Friday, September 28, 2018

प्रश्न व्यभिचाराचा : उत्तर कायद्याच्या चौकटीपलीकडले!

 
न्यायालयाने व्यभिचाराला कुठेही प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेली नाहीउलट नैतिकतेच्या पातळीवर तो अयोग्यच ठरविला आहेहा यातील अधोरेखित करण्याजोगा दखलपात्र असा महत्त्वपूर्ण मुद्दापरवा रद्दबातल ठरवला गेला तो इंग्रजकालीन कायदाकाळ बदलतोय्‌, समाज सर्वार्थाने बदलतोय्‌. तंत्रज्ञानापासून तर उंचावलेल्या राहणीमानाच्या आडून आलेल्या भौतिक सुविधांपर्यंत सर्वांचेच स्वरूप बदललेसारेकाही बदलतेय्‌, तर मग कायदा प्रवाही नकोकालबाह्य ठरलेल्या सार्याच बाबी जर आम्ही कचर्याच्या टोपलीत टाकत निघालोय्‌, तर मग कायदा कसा दीडशे वर्षांपूर्वीचा असूनही चालवून घेता येईल?तो कसा इंग्रजांच्या पद्धतीने चालेलएकदा जराहा कायदा खारीज करण्यामागील भूमिकाही समजून घेतली पाहिजेते करायचे सोडून,न्यायालयाने जणू विवाहबाह्य संबंधांना परवानगीच दिली असल्याच्या थाटातला थयथयाट करण्यात काही लोकांचा उत्साह ओसंडून वाहतो आहेकालपर्यंत या समाजात विवाहबाह्य संबंध अजीबातच अस्तित्वात नव्हते आणि आता या निर्णयानंतर उद्यापासून लागलीच तसल्या संबंधांना ऊत येणार असल्याचे कुणाचे मत असेलतर मग आमच्यासारखे दांभिक फक्त आम्हीच

वैयक्तिक जीवनातील विवाहबाह्य संबंधांचा मुद्दा थेट न्यायालयाच्या दालनात मांडला गेलानैतिकदृष्ट्या गैर ठरवतफौजदारी कारवाईसाठी मात्र तो अपात्र ठरविण्याचा निर्णय परवा न्यायासनाने जाहीर केला अन्‌ समाजमन पुन्हा एकदा ढवळून निघालेपुन्हा एकदा एवढ्यासाठी कीकाल-परवाच समलैंगिकतेच्या विषयावर ते पुरते ढवळून निघाले होतेआता या मुद्यावरून त्याची पुनरावृत्ती झाली एवढेचआधीसमलैंगिक संबंध ठेवणार्यांना कायद्याच्या कचाट्यातून सूटआणि आता हे प्रकरणमग खूनदरोडे,चोर्याचपाट्या करायलाही कायद्याने मान्यता देऊन टाका एकदाचीम्हणजे समाजात कुणालाच कशाचेच बंधन उरणार नाही...! अशा तीव्र प्रतिक्रियाही स्वाभाविकपणे उमटताहेत या संदर्भात.
 
मुळातच संस्कार आणि नैतिकतेच्या बळावर उभ्या राहिलेल्यावैचारिकदृष्ट्या प्रगत अन्‌ पुरेशा प्रगल्भ अशा भारतीय समाजाने या संदर्भात खूप वेगवेगळ्या दृष्टीने विचार करण्याची गरज आहेन्यायालयाने व्यभिचाराला कुठेही प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेली नाहीउलट नैतिकतेच्या पातळीवर तो अयोग्यच ठरविला आहेहा यातील अधोरेखित करण्याजोगा दखलपात्र असा महत्त्वपूर्ण मुद्दापरवा रद्दबातल ठरवला गेला तो इंग्रजकालीन कायदाकाळ बदलतोय्‌, समाज सर्वार्थाने बदलतोय्‌. तंत्रज्ञानापासून तर उंचावलेल्या राहणीमानाच्या आडून आलेल्या भौतिक सुविधांपर्यंत सर्वांचेच स्वरूप बदललेसारेकाही बदलतेय्‌, तर मग कायदा प्रवाही नकोकालबाह्य ठरलेल्या सार्याच बाबी जर आम्ही कचर्याच्या टोपलीत टाकत निघालोय्‌, तर मग कायदा कसा दीडशे वर्षांपूर्वीचा असूनही चालवून घेता येईल?तो कसा इंग्रजांच्या पद्धतीने चालेलएकदा जराहा कायदा खारीज करण्यामागील भूमिकाही समजून घेतली पाहिजेते करायचे सोडून,न्यायालयाने जणू विवाहबाह्य संबंधांना परवानगीच दिली असल्याच्या थाटातला थयथयाट करण्यात काही लोकांचा उत्साह ओसंडून वाहतो आहेकालपर्यंत या समाजात विवाहबाह्य संबंध अजीबातच अस्तित्वात नव्हते आणि आता या निर्णयानंतर उद्यापासून लागलीच तसल्या संबंधांना ऊत येणार असल्याचे कुणाचे मत असेलतर मग आमच्यासारखे दांभिक फक्त आम्हीचहे लक्षात घेतले पाहिजे.
 
समाजव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी एका मर्यादेत कायद्याचीत्याच्या कठोर अंमलबजावणीची गरज असतेहे मान्य केले तरी ही व्यवस्था केवळ तेवढ्यावरच चालत नाहीविशेषतभारतीय समाज तर नैतिकतेच्या अधिष्ठानावर उभा राहिला आहे कित्येक वर्षे.समाजमनात अंकुरलेल्या संस्कारांचीही सुरेख साथसंगत त्याला लाभत आली आहेसंस्कार आणि नैतिकतेची मुळं अधिक खोलवर रुजली असल्याची आणि कायद्याच्या तुलनेत तीच अधिक प्रभावी ठरली आहेत आजवरराजा दशरथाने कैकेयीला दिलेल्या वचनाची पूर्ती करण्याचे बंधनपुत्र म्हणून प्रभू रामचंद्रांना कुठल्या कायद्याने घालता आले असते सांगापणसंस्कारांचे अधिष्ठानच इतके मजबूत होते कीबंधन घालणार्या कायद्याची गरजच पडली नाहीवडिलांनी दिलेल्या वचनाची जबाबदारी आपण का स्वीकारावी,राजिंसहासनावरील अधिकार सोडून वनवास का भोगावाअसा साधा प्रश्नही प्रभू रामचंद्रांना पडला नाहीज्या व्यवस्थेत असल्या कुठल्याही संकेतांचा वा अधिष्ठानाचा अभाव आहेत्यांनी कायद्याच्या बंधनात जखडून समाजरचना सुरळीत राहीलअशी व्यवस्था उभारलीइंग्रजी हुकुमत हद्दपार केल्यानंतरही आम्ही त्याच इंग्रजांचे कायदे डोळे झाकून स्वीकारलेसंकेतनैतिकतासंस्कार बासनात गुंडाळून ठेवतस्वत:ला कायद्याच्या चौकटीत तोलूमापू लागलोनव्हेत्याचा अभिमानही वाटू लागला आम्हालाचौकातला सिग्नलचा नियम पाळायलाही मग पोलिस शिपायाचा धाक अनिवार्य ठरलाघरात वादच उत्पन्न होणार नाहीतअशी व्यवस्था निर्माण करण्याची कल्पना बाद ठरलीउलट घरातलेवैयक्तिक वाद पोलिसन्यायालयाच्या पातळीवर चव्हाट्यावर आणण्याची आणि त्रयस्थांकडून तो सोडवून घेण्याची तर्हा अंगवळणी पडू लागली...
 
प्रश्नाचे मूळ शोधायचे सोडून त्याच्या उत्तराच्या पद्धतीवर वाद घालण्यातच मशगूल आहेत लोक इथेयाच समाजाचा एक भाग असलेल्या वनवासी बांधवांच्या संदर्भात परवा उद्धृत झालेले एक विधान बोलकेच नव्हेतर नागर समाजाच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे ठरावेसर्वांच्याच लेखी अशिक्षितअडाणीमागास ठरलेल्या आदिवासी समूहातील लोक अंगावर पुरेसे कपडे नसलेल्या अवस्थेत जगताततरीही तिथे बलात्काराच्या घटना घडत नाहीतएकमेकांची फसवणूक करत नाही कुणीघटस्फोटही नाहीत तिथे.वाद उद्भवलाच कधी कुटुंबाततर वनवासी लोक त्यांच्या स्तरावर त्यावरील उपाय योजतातत्याचा गाजावाजा करीत नाहीत अन्‌ बाऊ तर मुळीच करत नाहीततरुणाईला मोकळीक देणारीस्वत:चा साथीदार निवडण्याचे अधिकार प्रदान करणारी समाजमान्य अशीगोटूल’ व्यवस्था सर्वांसाठीच औत्सुक्याचाकुतूहलाचा विषयगोटूल तर त्यांच्यातल्या पुढारलेपणाचे लक्षण मानले जातेफक्त शहरी भागातल्या तरुणांना तसे अधिकार बहाल करायचे म्हटलं कीमात्र लागलीच समाजव्यवस्था बिघडण्याची आवई उठविली जातेदोन व्यक्तींचे लग्न झाल्यावर त्यांच्यात बेबनाव झाला असेलतर तो पोलिस कसा मिटवू शकतीलहा प्रश्नही पडत नाही इथे कुणालाच!लग्नसंस्था टिकावी म्हणून विभक्त होण्याची प्रक्रिया जटिल करण्याची भूमिका इंग्लंडमध्ये अस्तित्वात असणे स्वाभाविक आहे.अन्यथासमाज अनिर्बंध होण्याची भीती त्यांना आहेम्हणून त्यांनी कायदे कठोर केले असतीलतर तेही समजता येईल एकवेळपण,भारतीय समाजाला काय झालंतो का म्हणून त्यांच्या पद्धतीने आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधतोय्‌? घटस्फोटाची संकल्पना आपल्या व्यवस्थेला कुठे मान्य आहेबरंइंग्रजांकडून आंधळेपणाने उधार घेतलेले कठोरातले कठोर कायदे अस्तित्वात असतानाही अलीकडच्या काळात भारतीय समूहात घटस्फोटांचे प्रमाण कमालीच्या बाहेर का वाढावेआम्ही शोधतोय्‌ त्या कायद्याच्या चौकटीत या प्रश्नाचे उत्तर सापडणारच नाहीयेकारण मुळात ते तिथे दडलेलेच नाही!
 
विवाहबाह्य संबंधांचा तरी कुठे अपवाद आहे यालाइंडियन पिनल कोडमधील ज्या सेक्शन 497 मध्ये या संबंधांचा उल्लेख आहे, 158वर्षांपूर्वी तो उल्लेख कुठून आलाका आला असेलही बाब अस्तित्वात होती म्हणूनकी कसलाही विचार न करता इंग्रजी व्यवस्थेतले कायदे उचलून नव्या भारतीय व्यवस्थेत ते जसेच्या तसे लागू करण्याचा तो परिणाम होतामानवी समूहातील सारेच प्रश्न न्यायालयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवण्याची सवय जडल्यानेकारवाई करताना स्त्री-पुरुषांपैकी एकाशी भेदभाव करणारी या कायद्यातील तरतूद आक्षेपार्ह ठरवतकुणीतरी न्यायालयात गेलं आणि हा मुद्दा चर्चेत आलाआजघडीला तोच एकमेवऐरणीवरचा विषय असल्याचा आभास माध्यमांनी अगदी व्यवस्थितपणे निर्माण केलासमाजहिताच्या पलीकडे वैयक्तिक स्वातंत्र्याचे स्तोम किती माजवायचेन्यायव्यवस्थेनेही एखाद्याच्या व्यक्तिगत जीवनात कुठवर हस्तक्षेप करायचाकाही गोष्टी वैयक्तिकसामाजिक स्तरावर सोडून देण्याचेही औदार्य दाखवावे नान्यायालयानेही कधीतरी!
 
कलम 377 असो की 497, ते पूर्णतवा अंशतखारीज केल्याबरोबर लागलीच दुसर्या दिवशीपासून अराजक निर्माण व्हायलासमाजात रुजलेले संस्कार आणि नैतिकतेचा पाया इतकाही तकलादू नाहीपणतो दिवसागणिक ठिसूळ होतोय्‌ हे मात्र खरंभारतीयांना असलेले पाश्चिमात्य जीवनशैलीचे प्रचंड आकर्षणत्यानुरूप जगण्याचीसोयीच्या ठरलेल्या मर्यादित चौकटीत संपूर्ण आयुष्याचे सार शोधण्याची धडपडहे त्यामागचे कारण असावे कदाचितपणत्यातून उद्भवलेले प्रश्नकठोर कायद्याच्या माध्यमातून सुटतीलहा मात्र केवळ भ्रम आहेमूल्याधिष्ठित पायव्यावर समाज भक्कमपणे उभा राहिलातर हे प्रश्न उद्भवणारदेखील नाहीत कदाचितपण दुर्दैवाने,नेमके तेवढे करायचे सोडून बाकी सगळं करतोय्‌ आपण...

Friday, September 21, 2018

निमित्त अनुप जलोटांच्या लग्नाचे...

पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करताना किंवा एरवीही अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा उदोउदो करतानाएखाद्याच्या खाजगी आयुष्यात नेमके किती खोलवर शिरायचेत्याची जाहीर रीत्या किती वाच्यता आणि चर्चा करायचीयाचे तारतम्य कुणीच बाळगत नाहीत्या चर्चेची उपयोगिता हा तर आणखीच वेगळा मुद्दा आहेसध्याच्या चर्चेचा अनुप जलोटांवर किती परिणाम झालायाचे मोजमाप करायला कुठलेही परिमाण उपलब्ध नाहीअन्यथा आपण उगाच तोंडाची वाफवेळ किती वाया घालवतो आहोतयाची कल्पना तरी आली असती लोकांनाएरवी वैचारिक प्रगल्भतेच्या गप्पा मारतातच लोकतर मग त्यांच्या त्यांच्या खाजगी जीवनाचा एक भाग म्हणून सोडून देता येणार नाही हा मुद्दा आपल्यालाबरंआयुष्यात दोन-तीन लग्नं केलेली माणसं काय कमी आहेत समाजातएक गायकया पलीकडे अनुप जलोटांचं स्थान काय आहे तुमच्या-आमच्या जीवनातगायनाच्या क्षेत्रात त्यांनी भजन हा प्रकार निवडलाउत्तम दर्जाच्या कलेचे सादरीकरण करीतकितीतरी दिवसपर्यंत लोकांचे मनोरंजन केलेभरपूर पैसा कमावलापणशेवटी जलोटा हे केवळ एक गायक आहेतते काही साधुसंत नाहीतहेही समजून घेतले पाहिजेसंतपदाला पोहोचलेल्या व्यक्तींना अवचित स्फुरलेल्या पंक्तीतून वाहणारी भक्तिधारा सुरांच्या माध्यमातून वर्षानुवर्षे लोकांपर्यंत पोहोचविल्यानंतरही ईश्वरचरणी लीन होण्याची पात्रता त्यांच्या अंगी आली नाही म्हणून त्यांना हिणवतानातसली पात्रता आपण स्वतकमावली असल्याचा दावा करण्याचे धारिष्ट्य किती लोकांना दाखवता येईल


जगातले इतर सगळे प्रश्न संपले अन्‌ आता फक्त अनुप जलोटांच्या तिसर्या लग्नाचाच तेवढा मुद्दा संपूर्ण समाजासाठी ऐरणीवर असल्याच्या थाटात वागतो आहोत आपण सारेसध्या इतके त्याचे चर्वितचर्वणइतका त्याच्यावरचा विनोद चालला आहे कीबस्स!दुसरा कुठला मुद्दा शिल्लकच राहिला नसल्याच्याचेच चित्र आहे सर्वदूरबहुधा हेच भारतीय समाजाचे वैशिष्ट्य असावेवर्तणुकीतील वैचित्र्याचे दर्शन घडविणारेसोयकाळ अन्‌ व्यक्तिपरत्वे विचारांची दिशा बदलणारेपाश्चिमात्यांच्या आधुनिक नपेक्षामुक्त जीवनशैलीचेतिथल्या झगमगाटाचे प्रचंड आकर्षणजगण्याची ती निर्बंध तर्हा भावलेल्या आपल्या लोकांना तिथली शिस्ततिथल्या लोकांची सचोटीमेहनत या बाबींचे मात्र कमालीचे वावडेआम्हाला जागोजागी दारूची दुकानंही हवीत अन्‌ समाज निर्व्यसनी राहिला पाहिजे याबाबतचा आमचा दुराग्रहही तितकाच टोकाचाकाळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला विनासायास जामीन मिळण्याचेही इथे कुणालाच आश्चर्य वाटत नाहीकारण समाजाच्या लेखी ती आसामीच इतकी मोठी कीतिने फार काळ कारागृहात राहणेसलमान आणि त्याच्या नातेवाईकांना तर सोडाचपण दस्तुरखुद्द आम जनतेलाही मान्य नसतेपंडित नेहरूनेहरूनंतर इंदिरा,इंदिरानंतर राजीवराजीवनंतर सोनियांनी आणि त्यांना होता नाही आले तरी आता त्यांचे ‘सुपुत्र राहुल यांनी भारताचे पंतप्रधान होणे क्रमप्राप्त असल्याचानव्हेतो गांधी कुटुंबाचा अधिकार असल्याचा गैरसमज करून बसलेला हा समाजइथले नियम आणि कायदे बड्या धेंडांनी पाळण्याची गरज नसल्याच्या भ्रमातही वावरतोनव्हेतसे त्याचे ठाम मत असतेकारणसमानतेच्या कितीही बाता हाणल्या जात असल्या तरी मुळातश्रेष्ठ आणि कनिष्ठांसाठीचे स्वतंत्र निकष समाजमनात फार पूर्वीपासून घर करून बसले आहेत.
 
स्वत:ला वास्तवात शक्य नसलेल्या सर्वच गोष्टींबाबतची स्वप्नं आणि समाधान हा समाज अलीकडचे चित्रपटदूरचित्रवाणीवरील मालिकांमधील अत्याधुनिकतेची झालर लेऊन सादर झालेली कथानकं अन्‌ झगमगाटात धुंडाळत राहतोत्याच वेळी वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातील आचरणाबाबतच्या संस्कारांशीही त्याचा कडवा संघर्ष चाललेला असतोचांगल्या-वाईटांच्या संकल्पनांबाबत मनात कुठेच संभ्रम नसलाबहुतांश लोक त्यातील चांगल्याच बाबींची निवड करीत असलेतरी वाईटाची कास धरणार्यांना करावयाच्या शिक्षेबाबत मात्र त्याची भूमिका दुटप्पी होत जातेगुन्हा करणारी व्यक्ती कोणयावरून त्या शिक्षेची तीव्रता ठरतेस्वत:चे आकलनशक्तीआर्थिक परिस्थितीव्यक्तिमत्त्व आणि एकूणच परिघाबाहेरच्या ठरलेल्या गोष्टींबाबत सर्वसामान्य माणसांची अवस्था फार बिकट होतेसामाजिक वर्तणुकीबाबत तो बराचसा खबरदारीजबाबदारीचे भान राखून असतोत्या परिस्थितीत इतर कुणी विपरीत वागले की मात्र त्याची अस्वस्थता वाढत जातेपुष्कळदा समाजस्वास्थ्य बिघडण्याची िंचता त्यामागे दडलेली असतेतर कित्येकदा तसल्या वागण्याबाबतच्या कुतूहलाचीही किनार त्याने या संदर्भात स्वीकारलेल्या भूमिकेला लाभलेली असते.
 
वैयक्तिक जीवनातील आचरणाबाबत प्रभू रामचंद्रांचा आदर्श असतो प्रत्येकाच्या ठायी इथेदिलेला शब्द पाळण्यापासून तर त्यासाठी कराव्या लागणार्या संघर्षापर्यंत आणि त्यागापासून तर एकपत्नित्वाच्या व्रतापर्यंत... बदललेल्या परिस्थितिनुरूप कालबाह्य बाबी बाजूला सारून नव्या संकल्पना अंगीकारण्याचीही त्याची तयारी असतेबालविवाहापासून तर हुंड्याच्या पद्धतीपर्यंत कित्येक गोष्टी केराच्या टोपलीत टाकून हा समाज पुढे जाऊ शकला आहेतो त्यामुळेचतरीही विराट कोहली अन्‌ अनुष्का शर्माच्या लग्नाबाबत तो कमालीचा उत्सुक असतोकाही संबंध नसताना सहभागी होतो तोत्या संदर्भातील चर्चेतअभिषेक-ऐश्वर्या बच्चन यांना झालेल्या बाळाचे लाड कसे पुरवले जाताहेतहे जाणून घेण्यासाठीही तो नको तितका उतावीळ झालेला असतोअनुप जलोटाने वयाच्या सत्तराव्या दशकात केलेल्या तिसर्या विवाहाची चर्चा केल्याविनाही त्याला राहावत नाहीजलोटांनी बिग बॉस नामक एका तद्दन फालतू कार्यक्रमात चालवलेली थेरं... यामध्येही नाही म्हणायला त्याचा रस असतो तो असतोचकधीकाळी ज्यांच्या भजनात लोक तल्लीन व्हायचेते जलोटा वयाच्या सत्तरीत बिग बॉसमध्ये कुठल्याशा प्रसंगात राण्यांच्या गराड्यातील राजाची भूमिका साकारण्याचे उपद्व्याप करतातइतक्यातच त्यांचं खरंखुरं नवं लग्नंही झालेलं असते आणि तोच आता लोकांच्याही चघळण्याचा विषय झालेला असतो.अतिशय निम्न दर्जाची फालतुगिरी असूनही ‘बिग बॉस’ यशस्वी का ठरतो माहीत आहेत्याला कारणपूर्ण कल्पना असतानाही त्या फालतुगिरीला लाभणारे लोकांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठबळ हे आहे.
 
दुसरं असं कीपाश्चात्त्यांचे अंधानुकरण करताना किंवा एरवीही अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा उदोउदो करतानाएखाद्याच्या खाजगी आयुष्यात नेमके किती खोलवर शिरायचेत्याची जाहीर रीत्या किती वाच्यता आणि चर्चा करायचीयाचे तारतम्य कुणीच बाळगत नाहीत्या चर्चेची उपयोगिता हा तर आणखीच वेगळा मुद्दा आहेसध्याच्या चर्चेचा अनुप जलोटांवर किती परिणाम झालायाचे मोजमाप करायला कुठलेही परिमाण उपलब्ध नाहीअन्यथा आपण उगाच तोंडाची वाफवेळ किती वाया घालवतो आहोतयाची कल्पना तरी आली असती लोकांनाएरवी वैचारिक प्रगल्भतेच्या गप्पा मारतातच लोकतर मग त्यांच्या त्यांच्या खाजगी जीवनाचा एक भाग म्हणून सोडून देता येणार नाही हा मुद्दा आपल्यालाबरंआयुष्यात दोन-तीन लग्नं केलेली माणसं काय कमी आहेत समाजातएक गायकया पलीकडे अनुप जलोटांचं स्थान काय आहे तुमच्या-आमच्या जीवनातगायनाच्या क्षेत्रात त्यांनी भजन हा प्रकार निवडलाउत्तम दर्जाच्या कलेचे सादरीकरण करीतकितीतरी दिवसपर्यंत लोकांचे मनोरंजन केलेभरपूर पैसा कमावलापणशेवटी जलोटा हे केवळ एक गायक आहेतते काही साधुसंत नाहीतहेही समजून घेतले पाहिजेसंतपदाला पोहोचलेल्या व्यक्तींना अवचित स्फुरलेल्या पंक्तीतून वाहणारी भक्तिधारा सुरांच्या माध्यमातून वर्षानुवर्षे लोकांपर्यंत पोहोचविल्यानंतरही ईश्वरचरणी लीन होण्याची पात्रता त्यांच्या अंगी आली नाही म्हणून त्यांना हिणवतानातसली पात्रता आपण स्वतकमावली असल्याचा दावा करण्याचे धारिष्ट्य किती लोकांना दाखवता येईलतसे काही करता येणार नसेलतर मग जलोटांवर आगपाखड करण्यातत्यांच्यावर तोंडसुख घेण्यात वेळ किती आणि कशाला दवडायचा समाजाने तरी?
 
निदान भारतीय समाजात तरीशारीरिक संबंधांच्या पलीकडे लग्नसंस्थेचे महत्त्व आहेअलीकडच्या विभक्त कुटुंबपद्धतीत ज्येष्ठ नागरिकांना मानसिक आधारासाठी म्हणून भासणारी जोडीदाराची गरजही एव्हाना मान्य करताहेत आपल्याकडचे लोकविचारांचे इतके पुढारलेपण सिद्ध करणार्या भारतीय समूहाने कुणाच्या तरी खाजगी आयुष्यातला लग्नाचा मुद्दाकेवळ तो उतारवयातील असल्याच्या कारणावरून इतका टोकाला जाऊन चर्चेचा ठरवावा आणि त्यासाठी स्वत:चा अमूल्य वेळ खर्ची घालावाहे काहीसे अनाकलनीय आहेव्हीशांतारामपासून तर आयएसजोहरपर्यंत आणि कमाल हसनपासून तर कॉंग्रेसच्या शशी थरुरांपर्यंत भली मोठी यादी तयार होईल एकापेक्षा अधिक लग्न करणार्यांचीकुणाकुणाच्या खाजगी आयुष्यात डोकवायचे समाजानेतेही जलोटा,थरुरांना काडीचा फरक पडत नसतानायातील कुणीहीभारतीय समाजाचे आदर्श नाहीतकालही नव्हतेआजही नाहीत्यामुळे त्यांच्या जराशा निराळ्या वागण्याने समाजमन विचलित होण्याची किंवा ते अगदीच रसातळाला जाण्याची शक्यता सुतराम नाही.शिवायआज तमाम भारतीयांनी गांभीर्याने लक्ष घालावे असे कित्येक प्रश्न दुर्लक्षित राहिले आहेतज्यावर सखोल चिंतनमननमंथन व्हावेअसेही कितीतरी विषय चर्चेविनाच बाजूला सारले जाताहेतअशात जलोटांच्या लग्नाचा कवडीमोल विषयसार्या देशाचे लक्ष जावे इतका फुगवून मोठा अन्‌ महत्त्वाचा केला जाणार असेलतर मग संपलंच सारं..!