राज्य तुमचे, राज्यातली सत्ता तुमची, लाल दिव्यांच्या गाड्या तुम्ही मिरवणार, सत्तेतले सवंगडी तुमचे, त्यांच्यावरची मेहरनजर तुमची, राग-लोभ तुमचा, सत्तेतल्या लाभाचे वाटेकरी तुम्ही, त्यांना घालायच्या वेसणाच्या दोर्याही तुमच्याच हाती, धोरणं तुमची, ती राबवणारे प्रशासन तुमचे, फाईली अडवणारे लोक तुमचे, जनतेला दूर लोटणारे, कंत्राटदारांना जवळ करणारे लोकही तुमचेच. ....तरीही या राज्यातली परिस्थिती बदलण्याचा निर्धार व्यक्त लाजीरवाणी असल्याची कबुली जाणत्या राजाने जाहीरपणे द्यावी, ही खरोखरीच लाज वाटावी अशीच बाब आहे पवार साहेब!
टेबलावर फाईलींचा ढीग साचवण्याचा विक्रम कदाचित चव्हाणांच्या नावे गिनीज बुकात नोंदवला जाईल येत्या काळात! पण तुम्हाला कुठल्या फाईलींविषयी बोलायचे होते, शरदराव! जनहिताच्या फाईल्ससाठी तुम्ही असे जाहीरपणे भांडण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. त्याची खात्री आहे जनतेला. मग तरीही कसे बरे रागावलात तुम्ही.. कुठल्या बरे असणार त्या फाईली. बोला ना शरदराव! असे गप्प नका राहू. बोला, बोला! बिल्डरांच्या? जमिनीच्या? लवासाच्या? साखर कारखानदारांच्या? आयपीएलच्या तुम्ही बुडवलेल्या कोट्यवधी रुपयांच्या करमणूक कराच्या, तुमच्या अखत्यारीतल्या सहकारी बँकांना मदत देण्याच्या, पुणे-बारामतीतल्या रखडलेल्या कामांच्या, दादांच्या, सुप्रियाताईंच्या, जावईबापूंच्या.... तुमच्या ‘स्वारस्याचे’ विषय तर एवढेच आहेत. त्याही फाईली मुख्यमंत्री अडवून धरतात, म्हणूनच खवळलात ना तुम्ही चव्हाणांवर?
‘‘या राज्यातल्या वाढत्या कुपोषणाची स्थिती अतिशय गंभीर आहे. मला त्याची खरंच
लाज वाटते’’.
इति शरद पवार.
व्वा. व्वा. मानलं पाहिजे पवारांना. कुपोषणाची एवढी गांभिर्यानं दखल घेणारा
नेता या देशाला पहिल्यांदाच गवसला आहे. कौतुकच व्हायलाच हवं. हा जाणता राजा
गोरगरिबांच्या नशिबी आलेल्या कुपोषणानं असा व्याकुळ होतो. मनातल्या वेदना व्यक्त
केल्यावाचून त्याला राहावत नाही. एवढा
कनवाळू नेता लाभायला भाग्य लागतं.
महाराष्ट्रातील तमाम जनता भाग्यवान असल्याचं यानिमित्तानं स्पष्ट झालं आहे.
पण पवार साहेब,
आपल्याला या राज्यातल्या, देशातल्या आणखी कोणकोणत्या गोष्टींची लाज वाटते, हे ही जाहीर करून टाका एकदा! सुमारे पाच दशकंराजकारणात, त्यातली निदान चार दशकं या ना त्या स्वरूपात सत्तेत
घालवल्यानंतरही या राज्यातली परिस्थिती पवारांना लाजीरवाणी वाटत असेल, तर त्यांच्या नेतृत्त्वाची लाज वाटून घेण्याची वेळ जनतेवरही
आली आहे,
हे कधी कळेल या ‘जाणत्या’
राजाला.
पोटात एक,
ओठांवर दुसरेच, बोलायचे एक करायचे दुसरेच. ऍण्टीचेंबरमधल्या चर्चेत एक अन् जाहीर सभेत
दुसरंच.... बस्स झाली आता ही तर्हा. वीट आलाय लोकांना या घाणेरडया राजकारणाचा.
यातून आपला बेरकीपणा सिद्ध होत असल्याचा गैरसमज पवारांनी आणि त्यांच्या समर्थकांनी
जरूर करून घ्यावा. पण त्यांच्या वागण्या, बोलण्यातून सतत डोकावणारी लबाडी अन् कोडगेपणही आता लोकांना कळू लागले आहे, हे कधी तर ध्यानात यायला हवे यांच्या!
अन्न सुरक्षा कायदा अस्तित्वात आला, तर फुकटचं धान्य घरात आल्यानं लोक आळशी होतील अशी भीती जाहीरपणे व्यक्त करणार्या
पवारांनी संसदेतल्या या विषयावरच्या चर्चेत एका शब्दाने त्या कायद्याला विरोध करू
नये?
जनतेसमोर त्यांनी जी भीती व्यक्त करत प्रसिद्धी मिळवली, तीच भीती लोकसभेत व्यक्त करताना जीभ का अडखळली पवारांची? तिथे त्यांनी या कायद्याला विरोध का नाही केला? कुणाच्या भीतीने पाय डळमळले त्यांचे? एव्हाना बहुमताच्या जोरावर हा कायदा पारित झाला आहे. आता
पवारांची भीती खरी ठरली,
स्वस्तातले अन्न, धान्य सहजपणे मिळू लागल्यामुळे लोक खरोखरीच आळशी बनले तर? शिवाय, बाहेर एवढ्या
जोरजोरात बोलणार्या पवारांनी संसदेत
बाळगलेल्या मौनाचा अर्थ काय काढायचा आम्हा बापुड्यांनी?
तसं बघायला गेलं,
तर पवारांना लाज वाटावी अशा कित्येक बाबी इथं वर्षानुवर्षे
घडताहेत. कांद्याच्या किंमती वर्षभरातल्या एका विशिष्ट कालावधीतच कशा वाढतात, त्यातून नेमका कोणाचा लाभ होतो, त्या लाभाच्या गणितातले मोहरे, प्यादे अन् राजे कोण असतात, या षडयंत्राच्या लाभाचे भागीदार कोण असतात, पवार म्हणतात त्याप्रमाणे कांद्याच्या किंमती वाढल्या की शेतकर्यांना खरंच
लाभ होतो,
की काही बड्या व्यापारी आणि दलालांच्या फायद्यासाठी निर्माण
करण्यात आलेली ही कृत्रिम दरवाढ असते, तरीही शेतकर्यांच्या लाभाचा दावा करत पवार कांद्यांच्या दरवाढीला विरोध
करणार्यांना शेतकरीविरोधी ठरवतात, तेव्हा शेतकर्यांच्या आडून राजकारण नेमके कुणाचे सुरू आहे, याचे पितळ त्यांच्याही नकळत उघडे पडलेले असते.
कापसाच्या गाठींच्या निर्यातीवर नेमकी एका विशिष्ट कालावधीतच बंदी कशी लादली
जाते,
टेक्सटाईल इंडस्ट्रीमधील उद्योजकांनी स्वस्तातला कापूस विकत
घेऊन झाला की ही बंदी आपसूकच कशी उठवली जाते, पंधराच दिवसात उठवली जाते तर मग बंद मुळात लादलीच का जाते, कोणाच्या लाभासाठी? यातून कारखानदारांचा मोठा लाभ होत असला, त्यांना स्वस्तात कापूस मिळत असला तरी, निर्यातीतून चार पैसे अधिकचे मिळवण्याच्या शेतकर्यांच्या स्वप्नांवर वरवंटा
कुणी फिरवलेला असतो, यात उद्योजकांना मिळणार्या लाभाचे वाटेकरी कोणकोण असतात, बाहेर शेतकर्यांच्या हिताच्या गप्पा मारून आत त्यांच्या
जीवावर नेमके कोण उठलेले असते....अरेच्चा! किती लांबलचक यादी आहे बघा प्रश्नांची
ही?
या प्रश्नांच्या उत्तरादाखल समोर येणारी वस्तुस्थिती
कुणाकुणासाठी लाजीरवाणी ठरेल, पवार साहेब?
असल्या निर्णयांमधून शेतकर्यांचा विकास खुंटीवर टांगणारे लोकच स्वत:ला
त्यांचे कैवारी म्हणवून घेत मिरवतात, तेव्हा आडावर बांधलेला दोर गळ्यात लटकावून घेण्याची वेळ बळीराजावर येते.
त्याला न्याय द्यायचे सोडून सिंचन प्रकल्पांच्या कोट्यवधी रुपयांची लूट केली जाते, कित्येक वर्ष प्रकल्प पूर्ण होत नाहीत, गोसीखुर्द सारख्या प्रकल्पांत जमीन गेलेल्या शेतकर्यांना पंचेवीस पंचेवीस
वर्षे जमिनीचा साधा मोबदला मिळत नाही याचीही लाज कधीतरी, कुणाला तरी वाटली पाहिजे ना पवार साहेब! पश्चिम
महाराष्ट्रात नुसती पाण्याची टंचाई निर्माण झाली तर लागलीच १९७२च्या भीषण
दुष्काळाशी त्याची तुलना करून राज्याच्या आकस्मिक निधीतला पैसा तिकडे वळवला गेला.
अन् विदर्भातल्या अतिवृष्टिग्रस्तांना मदत द्यायची म्हटली तर नियमांवर बोट ठेवला
जातो. पाहणीसाठी केंद्राची तीन तीन पथकं धाडण्याचा निर्णय होतो. हा भेदभाव लज्जास्पद नाही का शरदराव!
परवा देशाची कृषीमंत्री विदर्भात आले.
पाहणी केली. मदतीबाबत घोषणा झाल्या. काय नवीन सांगितले त्यांनी? पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकर्यांना
सरकार मदतीचा म्हणे हात देणार. हे सांगायला शरद पवार दिल्लीहून वर्ध्यात कशाला
यायला लागतात?
ही तरतूद तर कायद्यातच आहे. ती मदत तर आज ना उद्या तशीही
मिळणारच आहे. पवारांनी घोषणा केली किंवा न केली तरी. त्यांची इच्छा असली किंवा
नसली तरी. मुळात प्रश्न आहे, तो पन्नास
टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेल्या शेतकर्यांचा. यंदा पावसाने विदर्भाला धो धो
धुतले. थांब थांब म्हणण्याइतका बरसला पाऊस! नको नको म्हणेपर्यंत काळ्या ढगांनी
पिच्छा पुरवला. शेतं खरडून गेली. वाहून गेली. पिकं हातून गेली. आता सर्वांनाच
मदतीची गरज आहे. पण कागदावरच्या नियमांनी
५१ टक्के नुकसान झालेला ‘भाग्यवान’ ठरला अन् ४९ टक्के
नुकसान झालेला शेतकरी मात्र, ‘कमनशिबी’ ठरला. गेल्या उन्हाळ्यातल्या पाणीटंचाईचे निमित्त पुढे करून
पश्चिम महाराष्ट्रात जनावरांसाठीच्या छावण्या आतापर्यंत भर पवासाळ्यातही सरकारी
तिजोरीतून छानपैकी चालल्या आहेत. कायद्याच्या कसोटीत बसवून! मग, या राज्यातले सारे कायदे विदर्भ, मराठवाडा,
खान्देश, कोकणाच्याच आड
का येतात पवार साहेब! कधीतरी याही
परिस्थितीची लाज वाटू द्या! इतक्या वर्षात हे चित्र आपण बदलू शकलो नाही, याची जराशी खंत वाटू द्या मनाला. राज्याचे नेतृत्त्व करताना, केंद्रात या राज्याचे प्रतिनिधीत्व करताना तुम्ही पश्चिम
महाराष्ट्राच्या पलीकडे कधी विचारच करू शकला नाही, याची पुरेपूर कल्पना ल ोकांना आहेच, त्याची जाणीव स्वत:लाही होऊ द्या कधीतरी!
परवा तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना धारेवर धरलं. रखडलेल्या
फाईलींवरून. टेबलावर फाईलींचा ढीग साचवण्याचा विक्रम कदाचित चव्हाणांच्या नावे
गिनीज बुकात नोंदवला जाईल येत्या काळात! पण तुम्हाला कुठल्या फाईलींविषयी बोलायचे
होते,
शरदराव! जनहिताच्या फाईल्ससाठी तुम्ही असे जाहीरपणे
भांडण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. त्याची खात्री आहे जनतेला. मग तरीही कसे बरे
रागावलात तुम्ही.. कुठल्या बरे असणार त्या फाईली. बोला ना शरदराव! असे गप्प नका
राहू. बोला,
बोला! बिल्डरांच्या? जमिनीच्या?
लवासाच्या? साखर
कारखानदारांच्या?
आयपीएलच्या तुम्ही बुडवलेल्या कोट्यवधी रुपयांच्या करमणूक
कराच्या,
तुमच्या अखत्यारीतल्या सहकारी बँकांना मदत देण्याच्या, पुणे-बारामतीतल्या रखडलेल्या कामांच्या, दादांच्या, सुप्रियाताईंच्या, जावईबापूंच्या.... तुमच्या ‘स्वारस्याचे’
विषय तर एवढेच आहेत. त्याही फाईली मुख्यमंत्री अडवून धरतात, म्हणूनच खवळलात ना तुम्ही चव्हाणांवर? दुखरी नस दबल्याशिवाय तुम्ही असे जाहीरपणे बोलणार नाहीत याची कल्पना आहे त्यांना.
शिवाय तुमचा एवढा ‘इंटरेस्ट’ आहे
म्हटल्यावर घेतीलच म्हणा,
चव्हाण साहेब आता त्या फाईलींची काळजी. पण खरं सांगू? तुमची ही लुटूपुटूची लढाई थांबवा जराशी. कळतात हो लोकांना आता त्यातली नाटकं. तुमचं
लोकांसमोर एक आणि आत दुसरंच असतं हे ही एव्हाना ठावूक झालं आहे सर्वांना.
राज्य तुमचे,
राज्यातली सत्ता
तुमची,
लाल दिव्यांच्या गाड्या तुम्ही मिरवणार, सत्तेतले सवंगडी तुमचे, त्यांच्यावरची मेहरनजर तुमची, राग-लोभ तुमचा, सत्तेतल्या लाभाचे वाटेकरी तुम्ही, त्यांना घालायच्या वेसणाच्या दोर्याही तुमच्याच हाती, धोरणं तुमची, ती राबवणारे प्रशासन तुमचे, फाईली अडवणारे
लोक तुमचे,
जनतेला दूर लोटणारे, कंत्राटदारांना जवळ करणारे लोकही तुमचेच. ....तरीही या राज्यातली परिस्थिती
बदलण्याचा निर्धार व्यक्त लाजीरवाणी असल्याची कबुली जाणत्या राजाने जाहीरपणे द्यावी, ही खरोखरीच लाज वाटावी अशीच बाब आहे पवार साहेब!
आता बघा ना,
तुम्ही दुखरी नस दाबताच कसे पोपटासारखे बोलत सुटलेत
मुख्यमंत्री. उलटलेत चक्क तुमच्यावर. म्हणाले, वादग्रस्त,
नियमबाह्य फाईलींना जरासा वेळ लागणारच. या नियमबाह्य फाईली
तुमच्या असण्याचा तर प्रश्नच नाही. खरे ना? मग कुणाच्या फाईलींबाबत तुम्हाला सांगताहेत ते? पंतप्रधान पदाच्या तुमच्या स्वप्नांमुळेच कॉंग्रेस फुटल्याचंही बोलून गेलेत
बघा ते. जाऊ द्या पवार साहेब तुम्ही नका मनावर घेऊ. अहो, पंतप्रधान कार्यालयातले एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफीसर ते.
त्यांना कुठले आले राजकारण कळायला? खुद्द इंदिराजींपासून कुणाकुणाच्या महत्त्वाकांक्षेपायी कॉंग्रेसमध्ये कधी कधी
फूट पडली,
हा इतिहास पाऽऽर विस्मरणात गेलाय् त्यांच्या. अगदी अलीकडची
तुम्ही घडवलेली फूट तेवढी स्मरणात राहिली आहे त्यांच्या. त्याचाच गाजावाजा करत
सुटलेत ते. पण जाऊद्या राजकारणाचा फारसा अनुभव नसलेल्या माणसाची बेताल बडबड राजकीय
चातुर्य लाभलेल्या तुमच्यासारख्या मुरलेल्या नेत्याने मनावर घ्यायची मुळीच गरज
नाही. पंतप्रधानपदाच्या तुमच्या स्वप्नातही मुळीच खंड पडता कामा नये.तुम्हाला त्या
पदावर विराजमान करण्याचा विडा तुमच्या साथीदारांनी उचलला आहेच. २०१४ ची संधी
अनायसे तोंडावर आहे. घ्या साधून ती संधी! कॉंग्रेससोबतची तुमची जाहीर लढाई
प्रत्यक्षात खोटी खोटी अन् लोकसभेसाठी जास्त जागा पदरी पाडून घेण्याकरता आहे, याची कल्पना आली आहेच जनताजनार्दनाला. राहिला प्रश्न
जनतेच्या वर्षानुवर्षे रखडलेल्या प्रश्नांबाबतच्या बाळगावयाच्या लाज-शरमेचा. तर
त्याचं बघू पुढे केव्हातरी. सवड मिळालीच तर...!