Saturday, May 26, 2018

निवडणुकीचा बाजार अन्‌ मतांचा लिलाव

परवा राज्यभरात पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत जिथेकुठे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांना मताधिकार लाभला होता, त्या मतदारांनी घातलेला धिंगाणाही कल्पनातीतच आहे. या सदस्यांना म्हणे पैसे लागतात मतदान करण्याचे! जो पैसे देईल त्यालाच मत देणार! पक्ष गेला खड्‌ड्यात अन्‌ नेते गेले उडत. त्यांच्या स्वत:च्या निवडणुकीच्यावेळी पक्षाने इतरांची दावेदारी मोडीत काढून यांना उमेदवारी दिली, देहभान विसरून कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयासाठी मेहनत घेतली, पक्षाने प्रतिष्ठा पणाला लावत त्यांना निवडून आणले, त्याचा सार्‍यांनाच विसर पडलेला. विधान परिषदेचा एक सदस्य आपल्या मतांच्या भरवशावर निवडून येतो म्हटल्यावर त्या मताच्या वाढलेल्या ‘िंकमती’ची जाणीव सर्वांनाच झालेली. ती िंकमत ‘वसूल’ करण्यासाठीची निलाजरी धडपड सुरू झाली आहे अलीकडे. विचारांच्या िंभती मोडून, पक्षाच्या चौकटी ओलांडून, जो जास्त िंकमत मोजेल त्याच्या झोळीत आपल्या मताचे दान टाकण्याच्या रुढ होऊ लागलेल्या या प्रघातात उमेदवाराच्या उमेदवारीला लाभणारे पक्षाच बळ आपसूकच ठिसूळ होऊ लागले आहे. पैशाची ताकद ‘मोलाची’ ठरू लागली आहे. त्यामुळे या निवडणुकीतला उमेदवार आर्थिकदृष्ट्या ‘तगडा’च लागतो. पक्षालाही अन्‌ मतदारांनाही.

कर्नाटकातल्या परावाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिथल्या नवनिर्वाचित आमदारांना हैदराबादेतील एका रिसॉर्टमध्ये बंदिस्त करून ठेवण्याचा प्रकार असो की मग, विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने एका राजकीय पक्षाने आंध्रप्रदेशातील करीमनगरात भरवलेली नगरसेवकांची जत्रा असो, निवडणुकी दिवसागणिक ज्या दिशेने प्रवाहीत होताहे, ते बघितल्यानंतर सर्वसामान्य माणसाचा या प्रक्रियेवरचा विश्वासच डळमळीत व्हावा अशी अवस्था आहे. सरासरी तीन लक्ष लोकांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी म्हणून अगदी काल-परवाच निवडून आलेला आमदार कुणीतरी दाखवलेल्या आमीषाला बळी पडून लागलीच आपला पक्ष सोडून दुसर्‍या पक्षात जाऊ शकतो, लाखभर रुपयांच्या लालसेपोटी पक्षाबद्दलच्या निष्ठेला लाथ मारून स्वत:ची भूमिका बदलू शकतो, अशा कल्पनेपलीकडच्या भीतीपोटी आमदारांना एकत्र बांधून ठेवण्याचा प्रयोग तसा नवा नाहीच. यापूर्वीही कित्येकदा असा प्रकार घडला आहे. मुद्दा फक्त एवढाच आहे की, ज्यांनी कालपर्यंत स्वत:च्या पक्षावरील निष्ठेचे प्रदर्शन मांडत या निवडणुकीत उमेदवारी मिळवली, विरोधकांना शिव्याशाप देत, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत प्रचार केला, स्वत:च्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना मैदानात उतरवून त्यांच्या पदाचा, प्रतिमेचा उपयोग करून घेत निवडणूक लढवली-िंजकली, त्या आमदाराला निकालानंतरच्या आठवडाभरातच कुणीतरी आमीष दाखवून परागंदा करू शकतो? चार दिवसातच त्याच्या पक्षनिष्ठेवर, नेत्यांवरील त्याच्या श्रद्धेवर प्रश्नचिन्ह उभे राहू शकते? इतक्या तकलादू ठरतात त्यांच्या लेखी या सार्‍या बाबी? तसे नसेल तर मग, लोकप्रतिनिधीत्वाचे बिरूद मिरविणार्‍या इतक्या मोठ्या पदावरील व्यक्ती अशा, बेंडक्यात कोंबड्या कोंबाव्यात तशा, कुठल्याशा हॉटेलच्या खोल्यांमध्ये कोंबण्याच्या लायकीच्या का ठराव्यात?
बरं, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवकांचीही लायकी काही आमदारांच्या पलीकडची नाही. परवा राज्यभरात पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत जिथेकुठे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांना मताधिकार लाभला होता, त्या मतदारांनी घातलेला धिंगाणाही कल्पनातीतच आहे. या सदस्यांना म्हणे पैसे लागतात मतदान करण्याचे! जो पैसे देईल त्यालाच मत देणार! पक्ष गेला खड्‌ड्यात अन्‌ नेते गेले उडत. त्यांच्या स्वत:च्या निवडणुकीच्यावेळी पक्षाने इतरांची दावेदारी मोडीत काढून यांना उमेदवारी दिली, देहभान विसरून कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयासाठी मेहनत घेतली, पक्षाने प्रतिष्ठा पणाला लावत त्यांना निवडून आणले, त्याचा सार्‍यांनाच विसर पडलेला. विधान परिषदेचा एक सदस्य आपल्या मतांच्या भरवशावर निवडून येतो म्हटल्यावर त्या मताच्या वाढलेल्या ‘िंकमती’ची जाणीव सर्वांनाच झालेली. ती िंकमत ‘वसूल’ करण्यासाठीची निलाजरी धडपड सुरू झाली आहे अलीकडे. विचारांच्या िंभती मोडून, पक्षाच्या चौकटी ओलांडून, जो जास्त िंकमत मोजेल त्याच्या झोळीत आपल्या मताचे दान टाकण्याच्या रुढ होऊ लागलेल्या या प्रघातात उमेदवाराच्या उमेदवारीला लाभणारे पक्षाच बळ आपसूकच ठिसूळ होऊ लागले आहे. पैशाची ताकद ‘मोलाची’ ठरू लागली आहे. त्यामुळे या निवडणुकीतला उमेदवार आर्थिकदृष्ट्या ‘तगडा’च लागतो. पक्षालाही अन्‌ मतदारांनाही. हो! अपवाद वगळला तर, या निवडणुकीत म्हणे फक्त पैशाच्याच एका निकषावर उमेदवारी मिळते. तसा तर प्रत्येकच निवडणुकीसाठी तो एक महत्त्वाचा निकष ठरतोय्‌ आताशा. पण स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य  मतदार असलेल्या परवाच्या निवडणुकीत बहुतांश ठिकाणी, बहुतांश राजकीय पक्षांबाबत त्याचाच प्रयत्य आला. यातल्या एका मतदारसंघात एका राजकीय पक्षाने, समर्पित भावनेने काम करणार्‍या एका कार्यकर्त्याला उमेदवारी दिली तर केवढा त्रागा झाला ‘जागरूक’ मतदारांचा! हा कार्यकर्ता निवडणुकीला उभा राहणार म्हणजे ‘कमाई’ची संधी हुकणार असल्याची खंत कित्येकांच्या चेहर्‍यावर झळकत होती. आपल्याच पक्षाचा, आपल्याच विचारांचा असला म्हणून काय झालं ज्याच्याकडून फुटकी कवडी मिळणार नाही, तो उमेदवार काय कामाचा? विचार काय चाटायचेत, पक्ष काय डोक्यावर घेऊन मिरवायचा, असा विचार करून, पक्षनिष्ठा पायदळी तुडवत ‘व्यवहारी’ वागणार्‍या मतदारांची संख्या दखलपात्र ठरावी इतकी वाढली आहे, अलीकडच्या काळात.
यंदाच्या या निवडणुकीत सर्वदूर झालेली मतांची फाटाफूट, पक्षाच्या अधिकृत सदस्यसंख्येएवढीही मते त्या पक्षाच्या उमेदवाराला न मिळाल्याची परिस्थिती तर अतिशय गंभीर म्हटली पाहिजे. अमरावतीत 128 सदस्य असलेल्या कॉंग्रेस उमेदवाराच्या पारड्यात फक्त 17 मतं पडतात अन्‌ 303 सदस्यसंख्या असलेल्या शिवसेनेला पराभूत करून रत्नागिरीत 174 सदस्यांची राष्ट्रवादी यश संपादन करते...सारेच अनाकलनीय आहे.  कुठल्याशा स्वार्थापोटी स्वत:च्या पक्षाच्या उमेदवाराला मत न देणारा हा मतदार कधीतरी स्वत:ही त्या पक्षाचा उमेदवार  राहिला आहे. त्या निवडणुकीतल्या त्याच्या विजयासाठीही त्या पक्षाचे कार्यकर्ते झटले आहेत. तोच मतदार आता जर पक्षाला िंकमत देणार नसेल, तर मग त्या मतदाराच्या विजयासाठी तरी कार्यकर्त्यांनी का जुंपून घ्यायचे स्वत:ला? का म्हणून पक्षाच्या बड्या नेत्यांनी वेळ काढून सभा घ्यायच्या त्या उमेदवाराच्या प्रचारासाठी? स्वत:ची निवडणूक असेल, तेव्हा तो ‘पक्षाचा उमेदवार’ असतो? पण एकदा नगरसेवक म्हणून, जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आला की, दुसर्‍याला मतदान करताना मात्र त्याला त्या मताधिकाराचा मोबदला लागतो?
एकूणच निवडणुकीच्या निमित्ताने मांडला जाणारा हा मतांचा बाजार लोकशाहीच्या दृष्टिने काही खूप चांगला नाही. हा सारा तमाशा बघितल्यानंतर,  ‘‘कशाला निवडणुकीची नाटकं करता?  पैशाने बोली लावा अन्‌ देऊन टाका आमदारकी जो अधिक रकमेचा आकडा बोलेल त्याला... ’’ अशी संतापजनक प्रतिक्रिया सामान्य माणसाच्या उद्विग्नतेतून व्यक्त होऊ लागली आहे. ज्याच्याजवळ पैसा नाही, अशा व्यक्तीला एकतर उमेदवारीच मिळत नाही अन्‌ मिळालीच चुकून कधी तर त्याची कशी दमछाक होते, त्याच्या उपयोगितेवरच प्रश्नचिन्ह उभे करत राजकारणातले ‘व्यापारी’ आपसात कडबोळे करून त्याच्या मार्गात कसे अडथळे निर्माण करतात, याची साक्षीदार ठरलीय्‌ ही निवडणूक. तर दुसरीकडे, फेकलेल्या तुकड्यांसाठी लाळघोटेपणा करणार्‍या मतदारांनी पक्षाच्या चौकटी झुगारून कुठे कुठे, कसे कसे, कुणाकुणाला निवडून आणले हेही उघड झाले. सामान्य मतदारांनी यांना पक्षाचा उमेदवार म्हणून फुकटात मतं द्यायची अन्‌ यांची वेळ आली की  यांनी मात्र पक्ष मर्यादा झुगारून लावायची. दिलेल्या मताच्या बदल्यात पैसा मोजायचा? लीलावात बोली लावून आपले मत विकायचे?
कर्नाटकातल्या परावाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिथल्या नवनिर्वाचित आमदारांना हैदराबादेतील एका रिसॉर्टमध्ये बंदिस्त करून ठेवण्याचा प्रकार असो की मग, विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने एका राजकीय पक्षाने करीमनगरात भरवलेली नगरसेवकांची जत्रा, कुणीतरी आमीष दाखवेल असा कांगावा करत, त्या आमीषानं बिथरण्याच्या भितीपोटी कॉंग्रेसनं कर्नाटकात सारे आमदार एका खुंट्याला बांधून ठेवण्याचा प्रकार असो की परवाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नाशकापासून तर परभणीपर्यंतच्या मतदारांना विविध राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी घडवलेली सहल, तिथे चाललेली त्यांची चैन, पैशाची उधळण... कानावर पडलेले सारेच किस्से अनाकलनीय, अस्वस्थ करणारे आहेत. कुणाचाच कुणावर विश्वास नसल्याचा आणि तरीही सारेच एकमेकांशी बिनदिक्कतपणे ‘व्यवहार’ करीत असल्याचा अजब तमाशा यानिमित्ताने बघायला मिळाला आहे. तिकडे आमदार होते अन्‌ इकडे नगर सेवक, एवढा एक फरक सोडला तर मग हैदराबादच्या त्या आलीशान रिसॉर्टमध्ये जमलेल्या गर्दीत अन्‌ ठिकठिकाणी भरलेल्या राजकीय जत्रेत भेद कसा करायचा सांगा?

 


Saturday, May 12, 2018

नक्षलसमर्थकांच्या सत्यशोधनाची नौटंकी!

एरवी नक्षलवादी चळवळीचे समर्थन करण्याची एकही संधी सोडत नाहीत ते. ही चळवळ म्हणजे सरकारी यंत्रणेविरुद्धचे युद्ध असल्याचा दावा असतो त्यांचा. पण, हे युद्धही त्यांना एकतर्फी हवे असते. त्यात फक्त पोलिसच मेलेले हवे असतात त्यांना. पोलिसांच्या बंदुकीने नक्षलवाद्यांच्या माना उडाल्या की मात्र जीव कळवळून उठतो त्यांचा. जर, या चळवळीचा एका युद्धाच्या स्वरूपात स्वीकार केलाय् तर मग स्वकीयांच्या मृत्यूची कल्पना का मानवत नाही चळवळीच्या समर्थकांना? त्यांनी पुकारलेल्या युद्धात फक्त पोलिसांनीच मरायचं का? त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, त्यांचा निवडणुकीच्या प्रक्रियेवर विश्वास नाही, त्यांचा सरकारी यंत्रणेवरही म्हणे विश्वास नाही. मग लोकशाही व्यवस्थेतल्या चौथ्या स्तंभावर बरा विश्वास बसतो त्यांचा! सरकार अन् पोलिसांविरुद्धचे रडगाणे गाण्याकरिता प्रसारमाध्यमांचा वापर करताना कुठेच आडकाठी येत नाही नक्षलवाद्यांना? फक्त इतर यंत्रणांबाबत बोलायचे म्हटले की लोकशाही व्यवस्थेवरील अविश्वासाचे तुणतुणे वाजवायला मोकळे असतात सारे. परवा, नक्षल समर्थकांच्या या टोळक्याच्या नेमक्या याच नौटंकीवर वार झालेत. टोेळक्यातील सदस्य दाखल होताच, लोकांनी प्रश्नांचा मारा सुरू केला. उत्तरं देताच येणार नाहीत, अशा प्रश्नांनी सळो की पळो करून सोडले त्यांनी या शहाण्यांना. 

तशी ती घटना मोठीच. पण. सर्वांच्याच लेखी दुर्लक्षित राहिली. सनसनाटी निर्माण करण्याची कुवत नसल्याने असेल किंवा या देशातील कथित पुरोगाम्यांसाठी अडचणीची ठरणार असल्यानेही असेल कदाचित, पण अपवादानेच कुणी त्या घटनेची दखल घेतली. झालं काय की, राज्याच्या टोकावर वसलेल्या गडचिरोली जिल्ह्यातल्या एका दुर्गम गावात गेल्या आठवड्यात पोलिसांनी 34 नक्षलवाद्यांच्या शरीराची अक्षरश: चाळणी केली. या घटनेच्या वृत्ताची शाई वाळते न वाळते तोच राजाराम खांदला येथे सात नक्षली तसल्याच एका कारवाईत मारले गेले. या दोन्ही घटनांबाबत तसा सगळीकडे आनंदच व्यक्त होत होता. हो! दु:ख व्हायचे कारणच काय? असे असताना समाजातील कथित हुशार मंडळींचा एक गट लागलीच घटनास्थळी दाखल झाला. त्यांच्या पातळीवर, त्यांच्या पद्धतीने या घटनेचे वाभाडे काढण्याची तयारी त्यांनी आरंभलीच होती, तर गावकर्यांच्या जराशा ‘वेगळ्या’ वर्तणुकीचा अनुभव त्यांना अस्वस्थ करू लागला. एरवी ‘यांनी’ आपल्या अधिकारांचे प्रदर्शन मांडत साहेबी थाटात गावात यायचे, पोलिसी पद्धतीनं चौकशा करायच्या. सरकारला आरोपीच्या पिंजर्यात उभं करून मोकळं व्हायचं, हीच त्यांची प्रचलित रीत होती. गावकर्यांचं काय, ही मंडळी एवढ्या दुरून आपल्या गावात आल्याचेच त्यांना कौतुक. दूरवरच्या शहरांतून धुराळा उडवीत आलेला त्यांच्या गाड्यांचा ताफाही एरवी दुर्गम भागातील या आदिवासी बांधवांसाठी कौतुकाचा विषय! त्या गाड्यांमधून उतरलेली शहरी माणसं आपल्याशी बोलतात, चार-दोन प्रश्न विचारतात, एवढ्यानेच हुरळून जायचेत लोक आजवर. मग ही मंडळी आपल्याच गावातील त्या घटनेबाबत तिकडे नागपूर, दिल्ली, मुंबईत जाऊन काय अकलेचे तारे तोडतात, काय चलाखी करतात, याबाबततर खबरबातही नसायची गावातील कुणालाच.
हीच परिपाठी वर्षानुवर्षे चालत राहिली आहे. एखाद्या घटनेत नक्षलवादी मारले गेले रे गेले की कम्युनिस्ट विचारांच्या स्वयंघोषित शहाण्यांची ‘सत्यशोधक’ समिती लागलीच गावात हजर! पण, नक्षल्यांच्या हल्ल्यात पोलिस, गावकरी मारले जातात तेव्हा मात्र पत्ता नसतो यातल्या कुणाचाच दूरदूरपर्यंत. ही बाब पूर्वानुभावानं गावकर्यांच्याही ध्यानात आली अन् बहुधा त्यामुळेच, यंदा कसनासुरात दाखल झालेल्या सत्यशोधन समितीला त्यांच्या तीव्र रोषाचा सामना करावा लागला.
पोलिसांच्या कारवाईत नक्षलवादी मारले गेले की लागलीच धावत येता, मग गावातली आमची माणसं मारली जातात, तेव्हा का नाही येत, या आणि अशा कित्येक प्रश्नांचा भडिमार सुरू झाल्याने अडचणीत सापडलेल्या नक्षलसमर्थकांच्या टोळीतील सदस्यांची तारांबळ उडाली. या प्रकरणातून दोन गोष्टी साध्य झाल्यात. एकतर कालपर्यंत यांनी यायचं, यांनीच प्रश्नांची सरबत्ती करायची अन् गावकर्यांनी गुमान ऐकून घ्यायचं, असल्या कार्यपद्धतीवर पहिल्यांदा खीळ बसली. दुसरं म्हणजे दुर्गम भागात राहात असले, नाही म्हणायला जगण्याचीही काहीशी विवंचना असली, तरी गावाकडची ही माणसं, हे लोक समजतात तेवढी अडाणीही राहिलेली नाहीत आता. त्यांनाही भल्या-बुर्याची, खर्या-खोट्याची जाण आहे. कोण फसवतंय्, कोण लुबाडतंय्, कोण वापर करून घेतंय् अन् कोण खरोखरीच पाठीशी उभं राहतंय्, हेदेखील एव्हाना लक्षात आले आहे त्यांच्या. नक्षल्यांनी आजवर आपल्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला, गरिबीच्या आपल्या परिस्थितीचा जगभर बाजार मांडला, अन्याय-अत्याचाराची वस्तुस्थिती होतीच कधीकाळी, पण त्यातून बाहेर काढण्यापेक्षा कुणाच्यातरी राजकारणासाठी सौदेच झाले त्या परिस्थितीचे. त्यामुळे प्रश्न सुटले नाहीतच. उलट इतरांनीच त्या प्रश्नांच्या राईचा पर्वत करून वाहवाही लुटली. आदिवासी मात्र होता तसाच राहिला... पण, सभोवतालच्या लोकांना समजून घेण्याबाबतचा त्याचा बाणेदारपणा मात्र दुपटीने वाढला. परवाचा कसनासुरातला प्रत्यय नेमका त्याच संदर्भातला आहे...
सुमारे 10 वर्षांपूर्वी बेनासूर टोलाच्या एका महिला सरपंचाला गावकर्यांच्या डोळ्यांदेखत गळा चिरून संपवले नक्षल्यांनी. तिने गावात उभारलेले चर्चही ध्वस्त केले गेले तेव्हा. ती शिक्षा होती, गावकर्यांची मोट बांधून त्यांना सकारात्मक दिशेने प्रवाहित करण्याकरता आरंभलेल्या प्रयत्नांची. पत्रु दुर्गे नावाचा एक तरुण कार्यकर्ताही असाच बळी ठरला नक्षलवाद्यांनी मांडलेल्या छळवादाचा. गावकर्यांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी त्यांनी मांडलेला तमाशा, मनाचा थरकाप उडविणारा तो थरार... सुन्न झाली घराघरातली माणसं. ते गावकरी. त्यांच्या आक्रोशाने सारा आसमंत व्यापून टाकला गेला होता. पण, एकही सत्यशोधन समिती कधी आली नाही त्या घटनेची चौकशी करायला अन् सत्य जगासमोर मांडायला. का? हे कृत्य नक्षलवाद्यांनी केले होते म्हणून? नक्षल्यांची हत्या झाली की लागलीच मानवाधिकाराचे स्मरण होते या लोकांना अन् आदिवासी मारला जातो तेव्हा नाही होत कुणालाच मानवी अधिकारांची आठवण? कसनसूर आणि राजारामच्या घटनेत नक्षली मारले जाताच आंध्रप्रदेशपासून तर पुण्यापर्यंतची मंडळी एकत्र येऊन गडचिरोलीत दाखल होते. फक्त गरीब आदिवासी मारले जातात तेव्हाच फुरसत होत नाही त्यांना इथे पोहोचण्याची.
एरवी नक्षलवादी चळवळीचे समर्थन करण्याची एकही संधी सोडत नाहीत ते. ही चळवळ म्हणजे सरकारी यंत्रणेविरुद्धचे युद्ध असल्याचा दावा असतो त्यांचा. पण, हे युद्धही त्यांना एकतर्फी हवे असते. त्यात फक्त पोलिसच मेलेले हवे असतात त्यांना. पोलिसांच्या बंदुकीने नक्षलवाद्यांच्या माना उडाल्या की मात्र जीव कळवळून उठतो त्यांचा. जर, या चळवळीचा एका युद्धाच्या स्वरूपात स्वीकार केलाय् तर मग स्वकीयांच्या मृत्यूची कल्पना का मानवत नाही चळवळीच्या समर्थकांना? त्यांनी पुकारलेल्या युद्धात फक्त पोलिसांनीच मरायचं का? त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, त्यांचा निवडणुकीच्या प्रक्रियेवर विश्वास नाही, त्यांचा सरकारी यंत्रणेवरही म्हणे विश्वास नाही. मग लोकशाही व्यवस्थेतल्या चौथ्या स्तंभावर बरा विश्वास बसतो त्यांचा! सरकार अन् पोलिसांविरुद्धचे रडगाणे गाण्याकरिता प्रसारमाध्यमांचा वापर करताना कुठेच आडकाठी येत नाही नक्षलवाद्यांना? फक्त इतर यंत्रणांबाबत बोलायचे म्हटले की लोकशाही व्यवस्थेवरील अविश्वासाचे तुणतुणे वाजवायला मोकळे असतात सारे. परवा, नक्षल समर्थकांच्या या टोळक्याच्या नेमक्या याच नौटंकीवर वार झालेत. टोेळक्यातील सदस्य दाखल होताच, लोकांनी प्रश्नांचा मारा सुरू केला. उत्तरं देताच येणार नाहीत, अशा प्रश्नांनी सळो की पळो करून सोडले त्यांनी या शहाण्यांना. मग गडचिरोलीच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रात कुठे पत्रकारांशी संवाद साधण्याचीही गरज उरली नाही. गडचिरोलीतही, जे मारले गेले ते नक्षलवादी नव्हते हेही धड म्हणता आलं नाही त्यांना. उगाच चार-दोन वर्षांपूर्वीच्या कुठल्याशा प्रकरणात काय घडलं होतं नि कसा अन्याय झाला होता, अशा फालतू गोष्टींचा फाफटपसारा असलेला अहवाल ‘या’ या घटनेच्या संदर्भात सादर करण्यात ताकद खर्ची घातली त्यांनी. ज्यांनी प्रश्नांचा भडिमार केला ते लोक म्हणजे पोलिसांनी ‘पाठविलेले’ लोक ठरवून गावकर्यांच्या भावना पायदळी तुडविण्याचाही प्रयत्न, सत्य शोधण्याचा दावा करणार्या या नक्षल समर्थकांनी परवा केला.
पांढरपेशावर्गातील नक्षल समर्थकांच्या विविधांगी क्लृप्त्यांचे आश्चर्य नाहीच. गेली कित्येक वर्षे हाच धंदा चाललाय् त्यांचा. तो नक्षली चळवळीच्या कार्यपद्धतीचाही एक भाग आहे. चळवळीतील कुणी मेलं की लागलीच पोलिस आणि सरकारला आरोपीच्या पिंजर्यात उभे करत धारेवर धरण्याचा. आज इतक्या वर्षांनंतर त्यांनाच आरोपीच्या िंपजर्यात उभे करत धारेवर धरण्याची आदिवासी जनतेने अनुसरलेली तर्हा, हीच परिवर्तनाची नांदी आहे...