Friday, May 24, 2019

राजसाहेब! लावायचा का व्हिडीओ...?


म्हणजे झालं कसं बघा, लोक आले. त्यांनी तुमचा ‘शो’ पाहिला. त्यांना तो आवडला. लोकांनी टाळ्याही वाजवल्या. जमेल तिथे जमेल तसा हशाही पिकला. घरी परतले. अन्‌ विसरून गेले... पाऽऽर ‘एण्टरटेनमेंट शो’ करून टाकला बघा लोकांनी तुमच्या जाहीरसभांचा...  सहज घडलं असेल असं? की तुमचा छुपा डाव लक्षात आला असेल जनतेच्या? निवडणुकीच्या ऐन तोंडावर तुमच्या मनात अचानक जागलेला जनतेबद्दलचा कळवळा छद्मी असल्याची खात्री पटली असेल लोकांना? दर दोन-चार वर्षांनी बदलणारी तुमची भूमिकाही ध्यानात ठेवली असेल का लोकांनी? कधीकाळी बाळासाहेबांच्या छत्रछायेत तयार झालेलं, धनुष्यबाणासाठी प्राणपणानं मत मागणारं नेतृत्व, स्वत:वरील व्यक्तिगत अन्यायाचा जाहीर कांगावा करीत रेल्वे इंजिनसाठी मतांचे दान केव्हा मागू लागले, ते कळलेच नाही जनतेलाही. नंतरच्या काळात आणखीच कहर होत गेला. एका राजकीय पक्षाचा प्रमुख नेता तिसर्‍याच कुठल्या पक्षाच्या उमेदवाराला मतं देण्याची गळ घालतो अन्‌ नंतरच्याच निवडणुकीत त्या पक्षाला अजीबात मतं देऊ नका म्हणून सांगतो, असे अफलातून चित्र निर्माण करण्यात राजसाहेबांचे कसब पणाला लागले! राजसाहेब, वर्षागणिक भूमिका बदलणं, आपल्या पक्षाची ताकद दरवेळी कुणाच्यातरी खुंट्याला बांधणं, ही तुमची राजकीय अपरिहार्यता असेलही कदाचित, पण म्हणून जनतेला गृहीत धरून तिलाही स्वत:सोबत फरफटत नेत, कुणाच्यातरी दावणीला बांधण्याची तुमची तर्‍हा लोकांनी का स्वीकारायची, हे तरी सांगा!


राजसाहेब! आहात कुठे? दिसला नाहीत गेले दोन दिवस कुठेच! निवडणुकीपूर्वी प्रचारार्थ केलेल्या दौर्‍याचा शीण अजून गेला नाही वाटते! की, निवडणुकीचे निकाल ऐकून तब्येत बिघडलीय्‌ आणखी? काय तो तोरा होता राव तुमचा! किती चवताळून उठला होतात पंतप्रधानांविरुद्ध. किती आरोप. किती शिवीगाळ. आपण केलेल्या आरोपांना कुणी काडीचीही किंमत देत नाहीय्‌ म्हटल्यावर झालेला त्रागा तो केवढा. आपण उपस्थित केलेल्या प्रश्नांवर बोलण्याचीही कुणाची बिशाद राहिली नसल्याची ती शेखी. ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत गाजवलेल्या जाहीरसभांचा घाट. स्वत:च्या राजकीय पक्षाचा एकही उमेदवार मैदानात नसताना, सरकारविरुद्ध रान पेटवण्यासाठी कुणी ‘प्रोत्साहन’ दिले, असा नुसता सवाल विचारला गेला तरी केवढे चिडला होतात. कॉलर टाईट करून म्हणालात, ‘‘मी असल्या सुपार्‍या घेत नसतो. मोदींच्या नेतृत्वात देश संकटात चालला असताना त्याबाबत जनजागृती करणे हे माझे कर्तव्य आहे.’’ त्याचा अप्रत्यक्ष ‘लाभ’ कॉंग्रेस-राष्ट्रवादीला होणार असेल, तर होऊ दे! त्याला जबाबदार मी नाही. पण, अशा कठीण प्रसंगात लोकांना परिस्थितीची जाणीव करून देणं, त्यांना जागृत करणं हे आपलं कर्तव्य असल्याचं केवढं ठामपणे सांगितलं होतं राव तुम्ही? केवढ्या गाजल्या त्या जाहीरसभा. काय तो जल्लोश. केवढा हुरूप लोकांना तुमच्या जाहीरसभांना येण्याचा. पण, तुमच्या अपेक्षेप्रमाणे कॉंग्रेस-राष्ट्रवादीला ‘फायदा’ मात्र झालेला दिसत नाही कुठेच. नरेंद्र मोदींविरुद्ध तुम्ही केलेल्या थयथयाटावर, व्यक्त केलेल्या जळफळाटावर, ओकलेल्या गरळीवर टाळ्या पिटल्या खर्‍या लोकांनी, पण प्रत्यक्षात मतांचे दान मात्र युतीच्याच पदरात टाकले. म्हणजे झालं कसं बघा, लोक आले. त्यांनी तुमचा ‘शो’ पाहिला. त्यांना तो आवडला. लोकांनी टाळ्याही वाजवल्या. जमेल तिथे जमेल तसा हशाही पिकला. घरी परतले. अन्‌ विसरून गेले... पाऽऽर ‘एण्टरटेनमेंट शो’ करून टाकला बघा लोकांनी तुमच्या जाहीरसभांचा...
 सहज घडलं असेल असं? की तुमचा छुपा डाव लक्षात आला असेल जनतेच्या? निवडणुकीच्या ऐन तोंडावर तुमच्या मनात अचानक जागलेला जनतेबद्दलचा कळवळा छद्मी असल्याची खात्री पटली असेल लोकांना? दर दोन-चार वर्षांनी बदलणारी तुमची भूमिकाही ध्यानात ठेवली असेल का लोकांनी? कधीकाळी बाळासाहेबांच्या छत्रछायेत तयार झालेलं, धनुष्यबाणासाठी प्राणपणानं मत मागणारं नेतृत्व, स्वत:वरील व्यक्तिगत अन्यायाचा जाहीर कांगावा करीत रेल्वे इंजिनसाठी मतांचे दान केव्हा मागू लागले, ते कळलेच नाही जनतेलाही. नंतरच्या काळात आणखीच कहर होत गेला. एका राजकीय पक्षाचा प्रमुख नेता तिसर्‍याच कुठल्या पक्षाच्या उमेदवाराला मतं देण्याची गळ घालतो अन्‌ नंतरच्याच निवडणुकीत त्या पक्षाला अजीबात मतं देऊ नका म्हणून सांगतो, असे अफलातून चित्र निर्माण करण्यात राजसाहेबांचे कसब पणाला लागले! राजसाहेब, वर्षागणिक भूमिका बदलणं, आपल्या पक्षाची ताकद दरवेळी कुणाच्यातरी खुंट्याला बांधणं, ही तुमची राजकीय अपरिहार्यता असेलही कदाचित, पण म्हणून जनतेला गृहीत धरून तिलाही स्वत:सोबत फरफटत नेत, कुणाच्यातरी दावणीला बांधण्याची तुमची तर्‍हा लोकांनी का स्वीकारायची, हे तरी सांगा!
तमाम जनतेला दूधखुळ्यांच्या रांगेत बसवून स्वार्थाचे राजकारण करायला निघाला होतात. मोदींनी पाच वर्षांत काहीच केलं नाही म्हणून सांगत होतात. नोटबंदी फसली काय, जीएसटीचे दुष्परिणाम भोगावे लागणार काय, सरकारच्या अपयशाची लक्तरं वेशीवर टांगण्याचा तो आवेश काय, पाच वर्षांत देश खड्‌ड्यात घातल्याचा आरोप काय... निदान डझनभर सभा घेतल्यात साहेब आपण महिनाभरात जनजागृतीचे कारण पुढे करून. जागृत झालेच नाहीत का हो लोक आपल्या प्रभावाने? कारण, निवडणुकीच्या निकालातून तरी तसे काही दिसत नाही. की हवेत भिरकावलेत लोकांनी तुमचे आरोप अन्‌ खड्‌ड्यात घातलीत तुमची मतं?
इथे प्रत्येकाच्या राजकारणाची एक तर्‍हा आहे. जे जाहीरसभेत बोललं जाते ते ण्टीचेंबरमध्ये बोललं जाईलच याची खात्री नसते. नेत्यांच्या बोलण्या-वागण्यातील तफावतीचाही सराव झालाय्‌ एव्हाना लोकांना. निवडणुकीच्या काळातील आश्वासनांची वासलात तर सवयीचा भाग झालीय्‌ त्यांच्या. बहुधा त्यामुळेच की काय, पण सरड्यांहून अधिक वेगाने रंग बदलण्याची राजकारण्यांची तर्‍हा आश्चर्याचा विषय राहिलेला नाही आताशा. कित्येकदा, बड्या लोकांची ही पद्धत आकलनापलीकडची असते सर्वसामान्य जनतेच्या. पण... एक मात्र नक्की. तिला पाहिजे तेव्हा, पाहिजे तसे आपल्या तालावर नाचवू शकतो, असा माज जर कुणाच्या डोक्यात शिरला असेल, तर तो लागलीच उतरवण्याचा बाणाही असतो साहेब जनतेच्या अंगी. आता हेच बघा ना! एवढ्या जाहीरसभा घेऊन, मोदींना मतं देऊ नका असं सांगूनही कुणी भीक घातली तुमच्या आवाहनाला? ‘ते’ देश खड्‌ड्यात घालत असल्याचे लाख सांगून पाहिलं तुम्ही, पण कुणी विश्वास नाही ठेवला नाही बघा. तुम्ही नको म्हटलं तरी भरभरून मतांचं दान त्यांच्या पदरात टाकलं मतदारांनी. लोकांना मूर्ख समजून ज्यांना छुपी मदत करायला निघाला होतात, त्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे लोणचे घातले जनतेने अन्‌ तुमचं तर पाऽऽर भरीत केलं की हो!
राजसाहेब, खरं सांगायचं तर त्या जाहीरसभांमधून तुम्ही मांडलेले सारेच मुद्दे अगदीच खोडून काढावेत असे नव्हते. शिवाय सरकारच्या चुकांवर बोट ठेवणे हा तर विरोधी पक्षाचा, लोकशाहीव्यवस्थेने बहाल केलेला अधिकार. त्यामुळे तुम्ही सरकारवर टीका करण्यात, नरेंद्र मोदींवर तुटून पडण्यात तसे गैर नव्हतेच काही. मग तरीही लोकांनी केराची टोपली का दाखवली तुमच्या आवाहनाला? भाषणांनंतर टाळ्यांचा कडकडाट करूनही मतदान केंद्रांवर कमळावरच बोट का ठेवले असेल लोकांनी, ठाऊकाय्‌? कारण राजसाहेब, लोकांनी तुमचा डाव ओळखला होता. त्यांच्या मतांचा तुम्ही बाजार मांडायला निघाले असल्याचे त्यांनी पुरते जाणले होते. दरवेळी वेगवेगळ्या लोकांसाठी मतं मागण्याची ठाकरी शैली तशीही भावली नव्हतीच कुणाला. यंदाही, एकवेळ स्वत:च्या पक्षासाठी मतं मागायला मैदानात उतरला असता ना, तरीही कदाचित लोक काही प्रमाणात पाठीशी उभे राहिले असते तुमच्या. पण, तुम्ही तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधून घेतले होते स्वत:ला. स्वत:च्या स्वार्थासाठी जनमताचा लिलाव मांडायला निघालात. लोक मोठ्या विश्वासाने आपल्या पाठीशी उभे राहतात म्हणून त्यांना गृहीत धरण्याची चूक करून बसलात. राजसाहेब, जनता, तुम्ही समजता तेवढीही खुळी नाही हो! तिला व्यवस्थितपणे कळते कुणाच्या वागण्या-बोलण्यातून काय अर्थ काढायचा ते. आपल्या भाषण मोहिमेचा कॉंग्रेस-राष्ट्रवादीला फायदा होणार असेल तर होऊ दे, असे म्हणून तुम्ही स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्याचा लाख प्रयत्न केला, तरी लोकांना चांगलेच ठाऊक झाले होते की, राज ठाकरे कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सुपारी घेऊनच मैदानात उतरले आहेत. अप्रत्यक्ष रीत्या नव्हे, प्रत्यक्षपणे त्यांना लाभ मिळवून देण्यासाठीच राजसाहेबांची धडपड चालली आहे. त्यासाठीच त्यांचे इंजीन दिशाहीन भरकटत चालले असल्याची बाबही लपून राहिलेली नव्हतीच कुणाच्याही नजरेतून. तुमच्या लेखी तर काय, सर्वसामान्य माणसं म्हणजे मतदानापुरते गोंजारण्याचे साधन. त्यांना केव्हाही, कसेही मूर्ख बनवता येते. हो ना? असेच वाटले होते ना राजसाहेब तुम्हाला?
पण कसचे काय, या सर्वसामान्य बापुड्यांनी पुरती वाट लावली बघा साहेब तुमची! ज्यांना सत्तेतून बाहेर घालवण्याच्या बाता करत होता, तुमच्या भाषणावर टाळ्या पिटणार्‍यांनी त्या मोदींनाच पुन्हा सत्ता बहाल केली आहे. तीही एकहाती. तुमच्या नाकावर टिच्चून. तुम्ही केलेले सारे आरोप कचर्‍याच्या टोपलीत टाकून. तुम्ही ज्यांना पडद्याआडून मदत करायला निघाला होतात, त्या सर्वांचे खोबरे करून. तुम्हाला तर तोंड दाखवायलाही जागा ठेवली नाही बघा साहेब लोकांनी! खरंच कमाल आहे बरं लोकांची. गर्दी तुमच्या सभेला करतात. टाळ्या तुमच्या भाषणावर ठोकतात अन्‌ मतं तेवढी मोदींना देतात...! बरं, पण साहेब, जाता जाता तेवढं सांगून द्या! तो व्हिडीओ लावायची इच्छा बाकी आहे अजून? की...

Saturday, May 11, 2019

भिकार्‍यांच्या विश्वात...


जराशा सवडीत असलेले दोन सहप्रवाशी आपापल्या प्लेटस्‌ हातात धरून थोडेसे बाजूला उभे राहून नाश्त्याचा आस्वाद घेऊ लागले होते, तोच कोवळ्या वयाची दोन पोरं जवळ येऊन उभी राहिली. काळीकुळी. घाणेरडी. केस विसकटलेली. गेल्या कित्येक दिवसांत आंघोळ केलेली नसावी बहुधा. हातातल्या प्लेटस्‌मधील पदार्थ तोंडात टाकण्यासाठी म्हणून चमच्याच घेत नाही तोच, त्या केविलवाण्या, आशाळभूत नजरांशी सामना झालेला. त्यांना पैसे द्यावेत? छे नकोच! जरा वेगळ्या पद्धतीनं जाऊ या! भूक लागलीय्‌? काही खाणार? असे विचारून, त्यांना नाश्ता देण्यासाठी म्हणून दुकानदाराला इशारा केला. पहिले तर तो कुत्सितपणे हसला. त्याच्यासाठी हा नेहमीचाच प्रकार असावा बहुधा. आणि यांच्यासारख्या ‘दानशूर’ माणसांना सहज मूर्ख बनविणारी ती भिकारडी पोरंही त्याला चांगलीच ठाऊक असावीत बहुतेक. पण गुमानपणे त्यानं, त्याच वेगानं प्लेटस्‌ तयार केल्या अन्‌ त्या पोरांच्या हातात ठेवल्या. पैसे हमखास मिळणार असल्याची शाश्वती असल्यानं घाबरण्याचं कारण नव्हतं. तसंही त्याच्या बाचं काहीच जाणार नव्हतं. उलट, दोन प्लेटस्‌ अनायासेच विकल्या गेल्या होत्या. इकडे, नाश्त्याच्या प्लेटस्‌ या पोरांच्या हाती पडताच, कुठून कुणास ठाऊक, पण पुन्हा काही पोरं सभोवताल येऊन उभी राहिली. तसलीच. त्याच वयाची. अवतारही तसाच काहीसा. त्याच केविलवाण्या नजरा... तेच आशाळभूत चेहरे... 



गाडी फलाटाला लागताच आतली माणसं भराभरा खाली उरतली. निदान तासभर तरी गाडीचा मुक्काम इथनं हलणार नव्हता. वेळ सकाळची. नाश्ता, चहा पटापट आटोपून घ्यावा, अशा बेताने गाडीतील प्रवाशांची गर्दी फलाटावर अवतरली होती. मिळेल त्या दुकानाभोवती माणसं जमली होती. वाफाळलेले पोहे, कढईतल्या तापलेल्या तेलातून नुकतेच तळून काढलेले बटाटेवडे... कुणी मागणी करण्याचीच देर की, दुकानदार भराभरा हात चालवत प्लेटस्‌ तयार करून त्यांच्या पुढ्यात ठेवायचा. तेवढ्या गर्दीतही कुणाकडून किती पैसे घ्यायचेत, याची न चुकणारी गणितं एव्हाना त्याच्या मनात तयार झालेली असायची. ग्राहक तिथनं बाहेर पडायच्या आत बिलाचा आकडा तोंडी सांगून पैसे पेटीत गेलेलेही असायचे.
 जराशा सवडीत असलेले दोन सहप्रवाशी आपापल्या प्लेटस्‌ हातात धरून थोडेसे बाजूला उभे राहून नाश्त्याचा आस्वाद घेऊ लागले होते, तोच कोवळ्या वयाची दोन पोरं जवळ येऊन उभी राहिली. काळीकुळी. घाणेरडी. केस विसकटलेली. गेल्या कित्येक दिवसांत आंघोळ केलेली नसावी बहुधा. हातातल्या प्लेटस्‌मधील पदार्थ तोंडात टाकण्यासाठी म्हणून चमच्याच घेत नाही तोच, त्या केविलवाण्या, आशाळभूत नजरांशी सामना झालेला. त्यांना पैसे द्यावेत? छे नकोच! जरा वेगळ्या पद्धतीनं जाऊ या! भूक लागलीय्‌? काही खाणार? असे विचारून, त्यांना नाश्ता देण्यासाठी म्हणून दुकानदाराला इशारा केला. पहिले तर तो कुत्सितपणे हसला. त्याच्यासाठी हा नेहमीचाच प्रकार असावा बहुधा. आणि यांच्यासारख्या ‘दानशूर’ माणसांना सहज मूर्ख बनविणारी ती भिकारडी पोरंही त्याला चांगलीच ठाऊक असावीत बहुतेक. पण गुमानपणे त्यानं, त्याच वेगानं प्लेटस्‌ तयार केल्या अन्‌ त्या पोरांच्या हातात ठेवल्या. पैसे हमखास मिळणार असल्याची शाश्वती असल्यानं घाबरण्याचं कारण नव्हतं. तसंही त्याच्या बाचं काहीच जाणार नव्हतं. उलट, दोन प्लेटस्‌ अनायासेच विकल्या गेल्या होत्या. इकडे, नाश्त्याच्या प्लेटस्‌ या पोरांच्या हाती पडताच, कुठून कुणास ठाऊक, पण पुन्हा काही पोरं सभोवताल येऊन उभी राहिली. तसलीच. त्याच वयाची. अवतारही तसाच काहीसा. त्याच केविलवाण्या नजरा... तेच आशाळभूत चेहरे... त्यांच्यासाठीही नाश्त्याची आर्डर द्यावी म्हणून दुकानदाराकडे वळलं, तर आता त्याच्या चेहर्‍यावरील मगाचा कुत्सितपणा जाऊन व्यवहारी बाणा झळकत होता. ‘‘जाने दो ना साब! रोजका है इनका. एक को खिलाओगे तो दस जमा होंगे. कितनो को खिलाओगे आप?’’ प्रवासी काय, कधीतरी उतरतात या फलाटावर. तो तर गेली कित्येक वर्षं इथेच होता. त्याच्यासाठी सरावाचा भाग झाला होता हा. लोकांच्या हातातल्या पदार्थांकडे टकमक बघणारी, मोठ्या आशेनं त्यांच्यासमोर हात पसरवणारी ही पोरं... कधी हिडिसफिडिस करून दूर हाकलली जाणारी, तर कधी कुणाच्या दयेला पात्र ठरलेली... दुकानदाराला कशाचंच कौतुक नव्हतं. त्या घाणेरड्या पोरांची ब्याद शिव्यांची लाखोली वाहून दूर लोटणार्‍यांचा राग नाही, की दहा-वीस रुपयांचे खाद्यपदार्थ त्यांच्या पदरात टाकून लाखो रुपयांच्या किमतीचे पुण्य कमावल्याच्या ऐटीत तिथनं बाहेर पडणार्‍यांचा हेवाही नाही. दोघांचेही वास्तव्य काही क्षणांपुरतेच तिथे असल्याचं आणि शेवटी आपण आणि ही भिकारडी पोरं मात्र इथेच असणार असल्याच्या वास्तवाचं भान तेवढं त्याच्या चेहर्‍यावर उमटलेलं...
माणसं, हिडिसफिडिस करून, शिव्याशाप देऊन त्यांना दूर लोटणारी असोत, की पाच-पन्नास रुपये खर्च करून त्यांच्या जिवावर पुण्य कमावल्याच्या गुर्मीत जगणारी... बहुधा त्या दुकानदाराचे कुत्सितपणे हसणे म्हणजे या गुर्मीला दाखवलेल्या वाकुल्या असाव्यात. कदाचित, त्याच्यालेखी तद्दन फालतूपणा ठरलेल्या भाबडेपणावर उमटलेली ती प्रतिक्रिया असेल. त्या भिकारड्या पोरांनी कथित शहाण्यांना घातलेला गंडा, त्याच्या मनात विजयी भाव जागवत असेल? किंवा अशी नवनव्या चेहर्‍यांतून डोकावणारी ‘मूर्ख’ माणसं रोजच बघत असल्याने त्याच्या भावनाच मेल्या असतील? कुठून आले असेल हे कोडगेपण? स्वानुभवातून? आज पोटभर खाऊ घातलं तरी ही समस्या अन्‌ ते भिकारी उद्या पुन्हा आ वासून उभे राहणारच असल्याच्या निराशेतून? की आपल्याला याच परिस्थितीचा सामना रोज करायचा आहे, या धगधगत्या वास्तवातून? मग शहाणं कोण? हे झेंगटच नको म्हणून पहिल्याच टप्प्यात ते दूर लोटणारी अन्‌ त्यांच्या कसल्याच वागण्याचा स्वत:वर परिणाम होऊ न देता मोजलेल्या पैशातून स्वत: नाश्ता करून निर्विकारपणे तिथनं ज्यांना सहजपणे बाहेर पडता आलं, ती माणसं? की असं कुणाला बघितलं की, सहज मनात परोपकराची भावना जागलेली निरागस माणसं? की, मनाच्या कुठल्याशा कप्प्यात साठलेल्या पाप-पुण्याच्या कल्पनेतून पदरचे पाच-पन्नास रुपये खर्च करून पुण्य कमवायला निघालेली माणसं? की, या सर्वांच्या सोबतीने राहूनही सगळ्यांकडे तटस्थपणे बघण्याचा व्यवहारी बाणा कमावून तरबेज झालेला तो दुकानदार?
तो, या गोरगरिबांच्या समस्या अशा दहा-वीस रुपयांनी तोलणार्‍यांना कुत्सितपणे हसतो याचा अर्थ, त्यांच्यावर फुकटची दादागिरी करणार्‍यांबाबत त्याच्या मनात फार आदर असतो असे नाही. त्यांचे असे फटकून वागणेही त्याला तितकेच सलते. पण, तो स्वत:च परिस्थितीपुढे इतका हतबल असतो की, कुणाकडेतरी दुर्लक्ष करणे वा कुणाचे वागणे हसण्यावारी नेणे, यापलीकडे काही करणे त्याच्याही हातात नसते. शिवाय ही पोरं आयुष्यभर ‘अशीच’ जगणार असल्याच्या निराशाजनक निष्कर्षाप्रतही तो आलेला असतो एव्हाना. या लेकरांना पुढे करून स्वत:ची पोटं भरणारे मायबापही त्याला ठाऊक असतात अन्‌ आपल्या ठेल्याभोवती जमलेल्या ग्राहकांपुढे स्वत:च्या लाचारीचे प्रदर्शन मांडून त्यांच्या खिशातून चार पैसे उकळण्याची किमया अनुभवातून साध्य केलेली ही पोरं भविष्यात कधीतरी स्वाभिमानानं जीवन जगतील, जगू शकतील, निदान त्या दिशेनं प्रयत्न करतील, ही आशाही त्यानं सोडून दिलेली असते केव्हाच. एरवी यातल्या चार-दोन जिवांना दिवसभरात दोन घास खाऊ घालण्याची इच्छा त्याच्या मनात कधी डोकावतच नाही, असे नाही. त्याची तशी दानतही नक्कीच असते. पण, मुळातच ही समस्या आपले आकलन आणि आवाक्याबाहेरची असल्याच्या विश्वासावर तो ठाम असतो. शिवाय, त्याच्यासाठी रोजचाच तमाशा असतो हा. म्हणूनच की काय, पण ती समस्या सोडवण्यासाठीची दोन पावलंही तो पुढे टाकत नाही. अन्यथा कुणाचेही हृदय द्रवेल असा तो अवतार, मदतीसाठी साद घालणारी ती आर्जवी नजर, हृदय पिळवटून टाकणारी ती दैनावस्था... याही स्थितीत तटस्थपणे वागू शकणारा तो दुकानदार. त्याचे वागणे केवळ त्याच्या व्यापारी वृत्तीत तोलता येईल?
खरंतर या एकाच दृश्याकडे खूप वेगवेगळ्या तर्‍हेनं बघणारे लोक आहेत समाजात. स्वत:च्या पद्धतीने त्याचे आकलन करणारी माणसंही शेकड्यानं आहेत. नेहमीचीच असल्याने कुणाला त्या समस्येच्या वाटेनेच जायचे नसते, तर कुणाला याही परिस्थितीत पुण्य कमावण्याच्या वेडाने झपाटलेले. कुणी माणुसकीच्या भावनेने ओतप्रोत भरले म्हणून मदतीसाठी सरसावलेले. मदत करून निघून गेलेले... समस्या मात्र जागच्या जागीच. कुणीतरी ‘अशा’ मुलांसाठी प्लॅटफॉर्मवरची शाळा चालवीत असल्याची बातमी कौतुकाचा विषय ठरते या समाजासाठी. बाकी, त्यांचे विश्व त्यांचेच असते. जगण्याची विवंचना पाचवीला पुजलेली. चेहर्‍यावरच्या लाचारीचा भाव घरातल्या अठरा विश्वे दारिद्र्यातून उमटलेला असतो. कुटुंबाच्या पालनपोषणासाठी कमाईचा हा एकमेव, सोपा मार्ग नजरेसमोर असतो. लोक भावनेच्या भरात वाहून जातात, हे अनुभवाने ठाऊक झाले असल्याने, त्याच भावनांचा बाजार मांडण्याचा प्रयत्न होतो. आपल्या जिवावर पुण्य कमावण्याची संधी बहाल करायला मग हीच लेकरं विचित्र अवतार लेवून सरसावतात. आपले रूप जेवढे ओंगळवाणे तेवढी कमाई जास्त, हे त्यांनी जाणलेले असते. लोकांच्या भावनांना हात घालण्यासाठीच कोवळ्या वयाचं रडकं मूल कुणाच्यातरी कडेवर येते. कारण, त्यामुळे खिशात पडणारा भिकेचा आकडा वाढणार असतो. खरंतर हाही सरळ सरळ भावनांचा व्यापारच असतो. ‘त्या’ दुकानदाराला हे सारं ठाऊक असते म्हणून तो कशालाच बधत नाही, एवढंच. लोकांनी चोखाळलेल्या मार्गानेही ही समस्या निकाली निघणार नसल्याचीही खात्री असतेच मनात त्याच्या...