केव्हातरी, कुठूनतरी सुरुवात तर करायला हवी होती. अमृत बंग यांनी पुढाकार घेतला आणि ‘निर्माण’च्या पहिल्या शिबिराचा आराखडा तयार झाला. राज्याच्या एका टोकावर वसलेले गडचिरोली हेच या उपक्रमाचे केंद्र असेल, हेही ठरले. त्यामुळे, या शिबिराचे ठिकाण म्हणजे सभोवतालची आदिवासी गावं हेही एव्हाना निश्चित झालं. दुर्गम गावातलं जीवन कसं असतं, ‘माणूस’ म्हणवणारे तिथले लोक साधन, संसाधनांच्या अभावात कसं जीवन जगतात, हे त्यांना कळायला हवं, याची जाणीव जपतच शिबिरातील दिनक्रमाचे नियोजन झाले. वाटलं नव्हतं, पण पहिल्याच वर्षी निदान शंभरावर अर्ज आलेत. त्यातल्या साठ जणांची निवड निर्माणच्या पहिल्या शिबिरासाठी झाली होती. वर्षभराच्या काळात आठ आठ दिवसांच्या तीन शिबिरांत विद्यार्थ्यांनी उपस्थित राहायचं. शिबिर संपलं की आपापल्या गावी परत जायचं. तिथं आपली नियमित कामं करायची. शिक्षण पूर्ण करायचंय्, हे ठरलेलं. पण या आठ दिवसांत घडणारं ग्रामीण जीवनदर्शन, तिथल्या चर्चेतून होणारा सामाजिक समस्यांचा ऊहापोह, मनाला चटके लावून जाणारं त्याचं गांभीर्य. राजेंद्र दीक्षित, आनंद कर्वे, विवेक सावंत, बंग दाम्पत्य... अशी समाजासाठी धडपडणारी माणसं बघितली की आपणही असंच काहीतरी जगावेगळं केलं पाहिजे, अशी मनात दाटून येणारी ऊर्मी नंतरच्या कितीतरी काळासाठीची ऊर्जा देऊन जाते. ओढ लागून राहाते ती पुढच्या शिबिराची. त्या आठ दिवसांच्या काळातले भावविश्व मनात साठवण्याची... अगदी मुंबई-पुण्याकडच्या युवकांच्या मनात आडवळणावरच्या गडचिरोलीतील या शिबिराबाबत अशी ओढ निर्माण व्हावी, हे खरं तर या उपक्रमाचं यश. दखल घेण्याजोगं.
पहिल्या शिबिरात साठ विद्यार्थी सहभागी झाले होते. हळूहळू ही संख्या वाढत गेली. ती आता थेट दीडशेवर पोहोचली आहे. शिबिरातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांशी संपर्क ठेवण्याची एक स्वतंत्र व्यवस्था अस्तित्वात आली आहे. त्यातून जवळपास ८५० विद्यार्थ्यांचे जाळे तयार झाले आहे. वर्षागणिक ही संख्या वाढत जाणार आहे. दैनंदिन जीवनात काहीतरी आगळंवेगळं करण्यासाठी धडपडणार्यांचे प्रमाण वाढत जाणार आहे... पुढे काय, या प्रश्नाबाबत गोंधळलेल्या अवस्थेत आलेले हे विद्यार्थी शिबिरातून बाहेर पडताना मात्र एका ठाम निर्णयाप्रत पोहोचलेले असतात. शिबिराच्या यशाचे हे गमक आयोजकांना एव्हाना चांगलेच साधले आहे. तिथल्या दिनक्रमात काळानुरूप, गरजनेनुसार आणि अनुभवावरून काही बदल दरवर्षी होत असले, तरी स्वत:ची ओळख, गटातील इतरांची ओळख, सामाजिक प्रश्नांची चर्चा, त्यावरील उत्तरं शोधण्याचा प्रयत्न, शोधलेल्या उत्तरांना अनुसरून ज्यांनी समर्पित आयुष्यातून स्वत:चे विश्व निर्माण केले, असे रोल मॉडल्स त्यांच्यासमोर उभे करणे, हा क्रम मात्र ठरलेला असतो. भविष्यात आपल्या जीवनात आपण काय करायचे, या प्रश्नाचे उत्तर बहुतांशी त्यातनंच मिळालेले असते. गवसलेल्या उत्तराच्या अनुषंगाने मग एक ऍक्शन प्लान तयार होतो. प्रत्येकाने स्वत:साठी, स्वत: तयार केलेला. कुणाला ग्रामीण भागात जीवन व्यतीत करायचे असते, तर कुणाला एखाद्या वृद्धाश्रमात वृद्धांच्या सेवेत. कुणाला संशोधनात कसब सिद्ध करायची इच्छा, तर कुणाला सरकारी सेवेत राहून दुर्गम भागात आरोग्य सेवा देण्याची. काहींना स्वत:चा एखादा प्रकल्प उभारण्याचा ध्यास असतो. ‘निर्माण’चे काम या सर्वांना साह्यभूत ठरण्याचे. प्रत्येकाला त्याचा मार्ग धुंडाळण्यास मदत करण्याचे. मार्गदर्शन करण्याचे. मागे हटायचं नाही. जे ठरवलं ते करण्याचा निदान प्रयत्न तरी करायचाच. यशापयशाची चिंता न करता! रुटीनपासून जरा हटके काही करण्याचा अट्टहास धरणार्यांसाठी ‘कर के देखो’ नावाचा उपक्रमच सोबतीला आहेच. अमेरिकेच्या नामांकित जर्नल्समधून शोधप्रबंध प्रकाशित होण्याची कर्तबगारी या शिबिरातून घडलेल्या विक्रमला सिद्ध करता आलीय्, तर फवारणीचे उपकरण पाठीवर घेऊन शेतातून फिरणार्या शेतकर्याला त्या उपकरणाचे वजन अगदी कमी जाणवावे, यादृष्टीने प्रयोग चाललेत निरंजन नावाच्या एका अभियंत्याचे.
जानेवारीपासून सुरू होऊ घातलेल्या यंदाच्या शिबिरातून ‘निर्माण’ची सातवी बॅच बाहेर पडेल, तेव्हा या जाळ्यातील सदस्यांच्या आकडा हजारावर पोहोचलेला असेल. एखाद्या प्रकल्पात काम करणे असो वा मग सरकारच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून गावखेड्यात सेवा देण्याचा निर्धार, ‘निर्माण’मधून तयार झालेल्या १३० विद्यार्थ्यांनी आपले पुढील आयुष्य जरा हटके जगण्याचा निर्धार केलाय्. भविष्यात ही संख्या अजून वाढणार असल्याचा विश्वास अमृत बंग व्यक्त करतात, तेव्हा एक अनोखा आत्मविश्वास त्यांच्या चेहर्यावर असतो. सामाजिक कार्यासाठी समर्पित भावनेने काम करणार्या पिढ्या नामशेष होत असल्याची भीती केव्हाच मागे पडलेली असते. उलट या युवकांची धडपड बघितली, समाजासाठीच्या समर्पणाची त्यांच्या मनातली भावना जाणवली, त्याबाबतचा त्यांचा निर्धार, त्यांचा तो हुरूप बघितला की भविष्य उज्ज्वल असल्याचा विश्वास आपसूकच जागा होतो. चार भिंतींच्या आत दिल्या जाणार्या पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडले, वास्तव आणि त्यानुरूप जगायला शिकवणार्या एका उपक्रमाच्या यशाचा तो दृश्य परिणाम असतो...
गडचिरोलीतल्या ‘सर्च’मध्ये डॉ. अभय बंग, राणी बंग आणि एमकेसीएलचे विवेक सावंत यांची कुठल्याशा विषयावर चर्चा चालली होती. त्यावेळी अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला असलेला अमृत बंगही त्या चर्चेत सहभागी झाला होता. घरावर तुळशीपत्र ठेवून सामाजिक कार्यासाठी स्वत:ला वाहून घेणार्या पिढ्या हळूहळू नामशेष होत असल्याबाबतची चिंता व्यक्त झाली. आज जो तो पैशाच्या मागे लागलेला. भरमसाठ पैसा कमावून ऐश्वर्यसंपन्न जीवन जगण्यापलीकडली स्वप्नंही न बघणार्यांच्या गर्दीत हरवलेल्या तरुणाईला जीवनाचा अर्थ सांगायला हवा. चाकोरीबाहेरचे जीवन जगण्यासाठी त्यांना प्रेरित करायला हवे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जगायचे कशासाठी, या प्रश्नाचे उत्तर स्वत: शोधण्यास प्रत्येकाला भाग पाडायला हवं. झपाटलेपणाने स्वत:ला समाजासाठी झोकून देणार्या सहृदांचा शोध घ्यायला हवा. चर्चेतून कल्पना सुचली अन् मग ती प्रत्यक्षात साकारली ‘निर्माण’च्या स्वरूपात.
आपल्याकडे अस्तित्वात असलेली शिक्षणव्यवस्था दिवसेंदिवस प्रगत होते आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पद्धतींचा वापरही त्यासाठी आताशा होऊ लागला आहे. तरीही त्यातील साचेबद्धता अद्याप होती तशीच आहे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानानं संपन्न झाले, इतकी मोठमोठी पुस्तकं वाचून झाली, तरी शिक्षण संपल्यावर पुढे काय करायचं, असा प्रश्न कुणी विचारला तर नोकरी, लग्न, मुलं, संसार... या चौकटीबाहेरची उत्तरं सहसा सापडत नाहीत. शिक्षण किंवा एकूणच जगण्याचा हेतूच गवसला नाही, तर मग जगणं नीरस होत जातं. ‘निर्माण’ची सारी धडपड तरुणाईला त्या परंपरागत चौकटीतून बाहेर काढण्यासाठीची आहे.
कुठलाच अनुभव गाठीशी नसताना २००६ मध्ये पहिला प्रयोग सुरू झाला. प्रतिसाद किती मिळेल, तो कसा असेल याची धाकधूक मनात होतीच. पण केव्हातरी, कुठूनतरी सुरुवात तर करायला हवी होती. अमृत बंग यांनी पुढाकार घेतला आणि ‘निर्माण’च्या पहिल्या शिबिराचा आराखडा तयार झाला. राज्याच्या एका टोकावर वसलेले गडचिरोली हेच या उपक्रमाचे केंद्र असेल, हेही ठरले. त्यामुळे, या शिबिराचे ठिकाण म्हणजे सभोवतालची आदिवासी गावं हेही एव्हाना निश्चित झालं. दुर्गम गावातलं जीवन कसं असतं, ‘माणूस’ म्हणवणारे तिथले लोक साधन, संसाधनांच्या अभावात कसं जीवन जगतात, हे त्यांना कळायला हवं, याची जाणीव जपतच शिबिरातील दिनक्रमाचे नियोजन झाले. वाटलं नव्हतं, पण पहिल्याच वर्षी निदान शंभरावर अर्ज आलेत. त्यातल्या साठ जणांची निवड निर्माणच्या पहिल्या शिबिरासाठी झाली होती. वर्षभराच्या काळात आठ आठ दिवसांच्या तीन शिबिरांत विद्यार्थ्यांनी उपस्थित राहायचं. शिबिर संपलं की आपापल्या गावी परत जायचं. तिथं आपली नियमित कामं करायची. शिक्षण पूर्ण करायचंय्, हे ठरलेलं. पण या आठ दिवसांत घडणारं ग्रामीण जीवनदर्शन, तिथल्या चर्चेतून होणारा सामाजिक समस्यांचा ऊहापोह, मनाला चटके लावून जाणारं त्याचं गांभीर्य. राजेंद्र दीक्षित, आनंद कर्वे, विवेक सावंत, बंग दाम्पत्य... अशी समाजासाठी धडपडणारी माणसं बघितली की आपणही असंच काहीतरी जगावेगळं केलं पाहिजे, अशी मनात दाटून येणारी ऊर्मी नंतरच्या कितीतरी काळासाठीची ऊर्जा देऊन जाते. ओढ लागून राहाते ती पुढच्या शिबिराची. त्या आठ दिवसांच्या काळातले भावविश्व मनात साठवण्याची... अगदी मुंबई-पुण्याकडच्या युवकांच्या मनात आडवळणावरच्या गडचिरोलीतील या शिबिराबाबत अशी ओढ निर्माण व्हावी, हे खरं तर या उपक्रमाचं यश. दखल घेण्याजोगं.
पहिल्या शिबिरात साठ विद्यार्थी सहभागी झाले होते. हळूहळू ही संख्या वाढत गेली. ती आता थेट दीडशेवर पोहोचली आहे. शिबिरातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांशी संपर्क ठेवण्याची एक स्वतंत्र व्यवस्था अस्तित्वात आली आहे. त्यातून जवळपास ८५० विद्यार्थ्यांचे जाळे तयार झाले आहे. वर्षागणिक ही संख्या वाढत जाणार आहे. दैनंदिन जीवनात काहीतरी आगळंवेगळं करण्यासाठी धडपडणार्यांचे प्रमाण वाढत जाणार आहे... पुढे काय, या प्रश्नाबाबत गोंधळलेल्या अवस्थेत आलेले हे विद्यार्थी शिबिरातून बाहेर पडताना मात्र एका ठाम निर्णयाप्रत पोहोचलेले असतात. शिबिराच्या यशाचे हे गमक आयोजकांना एव्हाना चांगलेच साधले आहे. तिथल्या दिनक्रमात काळानुरूप, गरजनेनुसार आणि अनुभवावरून काही बदल दरवर्षी होत असले, तरी स्वत:ची ओळख, गटातील इतरांची ओळख, सामाजिक प्रश्नांची चर्चा, त्यावरील उत्तरं शोधण्याचा प्रयत्न, शोधलेल्या उत्तरांना अनुसरून ज्यांनी समर्पित आयुष्यातून स्वत:चे विश्व निर्माण केले, असे रोल मॉडल्स त्यांच्यासमोर उभे करणे, हा क्रम मात्र ठरलेला असतो. भविष्यात आपल्या जीवनात आपण काय करायचे, या प्रश्नाचे उत्तर बहुतांशी त्यातनंच मिळालेले असते. गवसलेल्या उत्तराच्या अनुषंगाने मग एक ऍक्शन प्लान तयार होतो. प्रत्येकाने स्वत:साठी, स्वत: तयार केलेला. कुणाला ग्रामीण भागात जीवन व्यतीत करायचे असते, तर कुणाला एखाद्या वृद्धाश्रमात वृद्धांच्या सेवेत. कुणाला संशोधनात कसब सिद्ध करायची इच्छा, तर कुणाला सरकारी सेवेत राहून दुर्गम भागात आरोग्य सेवा देण्याची. काहींना स्वत:चा एखादा प्रकल्प उभारण्याचा ध्यास असतो. ‘निर्माण’चे काम या सर्वांना साह्यभूत ठरण्याचे. प्रत्येकाला त्याचा मार्ग धुंडाळण्यास मदत करण्याचे. मार्गदर्शन करण्याचे. मागे हटायचं नाही. जे ठरवलं ते करण्याचा निदान प्रयत्न तरी करायचाच. यशापयशाची चिंता न करता! रुटीनपासून जरा हटके काही करण्याचा अट्टहास धरणार्यांसाठी ‘कर के देखो’ नावाचा उपक्रमच सोबतीला आहेच. अमेरिकेच्या नामांकित जर्नल्समधून शोधप्रबंध प्रकाशित होण्याची कर्तबगारी या शिबिरातून घडलेल्या विक्रमला सिद्ध करता आलीय्, तर फवारणीचे उपकरण पाठीवर घेऊन शेतातून फिरणार्या शेतकर्याला त्या उपकरणाचे वजन अगदी कमी जाणवावे, यादृष्टीने प्रयोग चाललेत निरंजन नावाच्या एका अभियंत्याचे.
जानेवारीपासून सुरू होऊ घातलेल्या यंदाच्या शिबिरातून ‘निर्माण’ची सातवी बॅच बाहेर पडेल, तेव्हा या जाळ्यातील सदस्यांच्या आकडा हजारावर पोहोचलेला असेल. एखाद्या प्रकल्पात काम करणे असो वा मग सरकारच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून गावखेड्यात सेवा देण्याचा निर्धार, ‘निर्माण’मधून तयार झालेल्या १३० विद्यार्थ्यांनी आपले पुढील आयुष्य जरा हटके जगण्याचा निर्धार केलाय्. भविष्यात ही संख्या अजून वाढणार असल्याचा विश्वास अमृत बंग व्यक्त करतात, तेव्हा एक अनोखा आत्मविश्वास त्यांच्या चेहर्यावर असतो. सामाजिक कार्यासाठी समर्पित भावनेने काम करणार्या पिढ्या नामशेष होत असल्याची भीती केव्हाच मागे पडलेली असते. उलट या युवकांची धडपड बघितली, समाजासाठीच्या समर्पणाची त्यांच्या मनातली भावना जाणवली, त्याबाबतचा त्यांचा निर्धार, त्यांचा तो हुरूप बघितला की भविष्य उज्ज्वल असल्याचा विश्वास आपसूकच जागा होतो. चार भिंतींच्या आत दिल्या जाणार्या पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडले, वास्तव आणि त्यानुरूप जगायला शिकवणार्या एका उपक्रमाच्या यशाचा तो दृश्य परिणाम असतो...