Saturday, August 25, 2018

बा! सिद्धू...!

तिकडे पोहोचल्यावर पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाला मिठी मारण्यातही काहीच गैर वाटलं नाही... सार्या देशाला शरम वाटली रे तुझ्या त्या कृत्याची अन्‌ तूवर पुन्हाउजागरीनं स्वत:च्या त्या वागण्याचं समर्थन करत फिरतोयसतुझ्यातल्या खेळाडूला लाख सलामतुझ्यातल्या प्रभावी वक्त्यालाहजरजवाबीहरहुन्नरी कलावंतालाही त्रिवार कुर्निसातकुठल्याही प्रसंगाला साजेशी अशी शायरी तर एकदम लाजवाबती पेश करण्याची तर्हा तर त्याहून सरसपण... पणपरवाचं तुझं वागणं मात्र कुणालाच अजीबात पटलेलं नाही बघएका निमंत्रणावरून उतावीळपणे थेट पाकिस्तानच्या दिशेने झेपावण्यापूर्वी एकदा आपल्या देशातल्या लोकांच्या भावभावनांचाआपल्या चाहत्यांच्या वैचारिक प्रवाहाचाही विचार करायला हवा होता ना सिद्धूजी आपणतसं म्हटलं तर फरक कशानेच काहीच पडत नाहीएक नवज्योतिंसग सिद्धू इम्रान खानच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिल्याने ना भारताची मान शरमेने खाली गेलीना पाकिस्तानची मान अभिमानाने उंचावलीवैश्विक पातळीवरील राजकारणाची अपरिहार्यता म्हणून दोन देशांच्या प्रमुखांना गळाभेटीची नौटंकीही करावी लागते बर्याचदा जगाला ‘दाखवण्यासाठी’... पणसिद्धूंसमोर तर अशी कुठलीच राजकीय अपरिहार्यता उभी ठाकली नव्हती.


प्रिय नवज्योतिंसग सिद्धूसाष्टांग दंडवतहो बाबापरवा जो कारनामा तू केलास त्यानंतर तर साष्टांग दंडवतच घालायला हवा ना तुलाकायम भारताच्या विरोधात बरळणारावागणाराक्रिकेटचा मैदानी खेळही इमानदारीने न खेळणारात्यातही सामना भारताविरुद्ध आहे म्हटलं की चवताळून उठणारा पाकिस्तान टीमचा कधीकाळी म्होरक्या राहिलेला इम्रान खान त्या देशाचा पंतप्रधान झाला म्हणून आनंदाला उधाण येणे वा त्याच्या शपथविधी सोहळ्याचे नुसते निमंत्रण मिळाले तरी हुरळून जाणे तुझ्या प्रतिष्ठेला शोभत नाही रे बाबाहे खरं आहे कीअलीकडे तुझी डिमांडनिदान भारतात तरी प्रामुख्यानं ‘कॉमेडी शोपुरती उरली आहेपणम्हणून दरवेळी स्वत:चं हसंच करून घेतलं पाहिजेअसं कुठे आहे राजाशिवायअसल्या एखाद्या सोहळ्याचं निमंत्रण मिळणं एवढं पुरेसं असतंअरे,निमंत्रणं तर ढीगभर वाटलीत त्यांनीमिळालं तरी कुठलं निमंत्रण स्वीकारायचं अन्‌ कुठलं टाळायचंएवढं तर ठरवता आलं पाहिजे ना आपल्याला?
 जे कपिल देवसुनील गावसकरांना कळलं ते तुला उमगलं नाहीयाहून वेदनादायी काय असेल सांगअर्थातयात तुझाही दोष नाही म्हणाइतर सार्या बाबींपुढे इम्रानशी असलेली मैत्री महत्त्वाची वाटली तुलात्याच्याशी इमान राखण्यात धन्यता वाटलीतिकडे पोहोचल्यावर पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाला मिठी मारण्यातही काहीच गैर वाटलं नाही... सार्या देशाला शरम वाटली रे तुझ्या त्या कृत्याची अन्‌ तूवर पुन्हाउजागरीनं स्वत:च्या त्या वागण्याचं समर्थन करत फिरतोयसतुझ्यातल्या खेळाडूला लाख सलामतुझ्यातल्या प्रभावी वक्त्यालाहजरजवाबीहरहुन्नरी कलावंतालाही त्रिवार कुर्निसातकुठल्याही प्रसंगाला साजेशी अशी शायरी तर एकदम लाजवाबती पेश करण्याची तर्हा तर त्याहून सरसपण...
 पणपरवाचं तुझं वागणं मात्र कुणालाच अजीबात पटलेलं नाही बघएका निमंत्रणावरून उतावीळपणे थेट पाकिस्तानच्या दिशेने झेपावण्यापूर्वी एकदा आपल्या देशातल्या लोकांच्या भावभावनांचाआपल्या चाहत्यांच्या वैचारिक प्रवाहाचाही विचार करायला हवा होता ना सिद्धूजी आपणतसं म्हटलं तर फरक कशानेच काहीच पडत नाहीएक नवज्योतिंसग सिद्धू इम्रान खानच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिल्याने ना भारताची मान शरमेने खाली गेलीना पाकिस्तानची मान अभिमानाने उंचावलीवैश्विक पातळीवरील राजकारणाची अपरिहार्यता म्हणून दोन देशांच्या प्रमुखांना गळाभेटीची नौटंकीही करावी लागते बर्याचदा जगाला ‘दाखवण्यासाठी’... पणसिद्धूंसमोर तर अशी कुठलीच राजकीय अपरिहार्यता उभी ठाकली नव्हतीत्यांना कुठल्या प्रशासनिक संकेतांचे पालनही करायचे नव्हतेकी प्रोटोकॉलचाही भार नव्हता डोक्यावरबरंगेलेच होते मित्राच्या प्रेमाखातरतर शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहायचं अन्‌ परतायचं ना गुमानपणनाहीसाहेबतुम्ही तर गेलात थेट तिथल्या लष्करप्रमुखाला भेटायलाजावेद बाजवा यांची गाठ पडल्यावर स्वत:ला आवरता तरी यायला हवं होतं.पणदुर्दैवाने तसंही घडलं नाहीतुम्ही तर थेट मिठीच मारली बाजवांनातिही हसतमुखानेकडकडूनउपस्थितांच्या कॅमेर्यांचे फ्लॅश उडाले पटापट अन्‌ तमाम भारतीयांना कळली बातमीभारतातील पंजाब नामक एका राज्याच्या प्रांत सरकारमधील नवज्योतिंसग सिद्धू नामक एका मंत्र्याने पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाची गळाभेट घेतल्याचीतसे करताना त्यांना किंचितशीही खंत वाटली नसल्याची... सीमेवर 24 तास पावसातउन्हा-तान्हात तैनात असलेल्या भारतीय जवानांना जिवानीशी मारण्याचे षडयंत्र रचणारा आणि आपल्या सैनिकांकरवी त्याची कठोर अंमलबजावणी करवून घेण्यासाठी धडपडणारासीमेपलीकडचा एकही जवान शहीद झाला तरी ज्याला आनंदाच्या उकळ्या फुटताततो निर्दयी अधिकारी तो हाचयाची कल्पना सार्या भारताला आहेपण पाकिस्तानच्या निर्मितीचे चटके ज्यांनी वर्षानुवर्षे सहन केलेपाकड्यांच्या षडयंत्रातून जन्माला आलेल्या दहशतवादाची झळ ज्यांनी वर्षानुवर्षे सोसलीखलिस्तानच्या मागणीपासून तर सुवर्णमंदिर ताब्यात घेण्यापर्यंतच्या त्यांच्या नापाक कारवायांचा जो साक्षीदार राहिला त्या पंजाबातील जनतेचे प्रतिनिधित्व करणार्या सरकारमधील एका जबाबदार मंत्र्याला दोन देशांतील संबंधांच्या तुलनेत स्वत:च्या वैयक्तिक मैत्रीला अधिक महत्त्व द्यावेसे वाटावेयाहून दुर्दैवी बाब ती कोणती असणार?
क्रिकेटचे मैदान असो की मग राजकारणाचा आखाडाभारताच्या बाबतीतली इम्रान खानची भूमिका सहानुभूतीची कधीच राहिली नाहीउलटहिंदुस्थानविरुद्धचा द्वेष आणि रोषच त्याच्या वर्तणुकीतून वारंवार सिद्ध होत राहिला आहेपणआता तो पाकिस्तानचा पंतप्रधान झालाय्‌ म्हटल्यावरअसमर्थनीय असले तरी त्याचे जुने सगळे आक्षेपार्ह वागणे विसरून त्याची गळाभेट घेणे ही तर भारताच्या पंतप्रधानांसाठीचीही अपरिहार्यता ठरणार आहे येत्या दिवसातइच्छा असो वा नसो,त्यांना इम्रानशी हसतमुखानेच भेटावे लागणार आहेनवज्योतिंसग सिद्धू नावाच्या एका भारतीय नागरिकासाठी मात्र तसली कुठलीच अपरिहार्यता पुढ्यात उभी ठाकली नव्हतीआजही नाहीत्या देशाच्या लष्करप्रमुखाची भेट घेण्याचे तर कोणतेही औचित्य नव्हते की प्रयोजनही नव्हतेपणइम्रानने धाडलेल्या नुसत्या निमंत्रणाने उतावीळ झालेले पंजाबचे मंत्रीच तारतम्य हरवून बसले होतेअसल्या प्रसंगी राखणे अपेक्षित असलेल्या गांभीर्याची जाणीवही त्यांच्या चेहर्यावर कुठे झळकत नव्हतीउलटपणी जावेद बाजवा यांची गळाभेट घेतानाचा अनाकलनीय आनंद त्यांच्या चेहर्यावर उमटलेला दिसत होतात्याहीपेक्षापाकभेटीनंतर भारतात आल्यानंतर जे अकलेचे तारे त्यांनी तोडलेतते अधिक वेदनादायक आणि चीड आणणारे आहेतया भेटीमुळे दोन देशांमधील संबंध सुधारणार असल्याचा त्यांचा दावा तर तद्दन फालतूतकलादू अन्‌ हास्यास्पदही आहेतरीही त्यांनी तो केलाय्‌ खरा!
 बासिद्धूपंतप्रधानही तर नवाझ शरीफांना भेटले होतेमग मी भेटलो तर काय झालं इथपासून तर... मग भारतातल्या तमाम विदेशी दूतावासांचा उपयोग काय,इथपर्यंतच्या तुझ्या प्रश्नांमधून तुला नेमकं काय सिद्ध करायचंय्‌ ते ठाऊक नाहीपण स्वत:ची चूक उमगल्यावरलोकांच्या प्रक्षुब्ध भावनांची पुरेशी कल्पना आल्यावर हताश झालेला तूतुझ्याच त्या प्रश्नांमधून झळकलाहे मात्र खरेकाही लोकांनी ठरवला तसा देशद्रोही तू तांत्रिकदृष्ट्या नसशीलही कदाचितपण म्हणून तुझ्या त्या कृत्याचे समर्थन मात्र कदापि होऊ शकत नाहीआपले पंतप्रधानराष्ट्रपती यांच्या भेटीच्या वेळी तिथले जे अधिकारी सलामी द्यायला रांगेत उभे राहतात त्यांना गळाभेटीसाठी पात्र ठरविण्याची किमया भारतीय संसदेचे सदस्य राहिलेल्या नवज्योत सिद्धू यांच्या हातून लीलया घडावीही बाब सार्या भारताला आक्षेपार्ह वाटली असेलतर ती चूक कशी ठरवता येईलआता दुसर्याच कुणालातरी आरोपीच्या पिंजर्यात उभे करून स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रयत्न अन्आपल्याच चुकीच्या वागणुकीचे सिद्धूंनी चालवलेले लटके समर्थन योग्य कसे ठरवता येईल?
क्रिकेटचे विश्व सिद्धूंचे स्वत:चेएकट्याचेपणराजकीय वतुर्ळातील त्यांचे अबाधित स्थान निर्माण करण्यासाठीचा भाजपाचा वाटा मोठा राहिलाहे तर खुद्द त्यांनाही नाकारता येणार नाहीत्याच भाजपाचे अर्ध्वर्यू अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने सारा देश हळहळत असतानाकधीकाळचा त्या पक्षाचा एक पाईक मात्र अटलजींचा अंत्यविधी टाळून आपल्या एका दूरस्थ मित्राच्या शपथविधीला उपस्थित राहणे अधिक पसंत करतो... काहीही म्हण सिद्धूपण हे काही पटत नाही गड्या मनाला...!
‘‘कहू दोस्तसें दोस्त की बात क्या क्या;
रही दुश्मनोंसें मुलाकात क्या क्या...’’

No comments:

Post a Comment