Sunday, May 25, 2014

मियॉंदाद चालतो, तर शरीफ का नाही?

अशा वेळी सरकारच्या स्पष्ट निर्णयाची अन् प्रशासनाच्या कठोर भूमिकेची गरज आहेच. पण, म्हणून एखाद्या गावात सार्वजनिक नळावर होतात तशी भांडणं करता येत नाहीत दुसर्‍या देशाच्या पंतप्रधानांशी अन् शेजार्‍याशी धरतात तसा अबोलाही धरता येत नाही इथे. रशियाशी मैत्री केल्याने अमेरिकेच्या रोषाचा सामना भारताला सातत्याने करावा लागला आहे. पण, म्हणून अमेरिकेच्या दौर्‍यावरच न जाण्याचा, त्यांच्याशी गट्टीफू करण्याचा निर्णय घेता आला नाही कधी या देशाला. अगदी बांगलादेशाच्या निर्मितीच्या वेळीही जगातल्या इतर देशांप्रमाणेच अमेरिकेपुढेही भारताची भूमिका मांडून आपली बाजू मजबूत करण्याची रणनीती तत्कालीन पंतप्रधानांनी रचली होती, अमेरिका भारताच्या साथीला नसल्याची पुरेपूर जाणीव असतानाही. त्या वेळी या रणनीतीचे भरपूर कौतुकही झाले होते. आताही पाकिस्तानची भूमिका कुणाला ठाऊक नाही? दर दोन दिवसांनी सीमेवर कुरघोड्या करणार्‍या पाकिस्तानबद्दलची मोदींच्या मनात असलेली भावना उद्धव ठाकरेंच्या भावनेपेक्षा वेगळी थोडीच असणार आहे? पण, म्हणून शपथविधी सोहळ्यात त्यांना निमंत्रण न धाडणे, हे वानखेडे स्टेडियमवरील क्रिकेटची पिच खोदून भारत-पाक सामना रद्द करण्यास बाध्य करण्याच्या पोरखेळाइतके सहज थोडीच आहे. शिवाय, ज्यांना जावेद मियॉंदाद बाळासाहेब ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर आलेला चालतो, त्यांनी शरीफांच्या भारत भेटीवर आगपाखड करावी, नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याच्या नेमक्या मुहूर्तावर रोष व्यक्त करावा, हे जरासे अनाकलनीयच आहे. 
आंतरराष्ट्रीय राजकारणात युद्धापेक्षाही शांततेच्या काळातील एखाद्या देशाची भूमिका अधिक महत्त्वाची मानली जाते. शत्रुराष्ट्रांशी काही दररोजच युद्ध करायचे नसते अन् त्यांच्याशी होणार्‍या शांतिवार्तांवरही खूप अवलंबून राहायचे नसते. शांतिवार्ता करतानाही सीमेवरचे सैन्य युद्धासाठी सज्ज ठेवायचे असते.
पण, बहुधा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या या राजकारणाची शैली शिवसेना नेत्यांना भावलेली दिसत नाहीय्. म्हणूनच की काय, नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण पाकिस्तानच्या पंतप्रधानांना पाठविलेले त्यांना म्हणे मुळीच आवडलेले नाही. त्यात नवाज शरीफांनी या सोहळ्याला उपस्थित राहण्याचा निर्णय जाहीर केला, तो तर त्यांना जराही खपलेला नाही. त्यामुळे गरज पडली, तर शपथविधी सोहळ्यात शरीफांच्या उपस्थितीत आपल्या पक्षाच्या मंत्र्यांनी शपथ घेऊ नये, अशी कठोर भूमिका स्वीकारण्याच्या मन:स्थितीत शिवसेना आली असल्याचेही वृत्त आहे.भावनिक पातळीवर शिवसेनेची भूमिका समर्थन करण्याजोगी असली, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे राजकारण करताना निर्णय भावनिक पातळीवर जाऊन घेता येत नाहीत. इथे अनेकदा चेहरा हसरा ठेवून कठोर निर्णय घ्यावे लागतात, तर कित्येकदा दु:ख पचवून चेहरा हसरा ठेवावा लागतो. सेनेच्या राजकारणात मनोहर जोशींशी ठाकरेंची वागणूक नाही का याच प्रकारात मोडत? तेच आंतरराष्ट्रीय राजकारणातही करावे लागते.
हे खरं आहे की, जगातल्या इतर देशांच्या तुलनेत पाकिस्तानबद्दलच्या भारतीयांच्या भावना काहीशा वेगळ्या आहेत. या दोन देशांमधील संबंधांना धर्माच्या आधारे झालेल्या फाळणीची पार्श्‍वभूमी आहे, नंतरच्या काळात बांगलादेशाच्या रूपात पाकिस्तानची झालेली शकले अन् त्याबाबत तिथल्या लोकांच्या मनातल्या रोषाचीही जोड त्याला मिळाली आहे. दोन्ही देशांतल्या लोकांच्या मनातल्या एकमेकांबद्दलच्या भावना, क्रिकेटचा सामना असो, की काश्मीरच्या मुद्यावर दिल्या जाणार्‍या घोषणा, त्यातून व्यक्त होत असतात.
या पार्श्‍वभूमीवर ठाकरेंनी व्यक्त केलेल्या भावनांचे भावनिक आधारावर काही लोक समर्थनही करतील. पण, यापेक्षाही लोकांना मोदींचा निर्णय अधिक भावला आहे. पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वीच त्यांनी भविष्यातील त्यांच्या कार्यपद्धतीची दिशा स्पष्ट केली आहे. आज भारतीय सीमा असुरक्षित आहेत. सीमेपलीकडच्या कारवायांनी देश अस्वस्थ आहे. चीनसारख्या देशाने तर घुसखोरी करून अरुणाचलसारखा प्रांत घशात टाकण्याचे मनसुबे रचले आहेत. पाकिस्तानमधून दहशतवादाला मिळणारे प्रोत्साहन भारतासाठी नेहमीच डोकेदुखी ठरली आहे. बांगलादेशातून होणारी घुसखोरी केवळ सुरक्षेच्या दृष्टिनेच नाही, तर इथल्या अर्थव्यवस्थेवरील ओझ्याच्या आणि सामाजिक असमतोलाच्या दृष्टीनेही समस्येत भर घालणारी आहे. अशा वेळी सरकारच्या स्पष्ट निर्णयाची अन् प्रशासनाच्या कठोर भूमिकेची गरज आहेच. पण, म्हणून एखाद्या गावात सार्वजनिक नळावर होतात तशी भांडणं करता येत नाहीत दुसर्‍या देशाच्या पंतप्रधानांशी अन् शेजार्‍याशी धरतात तसा अबोलाही धरता येत नाही इथे. रशियाशी मैत्री केल्याने अमेरिकेच्या रोषाचा सामना भारताला सातत्याने करावा लागला आहे. पण, म्हणून अमेरिकेच्या दौर्‍यावरच न जाण्याचा, त्यांच्याशी गट्टीफू करण्याचा निर्णय घेता आला नाही कधी या देशाला. अगदी बांगलादेशाच्या निर्मितीच्या वेळीही जगातल्या इतर देशांप्रमाणेच अमेरिकेपुढेही भारताची भूमिका मांडून आपली बाजू मजबूत करण्याची रणनीती तत्कालीन पंतप्रधानांनी रचली होती, अमेरिका भारताच्या साथीला नसल्याची पुरेपूर जाणीव असतानाही. त्या वेळी या रणनीतीचे भरपूर कौतुकही झाले होते. आताही पाकिस्तानची भूमिका कुणाला ठाऊक नाही? दर दोन दिवसांनी सीमेवर कुरघोड्या करणार्‍या पाकिस्तानबद्दलची मोदींच्या मनात असलेली भावना उद्धव ठाकरेंच्या भावनेपेक्षा वेगळी थोडीच असणार आहे? पण, म्हणून शपथविधी सोहळ्यात त्यांना निमंत्रण न धाडणे, हे वानखेडे स्टेडियमवरील क्रिकेटची पिच खोदून भारत-पाक सामना रद्द करण्यास बाध्य करण्याच्या पोरखेळाइतके सहज थोडीच आहे. शिवाय, ज्यांना जावेद मियॉंदाद बाळासाहेब ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर आलेला चालतो, त्यांनी शरीफांच्या भारत भेटीवर आगपाखड करावी, नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याच्या नेमक्या मुहूर्तावर रोष व्यक्त करावा, हे जरासे अनाकलनीयच आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरची समीकरणे वेगळी असतात. त्याची पुरेशी जाणीव असताना शिवसेनेने शपथविधी सोहळ्याच्या तोंडावर जाहीरपणे व्यक्त केलेली भावना, काल-परवाच भाजपा आणि मित्रपक्षांच्या झोळीत भरभरून मतांचे दान टाकणार्‍या मतदारांच्या मनात अकारण रोष निर्माण करणारी आहे. ठाकरेंच्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा प्रश्‍न निकाली निघू शकत नाही. बरं, हा देश दूरवर कुठेतरी सातासमुद्रापलीकडे वसलेला असता, तर उद्धव म्हणतात त्याप्रमाणे त्याच्याशी कुठलेच संबंध न ठेवण्याच्या कठोर निर्णयाप्रत येता आलेही असते. पण, परिस्थिती तशी नाही. हा देश आपला शेजारी आहे. आपल्या खोड्या काढण्याची त्याची सवय माहीत असली, तरी त्याला उत्तरही मुत्सद्देगिरीनेच द्यावे लागणार आहे. एक मात्र खरे की, या संदर्भातली या आधीच्या सरकारची ढेपाळलेली मवाळ भूमिका नाकारण्याचा स्वाभिमानी निर्णय सरकारला नक्कीच घेता येणार आहे. तो घेण्यासाठी ठाकरेंनी जरूर आग्रह धरावा. देशभरातील जनतेने मोठ्या आशेने कॉंग्रेसला हुसकावून एनडीएच्या हाती सत्ता सोपविली आहे. महाराष्ट्रही त्याच लाटेच्या भरवशावर सत्तापरिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहे. अशात दरवेळी मतभेदाचे जाहीर प्रदर्शन मांडण्याची तर्‍हा अयोग्य असल्याची बाब एनडीएतील सर्वच घटकपक्षांनी ध्यानात घ्यायला हवी.

No comments:

Post a Comment