Friday, August 18, 2017

व्वा! अशोकराव!

राजमान्य राजेश्री. पत्र लिहिण्यास कारण की, परवा आपण एक भलामोठा विनोद केल्याचे समजले. दूऽऽर राजधानीत केलेल्या त्या विनोदावर सारा महाराष्ट्र खळाळून हसला म्हणे! छान टाईमपास झाला बघा! तसेही कॉंग्रेसच्या नेत्यांना आता तेवढेच एक काम राहिले असल्याचे आमचा बबन म्हणाला. बबन! आमचा गडी हो! इतक्यात लयच बिघडलाय् ताल त्याचा. चार पेपर वाचून, दोन-चार चॅनेल्सवर चालणार्‍या कुठल्याही विषयावरच्या निरर्थक चर्चा ऐकून खूप हुशार समजायला लागलाय् स्वत:ला. त्यामुळे, त्याचं म्हणणं तुम्ही नका घेऊ फारसं मनावर. चव्हाण काय नि ओबामा काय, सर्वांनाच फैलावर घेतो तो अलीकडे. तर सांगायचा मुद्दा असा की, सर्वप्रथम आपण केलेल्या ‘त्या’ धाडसी विधानाबद्दल आपल्याला त्रिवार कुर्निसात! खरं तर भाऊ, जाहीर सत्कारच व्हायला हवा तुमचा. तोही भर चौकात. म्हणजे काय? व्हायलाच हवा. केवढ्या त्वेषाने वार केलेत तुम्ही परवा मोदी सरकारवर. म्हणालात, हे सरकार खादाड आहे. भ्रष्टाचारी आहे. ‘‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’’ असं म्हणत सारेच खाताहेत्… व्वा! मानलं बुवा तुम्हाला. खरं सांगतो अशोकराव, ऊर अभिमानानं भरून आला बघा, तुमचा तो आवेश बघून. आठवतं? आदर्श घोटाळ्यात, शहीद सैनिकांचे नाव घेऊन मुंबईत निर्माण केलेल्या एका फ्लॅट स्कीममध्ये आपल्या जवळच्या नातवाईकांना फ्लॅटस् मिळवून दिल्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता तुम्हाला. नाहीच आठवणार तुम्हाला ते… पण, क्षणभर आम्हालाही विसर पडला बघा त्या घटनेचा, तुमचे कालचे बोलणे ऐकून. आपण केलेले कारनामे विसरूनच समोरच्यावर वार करायचे असतात म्हणे राजकारणात? तुम्ही तर काय राजकारणाचा वारसा घेऊनच जन्माला आला आहात. त्यामुळे स्वत: केलेला आदर्श घोटाळा पदराआड दडवून, जेव्हा तुम्ही मोदी सरकारवर वार करायला आवेशानं तलवार उपसली, तेव्हा तुमच्या हिमतीला तर दादच द्यायला हवी. हो ना? तेव्हा अशोकराव, सलाम तुमच्या त्या करारी बाण्याला… अन् स्वत: घातलेला गोंधळ बेमालूमपणे विसरून जाण्याच्या तुमच्या त्या शैलीलाही…
मा. अशोकराव चव्हाण, 
माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, नांदेड.
ह. मु. मुंबई.
सप्रेम नमस्कार!
राजमान्य राजेश्री. पत्र लिहिण्यास कारण की, परवा आपण एक भलामोठा विनोद केल्याचे समजले. दूऽऽर राजधानीत केलेल्या त्या विनोदावर सारा महाराष्ट्र खळाळून हसला म्हणे! छान टाईमपास झाला बघा! तसेही कॉंग्रेसच्या नेत्यांना आता तेवढेच एक काम राहिले असल्याचे आमचा बबन म्हणाला. बबन! आमचा गडी हो! इतक्यात लयच बिघडलाय् ताल त्याचा. चार पेपर वाचून, दोन-चार चॅनेल्सवर चालणार्‍या कुठल्याही विषयावरच्या निरर्थक चर्चा ऐकून खूप हुशार समजायला लागलाय् स्वत:ला. त्यामुळे, त्याचं म्हणणं तुम्ही नका घेऊ फारसं मनावर. चव्हाण काय नि ओबामा काय, सर्वांनाच फैलावर घेतो तो अलीकडे. तर सांगायचा मुद्दा असा की, सर्वप्रथम आपण केलेल्या ‘त्या’ धाडसी विधानाबद्दल आपल्याला त्रिवार कुर्निसात! खरं तर भाऊ, जाहीर सत्कारच व्हायला हवा तुमचा. तोही भर चौकात. म्हणजे काय? व्हायलाच हवा. केवढ्या त्वेषाने वार केलेत तुम्ही परवा मोदी सरकारवर. म्हणालात, हे सरकार खादाड आहे. भ्रष्टाचारी आहे. ‘‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’’ असं म्हणत सारेच खाताहेत्… व्वा! मानलं बुवा तुम्हाला. खरं सांगतो अशोकराव, ऊर अभिमानानं भरून आला बघा, तुमचा तो आवेश बघून. आठवतं? आदर्श घोटाळ्यात, शहीद सैनिकांचे नाव घेऊन मुंबईत निर्माण केलेल्या एका फ्लॅट स्कीममध्ये आपल्या जवळच्या नातवाईकांना फ्लॅटस् मिळवून दिल्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता तुम्हाला. नाहीच आठवणार तुम्हाला ते… पण, क्षणभर आम्हालाही विसर पडला बघा त्या घटनेचा, तुमचे कालचे बोलणे ऐकून. आपण केलेले कारनामे विसरूनच समोरच्यावर वार करायचे असतात म्हणे राजकारणात? तुम्ही तर काय राजकारणाचा वारसा घेऊनच जन्माला आला आहात. त्यामुळे स्वत: केलेला आदर्श घोटाळा पदराआड दडवून, जेव्हा तुम्ही मोदी सरकारवर वार करायला आवेशानं तलवार उपसली, तेव्हा तुमच्या हिमतीला तर दादच द्यायला हवी. हो ना? तेव्हा अशोकराव, सलाम तुमच्या त्या करारी बाण्याला… अन् स्वत: घातलेला गोंधळ बेमालूमपणे विसरून जाण्याच्या तुमच्या त्या शैलीलाही…
काय गंमत आहे बघा, कोळशापासून तर टुजीपर्यंत, भ्रष्टाचाराच्या आरोपांचा डोंगर ज्यांच्या माथ्यावर आहे, ए. राजापासून तर सुरेश कलमाडींपर्यंत अन् डॉ. मनमोहनसिंगांपासून तर खुद्द अशोक चव्हाणांपर्यंत ज्या पक्षाचे लोक आजही आरोपीच्या पिंजर्‍यात उभे आहेत, त्या पक्षाला आणि त्याच्या नेत्यांना जर आता भ्रष्टाचाराचा वीट आला असेल, तर हा काळाचा महिमा म्हणायचा की सत्ता हातून गेल्यानंतर सुचू लागलेले शहाणपण म्हणायचे, हा तर प्रश्‍नच आहे. पण, ज्या पद्धतीने या पक्षाचे लोक मोदींवर टीकेची बरसात करत सुटलेत अन् भ्रष्ट कारभाराविरुद्धचा त्यांच्या मनातला तिटकारा ज्या तर्‍हेने व्यक्त होतोय् तो बघितल्यावर, सत्तेत असताना आम जनतेच्या भावभावनांचे लचके तोडणारी जमात सत्तेविना कासावीस होत अलीकडे थेट हरीश्‍चंद्राचाच अवतार धारण करू लागलीय् की काय, असा प्रश्‍न पडतो. मुख्यमंत्री असताना पदाचा गैरवापर करून ज्यांना आदर्श इमारतीत फ्लॅट मिळवून दिला, त्या सासूबाईंना ‘दूरचे नातेवाईक’ संबोधणारे तुम्ही अशोकराव! तुम्हाला केव्हापासून भ्रष्टाचारमुक्तीची स्वप्नं पडू लागली हो? कॉंग्रेस पक्षातल्या एकाहून एका मातब्बर भ्रष्टाचारी नेत्यांविरुद्ध कधी चकार शब्द काढला नाही तुम्ही अन् भाजपाच्या कथित खाबुगिरीवर तुटून पडण्याइतके बळ एकवटू लागलात अचानक?
बरं ते जाऊ द्या! राजकारणात वावरायचं तर असली पोपटपंची करावीच लागते म्हणतात. पण, तुम्हीच सांगा अशोकराव, मोदी सरकारला फेकू फेकू म्हणून हिणवताना जराशी लाज वाटत नाही काहो तुमच्या पक्षाच्या एकाही नेत्याला? तो प्रसंग आठवतो? विलासराव मुख्यमंत्री होते. एका निवडणुकीत महाराष्ट्रातले भारनियमन पूर्णपणे संपविण्याचे आश्‍वासन वारेमाप देत सुटले होते कॉंग्रेसचे नेते. पण, तो शब्द नंतरच्या काळात पूर्ण करता आला नाही तेव्हा ‘‘निवडणुकीत असली आश्‍वासनं द्यावीच लागतात,’’ असं हसत हसत म्हणणारे विलासराव देशमुख तुमच्याच पक्षाचे होते ना? त्याबाबत तुमचा संताप कधी व्यक्त झाल्याचे ऐकिवात नाही, चव्हाणसाहेब! का? ती लोकांची फसवणूकही नव्हती अन् फेकाफेकी तर मुळीच नव्हती, असा दृढ विश्‍वास झालाय् तुमचा? सत्तेची दालनं, खुर्च्या, लाल दिव्याच्या गाड्या गेल्यापासून बरेच बावचळल्यासारखे वागताहेत कॉंग्रेसचे लोक. बेतालही आणि बेलगामही… खरं तर सत्तेतल्या तुमच्या सहा दशकांशी तुलना करावी इतकी कामं गेल्या तीन वर्षांत मार्गी लागली आहेत. त्याबाबत कौतुकाचे चार शब्द तुमच्या तोंडून निघण्याची शक्यता, तर जणू राजकारणातला अनपेक्षित चमत्कार ठरेल. अहो, गेल्या सात दशकांत कायम सत्ता हाताशी राहिली, सार्‍या सुविधा पायाशी लोळण घेत राहिल्या, निर्णय घेण्याचे अधिकार ताब्यात होते, तरीही या राज्याचा विकास करू शकला नाहीत तुम्ही. त्याची थोडीशी खंत बाळगायचे सोडून, लोक या सरकारला कंटाळल्याची खोटी बतावणी करत निघालात? अरे, ते तर तुमच्या कारभाराला कंटाळले होते. म्हणूनच इथून तिथून सगळीकडून तुम्हाला हद्दपार करताहेत लोक आता. ग्राम पंचायतीपासून तर राज्य सरकारपर्यंत, सर्वदूर भाजपाचे सत्तेत येणे हा काय लोक त्यांना कंटाळल्याचा परिणाम आहे? तुम्हाला तर निवडणुकी जवळ आल्याशिवाय त्या परिसरात जाण्याचीही फुरसत होत नाही हो साहेब! अन् आता निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही शब्द देताहात त्या मिरा भाईंदरच्या विकासाचा? मग इतकी वर्षे तिथला विकास खुंटला त्याला कोण होतं जबाबदार? नरेंद्र मोदी की देवेन्द्र फडणवीस?
तुम्हीच कशाला, सत्ता गमावलेल्या तमाम जनांना आता अचानक तरतरी आली आहे. पुढची अजून कित्येक वर्षे ही सत्तासुंदरी ताब्यात येण्याची शक्यता नसल्याच्या वास्तवाने बेचैन झाला आहात तुम्ही सारे. मग फेकू म्हणून टर उडविण्याचा प्रकार काय किंवा भ्रष्टाचाराचे पालुपद आळवण्याचा डाव काय, असले निलाजरे प्रकार करून दिवस काढणे सुरू आहे तुमचे. त्यातही आदर्श घोटाळ्यात अडकलेले तुमच्यासारखे नेते जेव्हा इतरांवर भ्रष्टाचाराचा आरोप करता ना, तेव्हा तर हसावं का रडावं तेच कळत नाही बघा! अजून सिद्ध झालेला नसतानाही, पदाच्या वापराचा नुसता आरोप झालेल्या माणसाला मंत्रिमंडळापासून दूर ठेवायला लागणारी ताकद कधीतरी सिद्ध करता आलीय् तुम्हाला? अन् तुमच्या पक्षालाही? कलमाडींसारख्या भ्रष्ट नेत्यांची फौज बाळगणारा पक्ष तुमचा. अरे तुमची तर रीतही ए. राजा, लालू प्रसाद यादवांसारख्या भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घालण्याची राहिली आहे. तरीही तुम्ही सांगणार, सध्याचे सरकार खाबुगिरी करतेय् म्हणून? अशोकराव, खरंच कीवच केली पाहिजे बुवा तुमच्या विनोदबुद्धीची!
या देशातल्या लोकांना कवडीची अक्कल नसल्याचा गैरसमज करून घेत सत्ता गाजवत राहिलात आजवर. पण लक्षात ठेवा, आता लोक समजदार झाले आहेत. निवडणुकीच्या काळातली तुमची नौटंकी लागलीच ध्यानात येते आता जनतेच्या. म्हणूनच इतके नक्राश्रू ढाळले तरी मतं पदरात पडत नाहीत अन् सत्ताही हाती गवसत नाहीय् तुमच्या. त्यामुळे होणारा त्रागा मग अशा विनोदबुद्धीतून, कीव करावा इतक्या खालच्या पातळीवरून व्यक्त होतो! खरं ना? पण एक सांगू साहेब! सराव करून घ्या आता. कारण भविष्यात हीच वेळ येणार आहे तुमच्यावर…!
आपला,
एक सामान्य नागरिक.

Friday, August 11, 2017

आओ चिनीयों मैदानमें…

 त्या वेळी डॉ. राजेन्द्र प्रसादांच्या पुढाकारातून राष्ट्रसंतांनी घडवला, नेमक्या त्याच चमत्काराची गरज पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. चिनी वस्तूंवरील बहिष्कार हा कुण्या एका संघटनेचा अजेंडा नाही, ती संपूर्ण भारत देशाची गरज आहे. बळकावण्यासाठी त्यांनी निवडलेल्या स्थानांची नावं काहीशी बदलली आणि म्हणूनच त्यायोगे येणारे काही संदर्भ तेवढे बदलले, बाकी भारताविरुद्धचे त्यांच मनसुबे काल होते तेवढेच आजही तिरकस अन् तितकेच निलाजरे आहेत. युद्धजन्य स्थिती तेव्हाही होती, आजही आहे. ते कालही भारताविरुद्ध दंड थोपटून उभे ठाकले होते अन् आजही त्यांना या देशाविरुद्ध लढण्याची खुमखुमी आहे. अशा वेळी, ‘‘आओ चिनीयों मैदानमें, देख हिंद का हाथ,’’ हे राष्ट्रसंतांचे धारदार शब्दही मैदानावरील लढाई प्रत्यक्षात लढणार्‍या आपल्या सैनिकांना जर युद्ध लढण्याची प्रेरणा देत असतील, तर मग त्याच चीनविरुद्ध सारा भारत देश आपल्या पाठीशी उभा असल्याचे वास्तव काय थरार निर्माण करू शकेल? कल्पनाही करवणार नाही, इतका जबरदस्त परिणाम साधण्याची ताकद त्या एकोप्यात आहे. चीन बलवान आहेच. कदाचित आमच्यापेक्षा काकणभर जास्तच. म्हणूनच त्याची मुजोरी दिवसागणिक वाढते आहे. त्याला केवळ स्वत:लाच भारतीय भूप्रदेशावर कब्जा करायचा नाहीय्, तर पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय भूभागाबाबतही त्याची भूमिका भारताच्या विरोधातलीच आहे. या पार्श्‍वभूमीवर,

‘‘उठो अब हिंद के पुत्रो, पुकारे सोच भारतकी
 करो सब संघटन अपना, मचाओ ना ये मत – मत की…’’
हे राष्ट्रसंतांचे आवाहन अगदीच अस्थानी असल्याचे कोण म्हणेल? आणि
 ‘‘गुलामी फिरसे ना आए हमारे प्रिय भारतमेंलगेगा मुंहको काला, खबर सब सोचलो गत की…’’
हा त्यांचा इशाराही आज संदर्भहीन ठरला असल्याचा दावा कुणाला करता येईल इथे?

‘‘लढ जायेंगे, बढ जायेंगे, हम हिम्मतके साथ, 
मजाल क्या है शत्रूकी, धरे हमारा हाथ, 
आओ चिनीयों मैदानमें, देख हिंद का हाथ…’’
बासष्टच्या युद्धात, समोर पराभव दिसत असतानाही कर्तव्यभावनेने लढत राहिलेल्या भारतीय सैन्याचे खचू लागलेले मनोबल सावरण्यात ज्या प्रेरणादायी गीतानं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, त्याच्या निर्मितीची कहाणीही तेवढीच रोचक आहे. केवळ सैनिकांचीच नव्हे, तर सीमेवरील गावांत राहणार्‍या नागरिकांची उडालेली दाणादाणही मन विषण्ण करणारी होती. कारभार सांभाळणार्‍या सत्ताधार्‍यांपासून तर रणांगणात लढणार्‍या सैनिकांपर्यंत, सारेच पराभूत मानसिकतेने ग्रस्त होते. अशा वेळी राष्ट्रपतींनी राष्ट्रसंतांना बोलावून घेतले. परिस्थिती आणि परास्त मनं सावरून धरण्याची गरज विशद केली. त्या स्थितीत राष्ट्रसंतांच्या वाणीतून स्फुरलेल्या शब्दांचा मग मंत्र झाला! त्यांनी रचलेली गीतं ओठांवर आली तरी शत्रूंशी लढण्याची प्रेरणा मिळायची. तुकडोजी महाराजांनी त्या काळात ठिकठिकाणी फिरून चीनविरुद्ध केलेला जागर बघितला तर लक्षात येईल की, त्या देशाबाबत स्थिती अजूनही तीच आहे. धमक्या देण्याची त्यांची रीतही तीच अन् गोड बोलून धोका देण्याची तिरपी चालही तीच. भारतीय सीमेत घुसखोरी करून छोट्याछोट्या जागा बळकावयाच्या, तिथे तळ ठोकून उभे राहायचे. स्वत:च्या नकाशात भारताच्या जमिनीचा समावेश करून जगाच्या डोळ्यांत धूळ फेकायची अन् लक्षात आणून दिलं की, ‘चुकलंच बेटं’ म्हणत, चूक सुधारण्याचं जाहीर आश्‍वासन द्यायचं. ते पाळायचं मात्र जाणीवपूर्वक टाळायचं…
वर्षानुवर्षे हेच चाललं आहे. कधी त्यांनी ईशान्य भारताच्या सीमेतला छत्तीस हजार चौरस फुटाचा भाग ‘चुकीनं’ स्वत:च्या नकाशात दाखवला, तर कधी १९५६ मध्ये मान्य केलेल्या मॅकमहोन रेषेची पुढच्या चारच वर्षांत स्वत:च ऐसीतैसी केली! ५० हजार चौरस मैल जागेवर केलेला चिनी दावा कसा फोल आहे, हे सिद्ध करण्याचा भारताचा खटाटोप अजून सुरूच होता, पण बासष्टमध्ये कधी गलवानच्या खोर्‍याकडून, तर कधी लद्दाखकडून, चिनी चढाई सुरू झाली. अतिक्रमण करून बळकावलेल्या जमिनीचा तुकडा सरळ सरळ हाती येत नाही हे बघून लढाईचा मार्ग त्यांनी स्वीकारला होता. वाटाघाटीसाठी आपला प्रतिनिधी चीनमध्ये पाठविण्याच्या, पंडित नेहरूंच्या घोषणेचे तसेच तीनतेरा वाजले होते…
अस्मितेला आव्हान देत भारताला डिवचण्याची त्यांची पद्धत आजही किंचितशीही बदललेली नाही. तेव्हा लद्दाख होता, आता डोकलामचा परिसर आहे, एवढाच काय तो फरक. दुसरीकडे, आपली ताकद आणि मर्यादांचे भान जपतानाही चीनविरुद्ध प्राणपणाने लढण्याच्या इराद्यात तसूभरही मागे न राहिलेले सैनिक आणि त्यांच्या पाठीशी आपले मनोबल उभे करण्यात जराही कुचराई न करणारे भारतीय नागरिक… गेल्या काही दिवसांत चिनी मालावर बहिष्कार घालून आर्थिक आघाडीवर त्या देशाच्या नाड्या आवळण्याच्या दृष्टीने चाललेला लोकजागर आणि त्या काळात राष्ट्रसंतांनी भजनांच्या माध्यमातून चीनविरुद्ध रान पेटविण्याचा केलेला प्रयत्न, दोहोंचाही संदर्भ एकाच दिशेनं प्रवास करणारा आहे.
भारतीय नागरिकांचे मनोबल उंचावणारी आणि त्यांच्यात शत्रूंविरुद्ध उभे ठाकण्याची जिद्द निर्माण करणारी, अंगावर शहारे आणणारी भजनं गाऊन तुकडोजी महाराजांनी त्या वेळी गावागावांतून लोकजागृती केली. हे खरंच आहे की, सारीच कामं सरकार करू शकत नाही अन् शासकीय पातळीवरून सारे प्रश्‍न सुटतातच असेही नाही. लोकसहभागातून घडू शकणार्‍या चमत्काराला पर्याय तो नाहीच कशाचा. जो त्या वेळी डॉ. राजेन्द्र प्रसादांच्या पुढाकारातून राष्ट्रसंतांनी घडवला, नेमक्या त्याच चमत्काराची गरज पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. चिनी वस्तूंवरील बहिष्कार हा कुण्या एका संघटनेचा अजेंडा नाही, ती संपूर्ण भारत देशाची गरज आहे. बळकावण्यासाठी त्यांनी निवडलेल्या स्थानांची नावं काहीशी बदलली आणि म्हणूनच त्यायोगे येणारे काही संदर्भ तेवढे बदलले, बाकी भारताविरुद्धचे त्यांच्या मनातले मनसुबे काल होते तेवढेच आजही तिरकस अन् तितकेच निलाजरे आहेत. युद्धजन्य स्थिती तेव्हाही होती, आजही आहे. ते कालही भारताविरुद्ध दंड थोपटून उभे ठाकले होते अन् आजही त्यांना या देशाविरुद्ध लढण्याची खुमखुमी आहे. अशा वेळी, ‘‘आओ चिनीयों मैदानमें, देख हिंद का हाथ,’’ हे राष्ट्रसंतांचे धारदार शब्दही मैदानावरील लढाई प्रत्यक्षात लढणार्‍या आपल्या सैनिकांना जर युद्ध लढण्याची प्रेरणा देत असतील, तर मग त्याच चीनविरुद्ध सारा भारत देश आपल्या पाठीशी उभा असल्याचे वास्तव काय थरार निर्माण करू शकेल? कल्पनाही करवणार नाही, इतका जबरदस्त परिणाम साधण्याची ताकद त्या एकोप्यात आहे. चीन बलवान आहेच. कदाचित आमच्यापेक्षा काकणभर जास्तच. म्हणूनच त्याची मुजोरी दिवसागणिक वाढते आहे. त्याला केवळ स्वत:लाच भारतीय भूप्रदेशावर कब्जा करायचा नाहीय्, तर पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय भूभागाबाबतही त्याची भूमिका भारताच्या विरोधातलीच आहे. या पार्श्‍वभूमीवर,
‘‘उठो अब हिंद के पुत्रो, पुकारे सोच भारतकी
करो सब संघटन अपना, मचाओ ना ये मत – मत की…’’
हे राष्ट्रसंतांचे आवाहन अगदीच अस्थानी असल्याचे कोण म्हणेल? आणि
‘‘गुलामी फिरसे ना आए हमारे प्रिय भारतमें
लगेगा मुंहको काला, खबर सब सोचलो गत की…’’
हा त्यांचा इशाराही आज संदर्भहीन ठरला असल्याचा दावा कुणाला करता येईल इथे?
चिनी प्रजासत्ताक अस्तित्वात आल्यापासून भारत अतिशय खंबीरपणे त्याच्या बाजूने उभा राहिला. नेहरूंच्या मनात तर कम्युनिस्टांविषयी कायम प्रेमाचे भरते असल्याने, रशिया अन् चीन तर त्यांनी पोसूनच ठेवले होते उराशी. पण, नंतरच्या काळात भारताने चीनला मागे टाकून साधलेला विकास खरंतर नेत्रदीपक ठरला होता. नेमके काय, कसे अन् का घडले कुणास ठाऊक, पण इंदिरा अन् राजीव गांधींच्या काळात भारताला कितीतरी अंतराने मागे टाकून चीन आश्‍चर्यकारक वेगाने पुढे निघून गेला. आणि तोच आता आपल्याला वाकुल्या दाखवत आपल्याचविरुद्ध कुरघोड्या करतोय्!
जवळपास साडेपाच दशकांचा कालावधी मागे पडेल आता चीनने लादलेल्या ‘त्या’ युद्धानंतरचा! तीच परिपाठी अजूनही कायम आहे. त्यांची तीच मुजोरी, त्याच धमक्या… अन् आमचे तेच धोरण. त्यावेळच्या ‘श्री गुरुदेव’चा चिनी निषेध अंक असेल किंवा मग राष्ट्र संरक्षण विशेषांक, यातून राष्ट्रसंतांनी आरंभलेल्या जनजागृतीच्या मोहिमेची गरज संपल्याचे चित्र अजूनही कुठेही नाही. ‘‘ सारा भारत रहे सिपाही शत्रूओंको दहशाने…’’ या त्यांच्या म्हणण्यातील तथ्य अद्याप मिथ्या ठरलेले नाही. उलट तीच काळाची गरज ठरते आहे. दुर्दैव फक्त एवढेच आहे की, काळाची ही गरज ओळखण्यापेक्षा चिनी मालावरील बहिष्काराचे आवाहन पायदळी तुडवण्याच्या राजकारणात रमली आहे काही मंडळी. या कुरघोड्यांमागील गांभीर्य लक्षात येईल, डोकलाममधील त्यांच्या माघारीतील भारताच्या लक्षणीय विजयाचे महत्त्व जेव्हा कळेल, तेव्हाच राष्ट्रसंतांच्या मनातील तळमळ समजेल आपल्याला अन् आपल्या हद्दीत घुसलेल्यांना हुसकावून लावण्याची गरजही ध्यानात येईल सर्वांच्या. राष्ट्रसंतांच्याच शब्दात सांगायचं झालं तर-
‘‘जागा है भारत मेरा, शत्रूपर देने पहरा
किसकी ताकद है लडने की, हक छिनने आये हमरा
विश्‍व हमारा साथ करे, शत्रू यही अब घात करे
भाई-भाई नारे कहके, अब धोके की बात करे
नीती जिनकी गंदी है, आखे जिनकी अंधी है
वह क्या जितेंगे भारतको, प्रभू हमारे साथी हैं…’’

Friday, August 4, 2017

समस्या व्हीआयपीच हव्यात, बरं का!

मुंबईतल्या मनोरा आमदार निवासातल्या एका खोलीतल्या छताची मोडतोड संबंधित आमदारांनी परवा ज्या पोटतिडिकेनं विधानसभेत मांडली, ती बघून कोणीतरी म्हणालं, यात काय एवढं. सरकारनं दिलेल्या आमच्या घरात येऊन बघा जरा पावसाळ्यात छत कुठनं कुठनं गळतं शोधून दाखवा अन् बक्षीस मिळवा, अशी योजना जाहीर करावी अशी अवस्था. इथे आयुष्यालाच भेगा पडताहेत जागोजागी तिथे भिंतींना गेलेल्या तडा मोजणार तरी कोण हो? रस्त्यांवरच्या खड्‌ड्यांनी बेजार होण्याची वेळ आली आम जनतेवर, पण विधानसभेत बोलतो कोण त्याबाबत? आणि आमदारांच्या खोलीत जराशी गैरसोय झाली तर केवढा गहजब, केवढा अकांडतांडव, केवढी आरडाओरड, केवढी त्याची दखल अन् केवढी त्याची चर्चा? भाग्य असावे तर असे! आमदारांच्या समस्येसारखे! नाही तर इथल्या सामान्यजनांच्या समस्या! अरे हट्. त्यांना काय समस्या म्हणायचे? कुत्रंही विचारत नाही त्यांना तर! पण साहेबांना उद्भवलेली समस्या बघा! डायरेक्ट विधानसभेतच चर्चा त्याची. मग? गंमत आहे का? आमदार निवासातल्या त्या खोलीतल्या छताच्या नुकसानीसाठी कुणी अधिकारी निलंबित झाल्याची बातमी अद्यापतरी बाहेर आलेली नाही. नाहीतर साहेबांचं दुखणं पहिले तर त्यांच्यावरच निघते. एखादातरी अधिकारी आधी सस्पेंड होतो. मग शांतता लाभते सर्वांना. समस्या नाही सुटली तरी चालते, पण अधिकार्‍यांवर कारवाई होणं महत्त्वाचं… म्हणजे, तशी तर्‍हा असते हो सरकारी कारभाराची! फक्त सर्वसामान्य लोकांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करणार्‍यांवरच काही कारवाई होत नाही इथे.

आमदारांसाठीची निवास व्यवस्था कशी पॉशच हवी. मग काय तर! लोकप्रतिनिधी म्हटल्यावर त्यांच्यासाठीच्या व्यवस्थेचा दर्जा सुमार असून कसं चालेल? निवास राजेशाही थाटातला अन् भोजन कसे साग्रसंगीत हवे. त्याचा दर्जाही कसा उच्चप्रतीचा हवा. साहेब खोलीतून निघाले की वर्दी देणारी जमात लगबगीनं अग्रेसर व्हावी. वर्दी मिळाली की सेवेकर्‍यांनी कुर्निसात करायला सज्ज व्हावे. केवळ साहेबांनाच नाही, तर त्यांच्या लवाजम्यातल्या प्रत्येकाला मानाची तीच वागणूक अन् पंगतीचा तोच मान मिळावा. कारण तो तर जन्मसिद्ध अधिकारच आहे ना त्यांचा. त्यात कसूर चालायचा नाही म्हणजे नाहीच! मग जेवणातले मीठ असो की नाश्त्यातला रस्सा, तडजोड ना त्याच्या चवीबाबत, ना त्याच्या दर्जाबाबत! अरे, चव कोण घेतोय् त्याची? दस्तुरखुद्द आमदारसाहेब! मग त्याचा काही विचार कराल की नाही? तिकडे मुंबईतल्या इमारतीच्या इमारती कोसळताहेत, पावसाच्या चार सरी बरसताच. पाच-पन्नास लोकांचे प्राण गेले. ते ठीक हो! पण, म्हणून काय आमदार निवासातल्या खोलीचे, जिथे खुद्द साहेब राहतात, त्या खोलीचे छत कोसळावे? छे! छे! मान्यच होणे नाही हा प्रमाद! त्यावरून बघा किती संतापलेत साहेब! म्हणाले, आमदार निवासाच्याच खोल्या ‘अशा’ असतील तर मी सुरक्षित राहणार तरी कसा? आमदार म्हणून, सरकारी खर्चातून लाभलेल्या खोलीतल्या जराशा पडझडीने निर्माण झालेल्या कमालीच्या असुरक्षिततेच्या भावनेने पुरते कासावीस झाले ते. इथेच झोपतो म्हणाले, विधानसभेत! एरवी विधिमंडळात भाषणांदरम्यान, अनेक लोकप्रतिनिधी झोपा काढतात, हे ऐकून ठाऊक होते. त्या राहुल गांधींचा तर चक्क लोकसभेतल्या बेंचवर डोकं ठेवून झोपलेल्या अवस्थेतला फोटो बघितल्यावर, असंही काही घडत असेल, यावर विश्‍वास ठेवण्यावाचून पर्याय उरला नव्हता. पण, हे साहेब तर चक्क गादी टाकून द्या म्हणताहेत विधानसभेत झोपायला. आमदार निवासातल्या खोल्या सुरक्षित राहिल्या नसल्यानं केवढा त्रागा झाला त्यांचा. छे! काहीतरीच! किती असुरक्षित आहेत पुरोगामी महाराष्ट्रातले लोकप्रतिनिधी? महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून मुंबईत जाऊन अधिवेशनं अटेंड करायची. लोकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी जिवाचा आटापिटा करायचा अन् दिवसभराच्या कामांनी थकूनभागून रात्री जरासा आराम करायला म्हणून खोलीत शिरावं तर हे असं? चक्क छताशी दोन हात करण्याची वेळ यावी? नाही. नाहीच जमणार हे असलं काही! सरकारी झालं म्हणून काय निवासाची अशी अव्यवस्था सहन करायची? तीही आमदारांनी? नाहीच जमणार! अहो, हे मान्य करायला ते काय सर्वसामान्य नागरिक आहेत? या देशात सामान्य नागरिक सोडून इतर सारे लोक व्हीआयपी, व्हीव्हीआयपी सदरात मोडतात. त्यांना कायम वेगळी, दर्जेदार वागणूक लागते, याचे साधे भान राखता येत नाही इथल्या प्रशासनाला? याद राखा. यात जराही कसूर झाली तर खबरदार! मुळीच खपवून घेतली जाणार नाही असला गलथान कारभार. अरे, आमदार म्हणजे काय कोणी ऐरेगैरे असतात? एक, दोन नव्हे, तब्बल तीन लक्ष लोकांचे प्रतिनिधी. केवढी कामं करतात ते! किती लोक भेटतात त्यांना दिवसभरात. विधिमंडळात किती म्हणून किती विषय मांडावे लागतात त्यांना. कितीवेळ सभागृहात असतात ते (हा प्रश्‍न नसून, लोकप्रतिनिधीचं कौतुक करणारे ते विधान असल्याचे सामान्यजनांनी गृहीत धरावे!) तरी ते मीडियावाले कायम सभागृहातल्या रिकाम्या अन् बाहेरच्या कॅण्टीनमधल्या भरलेल्या खुर्च्यांवरच कायम लक्ष का वेधतात, देव जाणे! तर सांगायचा मुद्दा असा की, एवढ्या प्रचंड मेहनतीनंतर सर्वोत्कृष्ट दर्जाचे भोजन मिळणे हा लोकप्रतिनिधींचा अधिकार आहे. असावा की नाही? त्यांना कर्मचार्‍यांकडून उत्कृष्ट दर्जाची सेवा मिळायला हवी का नको? कोणी द्यायची ती सेवा? मुंबईतील आकाशवाणी घ्या की विस्तारित आमदार निवासाचे उदाहरण घ्या. काय अवस्था आहे बघा. छे! छे! सामान्य जनतेचं ठीक हो, ते तर राहतातच सार्‍या अव्यवस्था गुमान सहन करून अन् नाक मुठीत धरून तिथे. पण, आमदारांनी राहायचं असल्या गलिच्छ ठिकाणी?
एक मात्र बरं असतं साहेबांचं. त्यांच्या सेवेत जराही कसूर झालेली खपत नाही त्यांना. तसं घडलंच कधी, तर त्याबाबत थेट विधिमंडळात गार्‍हाणी मांडता येतात त्यांना. लागलीच प्रशासनिक यंत्रणा खडबडून जागी होते. अधिकारीवर्ग सज्ज होतो, त्यांच्या तक्रारीची दखल घ्यायला. नाही तर, सामान्य माणसानं केलेल्या तक्रारींची दखल घेतो कोण इथे? इमारती कोसळल्या काय नि खानावळीतल्या जेवणाचा दर्जा सुमार असला काय, फरक काय पडतो? ते लोक मेले काय नि जगले काय. कोणाच्या बाचं काय जाते इथे? पण साहेबांची कशी, गोष्टच वेगळी! त्यांची गणना अशी सामान्यजनांत करताच येणार नाही बघा! त्यामुळे सामान्यांना मिळणार्‍या(?) सोयींशी, त्यांना उपलब्ध होणार्‍या(?) भोजनाच्या सुमार दर्जाशी, त्यांच्यासाठी असलेल्या(?) किरकोळ सुविधा साहेबांच्या गरजांशी कशा मेळ खाणार? नाही. नाहीच खाणार! मुळात आमदार साहेबांची तुलना अशी सर्वसामान्य माणसाशी करणेच गैर असल्याचे ठाम मत आम्हा बापुड्यांचे आहे.
मुंबईतल्या मनोरा आमदार निवासातल्या एका खोलीतल्या छताची मोडतोड संबंधित आमदारांनी परवा ज्या पोटतिडिकेनं विधानसभेत मांडली, ती बघून कोणीतरी म्हणालं, यात काय एवढं. सरकारनं दिलेल्या आमच्या घरात येऊन बघा जरा पावसाळ्यात छत कुठनं कुठनं गळतं शोधून दाखवा अन् बक्षीस मिळवा, अशी योजना जाहीर करावी अशी अवस्था. इथे आयुष्यालाच भेगा पडताहेत जागोजागी तिथे भिंतींना गेलेल्या तडा मोजणार तरी कोण हो? रस्त्यांवरच्या खड्‌ड्यांनी बेजार होण्याची वेळ आली आम जनतेवर, पण विधानसभेत बोलतो कोण त्याबाबत? आणि आमदारांच्या खोलीत जराशी गैरसोय झाली तर केवढा गहजब, केवढा अकांडतांडव, केवढी आरडाओरड, केवढी त्याची दखल अन् केवढी त्याची चर्चा? भाग्य असावे तर असे! आमदारांच्या समस्येसारखे! नाही तर इथल्या सामान्यजनांच्या समस्या! अरे हट्. त्यांना काय समस्या म्हणायचे? कुत्रंही विचारत नाही त्यांना तर! पण साहेबांना उद्भवलेली समस्या बघा! डायरेक्ट विधानसभेतच चर्चा त्याची. मग? गंमत आहे का? आमदार निवासातल्या त्या खोलीतल्या छताच्या नुकसानीसाठी कुणी अधिकारी निलंबित झाल्याची बातमी अद्यापतरी बाहेर आलेली नाही. नाहीतर साहेबांचं दुखणं पहिले तर त्यांच्यावरच निघते. एखादातरी अधिकारी आधी सस्पेंड होतो. मग शांतता लाभते सर्वांना. समस्या नाही सुटली तरी चालते, पण अधिकार्‍यांवर कारवाई होणं महत्त्वाचं… म्हणजे, तशी तर्‍हा असते हो सरकारी कारभाराची! फक्त सर्वसामान्य लोकांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करणार्‍यांवरच काही कारवाई होत नाही इथे.   पण आम्ही म्हणतो, एवढं काय हो कौतुक त्या खोलीतलं छत कोसळण्याचं. नागपुरातल्या आमदार निवासाची अवस्था बघा जरा. तरी बरं दर अधिवेशनात रंगरंगोटी होते अन् दरच अधिवेशनात क्रॉकरी नवीन येते. पण, अधिवेशनाचे पंधरा दिवस मागे पडत नाही तोच अवकळा आल्यागत अवस्था होते, या आमदार निवासाची. कारण अधिवेशन संपल्यावर ना आमदार इकडे फिरकत ना कुणी अधिकारी ढुंकून पाहात तिकडे. मग काय, सामान्यजनांची गर्दी. त्यांना कशाला हव्यात पलंगांवर गाद्या? त्या गाद्यांवर पांढर्‍या शुभ्र चादरी? पांढर्‍याशुभ्र चादरी आमदार साहेबांसाठी. फारतर त्यांच्या चेल्याचपाट्यांसाठी. इतरांसाठी थोडीच असतात त्या. मग त्यांच्या वाट्याला येतात घाणेरड्या, वास लागलेल्या गाद्या. डोक्याखाली घ्याव्याशाही वाटणार नाही अशा उशा अन् अंगावर घ्यावेसे वाटू नये असले दमट वासाचे ब्लँकेट्‌स. पण कधी चर्चा होते, या दुरवस्थेची? नाही. कारण ही अवस्था वाट्याला येते सामान्यजनांच्या. साहेबांच्या नाही. जे साहेबांच्या वाट्याला येत नाही त्याची चर्चाही का म्हणून व्हावी? सोडवायला समस्याही व्हीआयपीच हव्यात ना!