Saturday, March 31, 2012

राजा उदार झाला अन्‌ सिलेंडर फक्क्त बारा रुपयांनीच महागले!

राजा उदार झाला आणि महाराष्ट्रात स्वयंपाकाचा गॅस वीसच्या
ऐवजी फक्क्त बाराच रुपयांनी महागला. काय पण नाटकी आहेत राज्यातल्या सत्ताधारी पक्षाचे नेते! अजित पवारांनी गॅस सिलेंडरवर पाच टे कर आकारला तर
लागलीच माणिकराव ठाकरेंच्या नेतृत्वात काँग्रेसचे एक
शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या दरबारात हजर झाले. ही भाववाढ
योग्य नसल्याची जाणीव राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अंतर्मनालाही लागलीच झाली. त्यांनीही अजित पवारांच्या या निर्णयाला विरोध
दाखविण्याच्ी हिंमत दाखवली. एरवी पवारांसमोर ब्र काढायलाही न धजावणार्‍या राष्ट्रवादीच्या चार दोन ठराविक नेत्यांनी या निर्णयाला असलेला आपला विरोध निदान विधिमंडळाच्या
रेकॉर्डवर नोंदविण्यापुरता तरी बोलून दाखवला. त्यांच्या
मागणीपुढे नमते घेत पाच टक्क्यांचा कर तीन टक्क्यांवर काय
आला तर या आनंदाचे भरते आले? लागलीच पवारांचे आभार मानणार्‍या जाहिराती दूरचित्रवाणीवरून झळकू लागल्या. पाच वाजता निर्णय अन्‌ सहा वाजता जाहिराती? कुणाला मूर्ख बनविण्याचा प्रकार चाललाय हा? आणि पवारांचे आभार कशासाठी, तर पाच टक्क्यांचा कर तीन टक्क्यांचा आणला म्हणून? पण सरतेशेवटी गॅस सिलेंडर महागले ते महागलेच त्याचे काय?
वीस रुपांची वाढ फार होते, त्यामुळे सिलेंडर फक्त बारा
रुपयांनीच महाग करावा, अशीच मागणी होती माणिकराव
ठाकरेंची? महागाईने पिचलेली जनता या दरवाढीवर क्षोभ व्यक्त
करेल याची जाणीव झाल्यानेच सत्तेतल्या या दोन्ही पक्षाच्या
नेत्यांनी विरोधाची नाटकं केलीत. पवारांनीही सार्‍या महाराष्ट्रावर उपकार केलच थाटात दरवाढ थोडीशी कमी करून स्वतःची पाठ थोपटून घेतली.
हे तर ङङ्गसेल'चा बाजार मांडणार्‍या व्यापार्‍यांसारखं झालं. वस्तूंचे
दर आधीच दुप्पट करून टाकायचे आणि नंतर तीच वस्तू पन्नास
टे सवलतीच्या दराने ङङ्गसेल'च्या नावावर खपवायची.
राज्याच्या अर्थमंत्र्यांनी तरी वेगळं काय काम केलं? सेल
लावणार्‍या त्या व्यापार्‍यांसारखंच लोकांना फसववलं.
काजूवरचा टॅक्स कमी करायचा आणि कापूस विकणार्‍या
शेतकर्‍यावर मात्र खरेदीकर लावायचा. गॅसवरचा वाढवायचा
अन्‌ शिजववण्यासाठी तयार पदार्थ तयार करणार्‍या पेप्सी
कंपनीला करातून सूट ायची हे कुठले धोरण? पेप्सी साठी
कमी करण्यात आलेला कर तीन टक्क्यांनी वाढवून गॅसवरील
कर न लादण्याचा निर्णय अर्थमंत्री का घेऊ शकले नाहीत, हा
प्रश्न त्यांचे अभिनंदन करणार्‍या, आभार मानणार्‍या वा लवून
मुजरा करणार्‍यांच्या मनात का उद्‌भवत नाही? की
मुख्यमंत्र्यांच्या दरबारी शिष्टमंडळ नेण्याची नाटकं
करणार्‍यांनाही ही फसवणूकच अपेक्षित होती?
राज्य सरकारला २७,७७७ कोटी रुपयांचा कर गेल्या वर्षभरात
वसूल करता आलेला नाही. शेअर बाजारातील व्यवहारावर ०.०५
टे कर लावण्याचा निर्णय घेणार्‍या अर्थमंत्र्यांना गेल्या वर्षभरात
हा कर लागू देखील करता आलेला नाही. का? शेअर बाजारातली गुंतवणूक आपल्या समाजातला कोणता वर्ग करतो ? त्यांना०.०५ टे देखील कर लागू करता येत नाही सरकारला? आणि सर्वसामान्य जनतेवर ५ टक्क्यांचा कर लादायला बरा
हुरूप येतो यांना!
मुळात, कुणाला लूटायचे अन्‌ कुणाला आश्रय ायचा, याबाबतची
सरकारची धोरणं स्पष्ट आहेत. राज्याच्या टोकावर वसलेल्या
आदिवासी माणसाचं बखोटं धरून त्याला पोलिस ठाण्यात
आणण्यासाठी इथे कायदा आडवा येत नाही. पण नक्षल्यांना
मदत करणारे, पैसा आणि शस्त्र पुरवणारे लोक कोण आहेत,
याची पूर्ण कल्पना असतानाही त्यांना हात लावायला मात्र यांची
हिंमत होत नाही. त्यासाठी पुरावे नसल्याची फडतूस कारणे
राज्याचे गृहमंत्री सांगतात?
सध्या एकमेकांवर कुरघोडी करण्यातच काँग्रेस आणि
राष्ट्रवादीचे नेते मश्गूल आहेत. गॅस दरवाढीचा निर्णय जाहीर
झाल्यावर काँग्रेसचे नेते मुख्यमंत्र्यांकडे धावून गेलेत, ते अर्थमंत्री
राष्ट्रवादीचे असल्यामुळे. काँग्रेसचे नेते या दरवाढीला विरोध
करून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करताहेत
म्हटल्यावर राकाँच्या नेत्यांचे पोट दुखले नसते तरच नवल!
अर्थमंत्री स्वपक्षाचे असूनही त्यांच्या या दरवाढीला विरोध
करण्याची स्ट्रॅटेजी त्यांना ठरवावी लागली. दरवाढ यांनीच जाहीर
करायची, त्याला विरोधही यांनीच करायचा, दरवाढ कमी
करण्याची मागणीही यांनीच करायची आणि ती कमी करण्याचा
निर्णयही यांनीच घ्यायचा! ढोंगबाजीची मर्यादा गाठणारा हा संतापजनक प्रकार आहे. राज्यातील जनतेला गृहीत
धरण्याच्या शैलीचा हा परिणाम आहे. जनतेला त्याचे काही
वाटत नाही तोवर राज्यातल्या जनतेला मूर्ख समजून चाललेली ही नाटकबाजी भविष्यातही अशीच सुरू राहणार आहे.

जाता जाता....
राज्याचे मुख्यमंत्री बदलणार असल्याच्या चर्चेचे गुर्‍हाळ पुन्हा एकदा
सुरू झाले आहे. ऐन अधिवेशनाच्या काळात काही असंतुष्ट
आमदारांनी हिंमतीने विधानभवनातच एक बैठक घेतल्याची चर्चा
आहे. दिल्लीत सोनियादरबारी जाऊन आपली गार्‍हाणी मांडण्याचे
मनसुबेही त्यांनी जाहीर केल्याचे म्हटले जाते. त्यांच्या या ङङ्गधाडसाचे' कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. पण काँग्रेस पक्षात
मुख्यमंत्र्यांना नेमण्याचे वा हटविण्याचे अधिकार राज्यातल्या
आमदारांना असल्याचा एक ङङ्गविनोद' त्यातून लोकांना कळला
आहे. एक मात्र खरे की मुख्यमंत्र्यांनी आता त्या नाराज
आमदारांना गोंजारण्याची मोहीम आरंभली आहे.

सुनील कुहीकर
...यांच्या भरवशावर चाललीय अण्णांची लढाई?

मूठभर सामाजिक कार्य करताच ते पसाभर केल्याचा आवा ज्यांचा
चेहर्‍यावर उमटतो आणि मनात घर करतो, त्यांचा किरण बेदी आणि
केजरीवाल होतो. अण्णा हजारेंसारख्या उंचीच्या सामाजिक
कार्यकर्त्याच्या तपश्चर्येचे बळ लाभल्याने लोकपाल बिलाच्या
आंदोलनाला दिल्लीच्या रामलीला मैदानावर प्रचंड जनसमर्थन मिळाले
आणि अण्णांपेक्षांही त्यांच्या टीममधील नेत्यांचीच छाती गर्वाने फुगून
गेली. आंदोलनाला लाभलेले यश अण्णांच्या प्रतिमेवरील विश्वासाला
लाभलेले यश होते. पण त्यांच्या सभोवतालच्या कडबोळ्यातील
लोकांना ते त्यांचेच यश वाटू लागले आणि इथेच त्यांची फसगत
झाली.
केजरीवाल, किरण बेदी, स्वामी अग्रिवेश यांनी कुठलेच सामाजिक
काम केले नाही, असे नाही. त्यांच्या साामजिक जाणिवा बोथट आहेत
असेही नाही. पण अण्णांच्या तपश्चर्येचे बळ त्यांना नाही. अण्णांनी
आयुष्य वेचून कमावलेली उंची गाठायला त्यांना अजून बराच
अवकाश आहे. पण आंदोलनाला पाठिंबा देत रामलीला मैदानावर
जमलेल्या नुसत्या गर्दीनेच हे सारे नेते भारावले आणि त्यांचा तोल
ढासळला. हे सारे आपल्यामुळेच घडत असल्याचा त्यांच्या मनातला
भासही त्याला बराचसा कारणीभूत ठरला.आणि मग अण्णांना डावलून
हे कडबोळे काम करू लागले. पत्रकारांना अण्णांना भेटू देण्याचे हेच
लोक टाळू लागले. लोकांनी अण्णांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही
माईक हिसकावून स्वतःच देऊ लागली. समोरची गर्दी स्वतः
जमवलेली नसली तरी ती बघून जो उत्साह या नेत्यांच्या मनात
संचारला, त्याच्या बळावर ते सरकार हादरविण्याची भाषा बोलू
लागले.
रामलीला मैदानावरीची गर्दी जर या नेत्यांनी जमवली होती, तर ती
काही दिवसांपूर्वीच्या जंतरमंतर वरील आंदोलनाच्या वेळीही त्यांना
जमविता यायला हवी होती, नंतरच्या मुंबईच्या आझाद मैदानावरील
आंदोलनाच्या वेळीही या नेत्यांना ती गर्दी जमवता आली नाही.
मुळात रामलीला मैदानावरील गर्दीचे श्रेय केंद्र सरकारने अण्णांना
केलेल्या अटकेचे, त्यातून लोकांच्या मनात उमटलेल्या संतापाचे
होते. त्यातून अण्णांनी कारागृहातच उपोषण आरंभल्याने लोकांच्या
मनातील त्यांच्या प्रतिमेला आणखीच चकाकी आलीकोणी तरी
आपल्या मनातल्या संतापाला वाट करून दिल्याच्या आनंदात
लोकाींनी अण्णांच्या नावाच्या टोप्या डोक्यावर मिरवत रस्त्यावर
उतरणे पसंत केले. त्यांच्या भोवतालच्या चौकडीला मात्र हे कधी
उमगलेच नाही. उमगले असेल, तरी त्यांनी त्या क्षणी तरी त्याचा
लाभ उचलण्याचे ठरविले असावे. कारण त्यावेळचे त्यांची भूमिका,
अण्णांना बाजूला ठेवून निर्णय घेण्याची त्यांची तर्‍हा तरी निदान हेच
सांगते.
पंतप्रधानांना आव्हान देणारी भाषा असो किंवा सरकार उलथवून
टाकण्याची घोषणा, सर्वच राजकीय नेत्यांबाबत अर्वाच्च्य शिव्यांची
लाखोली असो की मैदानावरील भव्य मंचावरील त्यांची नाटकं आणि
बेताल भाषणं या सर्वच बाबी आंदोलनाचे क्षणिक यश बघून
संचारलेल्या उत्साहातून आलेल्या होत्या.
एखाा देशातले स्वातंत्र्यांचे आंदोलन जनसमर्थनाशिवाय उभे राहात नाही. जनसमर्थन जुळवण्याचे काम सहज होऊन जात नाही. एखाा
मुद्दयावरून देशातले जनमत पेटवणे हे आगपेटीची काडी
पेटविण्याइतके सोपे नाही. त्यातही भारतासारख्या विशालकाय
देशात एखाा मुावर लोकांना एकत्र आणायचे, एखादे आंदोलन
उभारायचे तर, त्यासाठी नेताही तसाच हवा असतो. बाबा रामदेव
सारख्या पळपुट्यांचे ते काम नव्हे. अण्णा हजारे यांनी सामाजिक
कार्यासाठी वेचलेल्या आयुष्यातून ती ताकद कमावली हे खरे असले
तरी संपूर्ण देशाचे पाठबळ लाभण्याइतके मोठे काम त्यांचेही आप
झालेले नव्हते. माहितीच्या अधिकाराचे त्यांचे आंदोलन नाही
म्हणायला महाराष्ट्रापुरतेच मर्यादीत राहिले होते. लोकपाल
विधेयकाच्या माध्यमातून देशभर जनमत तयार करण्याची संधी
मिळणार होती. ती काही प्रमाणात उपयोगात आणली गेलीही. पण
अण्णा हजारेही प्रसिद्धीच्या मोहाला बळी पडले. आपल्या देशातली
मीडिया, विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडिया अजून बाल्यावस्थेत आले.
हवी तशी प्रगल्भता तिला आप यायची आहे. बाल्यावसथेतील या
मीडियाने उचलून धरलेल्या आंदोलनामुळे मिळू लागलेल्या यशानेत
अण्णा हजारेही हुरळून गेले आणि इथेच आंदोलन फसले.
देशपातळीवरील आंदोलने अशी मीडियाच्या प्रसिद्धीच्या बळावर उभी
राहात नाहीत. त्यासाठी ग्राऊंडवर्क करावे लागते. लागतात.
वैचारिक बैठक असलेल्या कार्यकर्त्यांची फळी उभी करावी लागते.
प्राणपणाने लढणारे सैनिक तयार करावे लागते. क्षणभराच्या
भारावलेपणातून रस्त्यावर उतरलेल्या आणि लाठीहल्ला होऊ लागताच पळून जाणार्‍या लोकांच्या भरवशावर कशी यशास्वी होतील
आंदोलने. पण दुर्दवाने अण्णांसारख्य उंची लाभलेल्या
कार्यकर्त्यालाही हे गमक उलगडले नाही. समोरची गर्दी, रोज
चाललेल्या टीव्हीवरच्या बातम्या, लोकांच्या डोक्यावरच्या त्यांच्या
नावाच्या टोप्या बघून क्षणभर तेही भारावून गेले. आणि त्यांच्या
सभोतलच्या ङङ्गटीम'बद्दल काय बोलावे? त्यांनी तर या सार्‍या बाबींचा
विचारच न करण्याचे ठरविले होते. त्याक्षणी सरकार आपल्यामुळे
हादरले असल्याचा भास त्यांना झाला. सरक रमधील हुशार आणि
चाणाक्ष राजकीय नेत्यांनी हे चांगलेच हेरले होते. म्हणूनच
पंतप्रधानांच्या एका पत्राने आंदोलन संपविण्याचे आणि लोकपाल
संसदेत अडकवून या कडबोळ्याला झुलवत ठेवण्याचे त्यांचे षडयंत्र
यशस्वी होऊ शकले आहे.

सुनील कुहीकर
राजा उदार झाला अन्‌ सिलेंडर फक्क्त बारा रुपयांनीच महागले!

राजा उदार झाला आणि महाराष्ट्रात स्वयंपाकाचा गॅस वीसच्या
ऐवजी फक्क्त बाराच रुपयांनी महागला. काय पण नाटकी आहेत राज्यातल्या सत्ताधारी पक्षाचे नेते! अजित पवारांनी गॅस सिलेंडरवर पाच टे कर आकारला तर
लागलीच माणिकराव ठाकरेंच्या नेतृत्वात काँग्रेसचे एक
शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या दरबारात हजर झाले. ही भाववाढ
योग्य नसल्याची जाणीव राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अंतर्मनालाही लागलीच झाली. त्यांनीही अजित पवारांच्या या निर्णयाला विरोध
दाखविण्याच्ी हिंमत दाखवली. एरवी पवारांसमोर ब्र काढायलाही न धजावणार्‍या राष्ट्रवादीच्या चार दोन ठराविक नेत्यांनी या निर्णयाला असलेला आपला विरोध निदान विधिमंडळाच्या
रेकॉर्डवर नोंदविण्यापुरता तरी बोलून दाखवला. त्यांच्या
मागणीपुढे नमते घेत पाच टक्क्यांचा कर तीन टक्क्यांवर काय
आला तर या आनंदाचे भरते आले? लागलीच पवारांचे आभार मानणार्‍या जाहिराती दूरचित्रवाणीवरून झळकू लागल्या. पाच वाजता निर्णय अन्‌ सहा वाजता जाहिराती? कुणाला मूर्ख बनविण्याचा प्रकार चाललाय हा? आणि पवारांचे आभार कशासाठी, तर पाच टक्क्यांचा कर तीन टक्क्यांचा आणला म्हणून? पण सरतेशेवटी गॅस सिलेंडर महागले ते महागलेच त्याचे काय?
वीस रुपांची वाढ फार होते, त्यामुळे सिलेंडर फक्त बारा
रुपयांनीच महाग करावा, अशीच मागणी होती माणिकराव
ठाकरेंची? महागाईने पिचलेली जनता या दरवाढीवर क्षोभ व्यक्त
करेल याची जाणीव झाल्यानेच सत्तेतल्या या दोन्ही पक्षाच्या
नेत्यांनी विरोधाची नाटकं केलीत. पवारांनीही सार्‍या महाराष्ट्रावर उपकार केलच थाटात दरवाढ थोडीशी कमी करून स्वतःची पाठ थोपटून घेतली.
हे तर ङङ्गसेल'चा बाजार मांडणार्‍या व्यापार्‍यांसारखं झालं. वस्तूंचे
दर आधीच दुप्पट करून टाकायचे आणि नंतर तीच वस्तू पन्नास
टे सवलतीच्या दराने ङङ्गसेल'च्या नावावर खपवायची.
राज्याच्या अर्थमंत्र्यांनी तरी वेगळं काय काम केलं? सेल
लावणार्‍या त्या व्यापार्‍यांसारखंच लोकांना फसववलं.
काजूवरचा टॅक्स कमी करायचा आणि कापूस विकणार्‍या
शेतकर्‍यावर मात्र खरेदीकर लावायचा. गॅसवरचा वाढवायचा
अन्‌ शिजववण्यासाठी तयार पदार्थ तयार करणार्‍या पेप्सी
कंपनीला करातून सूट ायची हे कुठले धोरण? पेप्सी साठी
कमी करण्यात आलेला कर तीन टक्क्यांनी वाढवून गॅसवरील
कर न लादण्याचा निर्णय अर्थमंत्री का घेऊ शकले नाहीत, हा
प्रश्न त्यांचे अभिनंदन करणार्‍या, आभार मानणार्‍या वा लवून
मुजरा करणार्‍यांच्या मनात का उद्‌भवत नाही? की
मुख्यमंत्र्यांच्या दरबारी शिष्टमंडळ नेण्याची नाटकं
करणार्‍यांनाही ही फसवणूकच अपेक्षित होती?
राज्य सरकारला २७,७७७ कोटी रुपयांचा कर गेल्या वर्षभरात
वसूल करता आलेला नाही. शेअर बाजारातील व्यवहारावर ०.०५
टे कर लावण्याचा निर्णय घेणार्‍या अर्थमंत्र्यांना गेल्या वर्षभरात
हा कर लागू देखील करता आलेला नाही. का? शेअर बाजारातली गुंतवणूक आपल्या समाजातला कोणता वर्ग करतो ? त्यांना०.०५ टे देखील कर लागू करता येत नाही सरकारला? आणि सर्वसामान्य जनतेवर ५ टक्क्यांचा कर लादायला बरा
हुरूप येतो यांना!
मुळात, कुणाला लूटायचे अन्‌ कुणाला आश्रय ायचा, याबाबतची
सरकारची धोरणं स्पष्ट आहेत. राज्याच्या टोकावर वसलेल्या
आदिवासी माणसाचं बखोटं धरून त्याला पोलिस ठाण्यात
आणण्यासाठी इथे कायदा आडवा येत नाही. पण नक्षल्यांना
मदत करणारे, पैसा आणि शस्त्र पुरवणारे लोक कोण आहेत,
याची पूर्ण कल्पना असतानाही त्यांना हात लावायला मात्र यांची
हिंमत होत नाही. त्यासाठी पुरावे नसल्याची फडतूस कारणे
राज्याचे गृहमंत्री सांगतात?
सध्या एकमेकांवर कुरघोडी करण्यातच काँग्रेस आणि
राष्ट्रवादीचे नेते मश्गूल आहेत. गॅस दरवाढीचा निर्णय जाहीर
झाल्यावर काँग्रेसचे नेते मुख्यमंत्र्यांकडे धावून गेलेत, ते अर्थमंत्री
राष्ट्रवादीचे असल्यामुळे. काँग्रेसचे नेते या दरवाढीला विरोध
करून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करताहेत
म्हटल्यावर राकाँच्या नेत्यांचे पोट दुखले नसते तरच नवल!
अर्थमंत्री स्वपक्षाचे असूनही त्यांच्या या दरवाढीला विरोध
करण्याची स्ट्रॅटेजी त्यांना ठरवावी लागली. दरवाढ यांनीच जाहीर
करायची, त्याला विरोधही यांनीच करायचा, दरवाढ कमी
करण्याची मागणीही यांनीच करायची आणि ती कमी करण्याचा
निर्णयही यांनीच घ्यायचा! ढोंगबाजीची मर्यादा गाठणारा हा संतापजनक प्रकार आहे. राज्यातील जनतेला गृहीत
धरण्याच्या शैलीचा हा परिणाम आहे. जनतेला त्याचे काही
वाटत नाही तोवर राज्यातल्या जनतेला मूर्ख समजून चाललेली ही नाटकबाजी भविष्यातही अशीच सुरू राहणार आहे.

जाता जाता....
राज्याचे मुख्यमंत्री बदलणार असल्याच्या चर्चेचे गुर्‍हाळ पुन्हा एकदा
सुरू झाले आहे. ऐन अधिवेशनाच्या काळात काही असंतुष्ट
आमदारांनी हिंमतीने विधानभवनातच एक बैठक घेतल्याची चर्चा
आहे. दिल्लीत सोनियादरबारी जाऊन आपली गार्‍हाणी मांडण्याचे
मनसुबेही त्यांनी जाहीर केल्याचे म्हटले जाते. त्यांच्या या ङङ्गधाडसाचे' कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. पण काँग्रेस पक्षात
मुख्यमंत्र्यांना नेमण्याचे वा हटविण्याचे अधिकार राज्यातल्या
आमदारांना असल्याचा एक ङङ्गविनोद' त्यातून लोकांना कळला
आहे. एक मात्र खरे की मुख्यमंत्र्यांनी आता त्या नाराज
आमदारांना गोंजारण्याची मोहीम आरंभली आहे.

सुनील कुहीकर

Friday, March 2, 2012

मुंबईचे वार्तापत्र
सुनील कुहीकर
----------------
कृपांवरील कारवाईची नाटकबाजी!
कृपाशंकरसिंहांवर कारवाई करण्याचे न्यायालयीन आदेश जारी होऊन तब्बल आठवडा उलटल्यानंतर पोलिस विभागाला त्यांच्या घरावर छापे मारण्याची सवड मिळाली आहे. या आठ दिवसात काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाच्या माजी अध्यक्षांना सर्वोध न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची, घरातले कागदोपत्री पुरावे नष्ट करण्याची ङङ्गसंधी' मिळाली. त्याचा पुरेपूर ङङ्गलाभ' घेण्यात आला आणि ज्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती, ते पोलिस आयुक्त अरुण पटनाईक मात्र अतिशय बेजाबदारपणे हा प्रकार घडलाच नसल्याचा दावा करीत होते.
स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या नावे बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप असलेल्या तत्कालीन काँग्रेसाध्यक्षांवर कठोर कारवाई करण्याचे, त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने जारी केले. अगदी नाव घेऊन, अरुण पटनाईकांनी कृपांवर कारवाई करावी असेही या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. तरीही सरकार आणि पोलिस प्रशासन ढिम्म राहिले. आठ दिवस पर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. या काळात पोलिस विभाग आता पाश आवळणार असल्याच्या पोकळ बातम्या तेवढ्या पसरत राहिल्या. तोपर्यंत कृपाशंकरसिंह मात्र सर्वोध न्यायालयापर्यंत पोहोचले. आता ते स्वतः भूमिगत झालेत. त्यांच्या घरातली महत्त्वाची कागदपत्रेही गठ्या गठ्याने जाळली जाऊ लागली आहेत. ही कागदपत्रे जाळली जात असल्याची माहिती परिसरातील लोकांना कळली. पण पोलिस विभागाला मात्र त्याचा थांगपत्ताही लागला नाही.
या काळात एका भ्रष्टाचारी व्यक्तीवर कारवाई करण्याऐवजी महाराष्ट्राचे सरकार आणि राज्याचे मुख्यमंत्री इतर अतिशय महत्त्वाच्या कामात व्यस्त राहिलेत. महानगर पालिकांमध्ये महापौर कोणाला करावं, त्यासाठी राष्ट्रवादीशी आघाडी करावी की न करावी, कृपाशंकर सिंहांनी पक्ष पराभवाची ङङ्गनैतिक' जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिल्याने जी जागा रिकामी झालीय्‌, त्या जागेवर अशीच नैतिकता लाभलेला दुसरा कोणता नेता बसवावा अशा अनेक विवंचना सतावित असल्याने कृपांवरच्या कारवाईकडे लक्ष ायला मुख्यमंत्र्यांना फुरसतच मिळाली नाही. आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच कृपांवरील कारवाईपेक्षा त्यांच्या उत्तराधिकार्‍याच्या नेमणुकीचा मुद्दा अधिक महत्त्वाचा वाटत असेल, तर ज्यांच्यावर प्रत्यक्ष कारवाईची जबाबदारी होती, त्या पटनाईकांना तो कवडीमोल वाटला तर नवल काय?
आदेश न्यायालयाचा नसता तर कदाचित पटनाईकांनी तो केव्हाच केराच्या टोपलीत टाकला असता. पण त्यांना नाईलाजाने तसे करता आले नाही. तरीही कायाच्या चौकटीत राहून कृपांना करता येईल तेवढी मदत त्यांनी केलीच म्हणतात! कृपा तर काय राजकारणी माणूस. त्यांनी आपल्यावरील कारवाई टाळण्यासाठी सर्व प्रयत्न केले. पोलिस विभागावर दिल्लीहून दबाव आणला. त्यामुळेच की काय पण, देशात नंबर वन असल्याचा दावा असलेल्या महाराष्ट्राच्या सक्षम पोलिस दलाला न्यायालयाच्या आदेशानंतरही सिंहांवर गुन्हे दाखल करायला पाच दिवस तर त्यांच्या घरांवर छापे मारायला नंतरचे तीन दिवस लागलेत!
मुंबईतील बांद्रा परिसरातील साईप्रसाद सोसायटीच्या भागातील ज्या बंगल्याच्या आवारात कृपांशी संबंधित महत्त्वपूर्ण कागदपत्रे त्यांच्या अनुपस्थितीत जाळली जात होती, त्या परिसरात उपस्थित पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याची बाब समोर आली आहे. काही सजग नागरिकांनी या प्रकरणी पोलिस ठाण्यात फोन केला, तर तिथेही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांनी ङङ्गतो' कचरा असल्याचे सांगत हात झटकले. तर अरुण पटनाईकांनी हा प्रकार हसण्यावारी नेऊन प्रकरणाचे गांभिर्य कमी केले. कृपाशंकरसिहांना स्वतःच्या आणि परिवाराच्या बचावाची पुरेशी संधी देऊन, अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करण्याकरिता पुरेसा वेळ देऊन, पुरावे नष्ट करता येतील अशी व्यवस्था करून न्यायालयीन आदेशाला आठ दिवस उलटल्यावर त्यांच्या घरांवर, कार्यालयावर छापे टाकण्यात आले आहेत. म्हणायला पोलिस विभागाने कारवाई केली आहे आणि म्हणायला कृपांना करता येईल तेवढी मदतही करून झाली आहे. त्यांच्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जावर तातडीनं सुनावणी करण्यास न्यायालयानं नकार दिल्यानंतर जाग आलेल्या पोलिस विभागाने महाराष्ट्राच्या तमाम जनतेला मूर्ख समजून सुरू केलेली कारवाईची ही म्हणूनच केवळ नाटकबाजी ठरली आहे.
कधीकाळी एक सामान्य कार्यकर्तो म्हणून सुरू झालेली कृपाशंकर सिंहांची काँग्रेस पक्षातली कारकीर्द आमदारकी, राज्यमंत्री आणि मुंबई प्रदेश काँग्रेसाध्यक्षपदापर्यंत कशी पोहोचली, या काळात त्यांनी दिल्लीश्वरांची राखलेली मर्जी, वेळोवेळी मुंबईच्या दौर्‍यावर आलेल्या पक्ष नेत्यांची त्यांनी ठेवलेली बडदास्त सध्या चर्चेची ठरली आहे. बहुदा त्याचीच फलश्रुती म्हणून बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्ससारख्या मुंबईतील आलीशान आणि अतिशय महागड्या भागात त्यांना एकाहून अधिक कार्यालये आणि फ्लॅट्‌स मिळवता आले असावेत. मधू कोडा प्रकरणात त्यांचे नाव घेतले जात असतानाही त्यांच्यावर कारवाई मात्र झाली नव्हती. आता होत आहे, ती केवळ नाटकबाजी असल्याचा विरोधकांचा आरोप खरा की खोटा हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

मुंबई
९८८१७१७८३३